गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : एक धागा सुखाचा, शंभर धागे ए वत्र माणसा तुझिया आयुष्याचे वा ओळी ऐकल्या की मनात एक वेगळीच हळुवार भाबना जागी होते. ग. दि. माडगूळकर यांच्या लेखणीने साकारलेले आणि सुधीर फडके यांच्या स्वरांनी सजलेले हे गीत केवळ गाणे नसून संपूर्ण जीवनाचे तत्त्वज्ञान मांडणारा आरसा आहे. माणसाच्या आयुष्याचा अर्थ काय, सुख आणि दःख यांचे नाते काय, जीवनातील प्रवास कसा असतो, याचे अत्यंत प्रभावी आणि साध्या शब्दांत केलेले हे वर्णन प्रत्येकाला अंतर्मुख करून जाते. आयुष्य म्हणजे काय, हा प्रश्न प्रत्येकाला कधीतरी पडतोच.
कोणी आयुष्याला प्रवास म्हणतो, कोणी संघर्ष, तर कोणी एक सुंदर स्वप्न परंतु या गीतात आयुष्याची तुलना जरतारी वखाशी केली आहे. ही उपमा अतिशय अर्थपूर्ण आहे जसे एक सुंदर वख अनेक धाग्यांनी विणले जाते, तसेच आयुष्य हे अनेक अनुभवांनी, नात्यांनी, भावना आणि घटनांनी तयार होते प्रत्येक धागा महत्त्वाचा असतो. काही धागे चमकदार असतात आनंदाचे, प्रेमाचे, यशाचे; तर काही धागे खडबडीत असतात दुःखाचे, अपयशाचे, संघर्षाचे. या दोन्ही प्रकारच्या धाग्यांशिवाय आयुष्याचे वा पूर्ण होत नाही.
जीवनाच्या याविणकामात प्रत्येक क्षणाला महत्त्व आहे. विणकर जसा प्रत्येक धागा काळजीपूर्वक गुंफतो, तसा माणूसही आपल्या आयुष्यातील प्रत्येक अनुभवातून घडत जातो. सुख असो किंवा दुःख, प्रत्येक गोष्ट माणसाला काहीतरी शिकवते. संत तुकाराम महाराजांनी सुख पाहता जवापाडे, दुःख पर्वताएवढे असे सांगितले आहे. यामध्येही त्याच तत्त्वाचा प्रत्यय येतो. सुख थोडे असते, पण दुःख मोठे वाटते. मात्र हाच दःखाचा अनुभव माणसाला अधिक सक्षम बनवतो.
एक धागा सुखाचा ही ओळ आपल्याला एक महत्वाचा संदेश देते आयुष्यातील सुख हे क्षणभंगुर असते. ते क्षणिक असते, जसे पहाटेचा दवबिंद किंवा पावसाच्या सरीतील थेंब. पण दुःख मात्र दीर्घकाळ टिकणारे असते. मात्र याचा अर्थ असा नाही की जीवन दुःखमय आहे. उलट, दुःखामुळेच सुखाची किंमत कळते. भगवद्गीतेत सुखदःखे समे कृत्वा असा उपदेश करण्यात आला आहे. म्हणजेच सुख आणि दुःख दोन्ही समान मानणे आवश्यक आहे. अनुभवांचा काळ असतो आयुष्याचा सारांश या टप्प्यात उमगतो.
ग्रामीण जीवनात या येसी उघडा, जासी उघडा ही ओळ जीवनाच्या अंतिम सत्याची जाणीव करून देते. माणूस जन्गाला येतो तेव्हा काहीही घेऊन येत नाही आणि मृत्यूच्या वेळी काहीही घेऊन जात नाही. तरीही आयुष्यभर तो संपच्ची, प्रतिष्ठा आणि भौतिक सुखांच्या मागे धावत राहतो संत ज्ञानेश्वरांनी जालीचा भोगासी असावे सादर असे सांगितले आहे म्हणजे जे येईल ते स्वीकारण्याची वृत्ती ठेवली पाहिजे.
मानवी आयुष्याचे तीन टप्पे-बालपण, तारुण्य आणि वार्धक्य – या गीतातून अप्रत्यक्षपणे समोर येतात. बालपण १०. हे निरागसतेचे प्रतीक आहे. कोणतीही चिंता नसलेले, मुक्त आणि आनंदी असे ते दिवस असतात. तारुण्य हा स्वप्नांचा काळ असतो. महत्त्वाकांक्षा, धडपड, यश आणि अपयश यांचा खेळ यात चालू असतो.
तर वार्धक्य हानाती हीच आयुष्याची खरी संपत्ती आहे. आई-वडील, मित्र, कुटुंब यांच्याशिवाय आयुष्य अपूर्ण आहे. सुखाचा खरा धागा या नात्यांमध्येच असतो जर ही नाती जपली, तर आयुष्य सुंदर बनते. मराठी साहित्यानेही जीवनाचे हेच तत्त्वज्ञान मांडले आहे. श्यामची आई मध्ये प्रेम आणि संस्कार दिसतात, मृत्युंजय मध्ये संघर्ष आणि आत्मवळ, तर ययाति मध्ये मानवी इच्छांचे परिणाम. या सर्व साहित्यकृती आपल्याला जीवनाचा खरा अर्थ शिकवतात. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले तर माणूस दुःख अधिक लक्षात ठेवतो. कारण त्याचा मेंद धोक्याला जास्त महत्त्व देतो. पण सुख अनुभवण्यासाठी सजगता आवश्यक असते. आनंद हा बाहेर शोधण्याचा विषय नाही, तो मनातून निर्माण होतो. या सर्व विचारांचा सार असा की आयुष्य हे सुख आणि दुःख यांच्या संतुलनावर आधारित आहे. दुःख टाळता येत नाही, पण त्यातून शिकता येते.
सुख कायम टिकतनाही, पण त्याचा आनंद घेता येतो.
शेवटी, जीवनाच्या या जरतारी वखात कितीही दुःखाचे धागे असले, तरी जर आपण तो एक धागा सुखाचा जपला, तर आयुष्य सुंदर बनते म्हणूनच सुख शोधण्यापेक्षा ते जपणे महत्त्वाचे आहे. तत्त्वज्ञानाची अधिक जाणीव होते. शेतकरी पावसावर अवलंबून असतो कधी भरघोस उत्पन्न, तर कधी दुष्काळ, तरीही तो जीवन जगत राहतो त्याच्या आयुष्यातील सुख साधे असते कुटुंबासोबतचा वेळ , शेतातील पीक, आणि निसर्गाशी असलेले नाते. जिथे समाधान, तिथेच खरे धन ही मराठी म्हण येथे अगदी खरी ठरते.
आजच्या आधुनिक युगात्त मात्र परिस्थिती वेगळी आहे. तंत्रज्ञान , पैसा आणि सुविधा वाढल्या आहेत, पण समाधान कमी झाले आहे. माणूस अधिक धावत आहे, पण आनंद हरवत आहे. गोबाईल आणि इंटरनेटमुळे जग जवळ आले आहे, पण माणसे दूर गेली आहेत. नात्यांमध्ये संवाद कमी झाला आहे.
चंद्रकांत सरस्वती प्रकाश शेळके (तहसीलदार बीड)






















