Homeमहाराष्ट्रचव्हाणवाडीत भीमज्योती जन्मोत्सव प्रेरणादायी; निबंध स्पर्धा, विशेष व्याख्यानातून शिक्षणाची ज्योत प्रज्वलित

चव्हाणवाडीत भीमज्योती जन्मोत्सव प्रेरणादायी; निबंध स्पर्धा, विशेष व्याख्यानातून शिक्षणाची ज्योत प्रज्वलित

गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  तालुक्यातील चव्हाणवाडी येथे भीमज्योती जन्मोत्सवानिमित्त आयोजित निबंध स्पर्धा व विशेष व्याख्यान कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. गावातील विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

निबंध स्पर्धेत एकूण ४२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. स्पर्धा प्राथमिक व माध्यमिक अशा दोन गटांत घेण्यात आली. प्राथमिक गटात सृष्टी जितेंद्र सुळे हिने प्रथम, सिद्धांत मेघशाम पांचाळ याने द्वितीय तर दिव्या धर्मराज मुटके हिने तृतीय क्रमांक पटकावला. माध्यमिक गटात प्रताप गोवर्धन चव्हाण प्रथम, यश शरद पिंपळे द्वितीय आणि माधुरी मच्छिंद्र हातागळे तृतीय ठरले. विजेत्या विद्यार्थ्यांचा ट्रॉफी व ड्रॉइंग किट्स देऊन गौरव करण्यात आला, तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली.

याच औचित्य साधून जिल्हा परिषद शाळा चव्हाणवाडी येथे कॉपीमुक्त चाचणीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या १६ विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचा विशेष सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात भाऊसाहेब लक्ष्मण शेळके यांनी भीमज्योती जन्मोत्सवाचे महत्त्व अधोरेखित करत सामाजिक परिवर्तनासाठी शिक्षणाची गरज स्पष्ट केली. प्रमुख उपस्थित प्रा. दीपक डोंगरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षणातून व्यक्तिमत्त्व विकास घडवण्याचे आवाहन केले.

विशेष व्याख्याते प्रा. शरद सदाफुले यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करत चव्हाणवाडीच्या शिस्तबद्ध अभ्यास संस्कृतीचे कौतुक केले. “गावात बौद्ध समाजाचे एकही घर नसतानाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी केली जाते, ही बाब अत्यंत कौतुकास्पद आहे,” असे त्यांनी नमूद केले. सायरन वाजल्यानंतर मुले नियमित अभ्यासाला बसतात, ही शिस्त इतर गावांसाठी आदर्श असल्याचेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमास मुख्याध्यापक श्री. सरग सर, पोलीस पाटील अंकुश हातागळे, लिपिक विलास हातागळे, ज्येष्ठ नागरिक रोहिदास पिंपळे यांच्यासह गावातील माता-भगिनी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सूत्रसंचालन प्रा. सुरज शेळके यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. विनोद यादव यांनी केले. शिक्षण, शिस्त आणि सामाजिक जाणीव यांचा सुंदर संगम साधणारा हा कार्यक्रम उपस्थितांच्या मनात दीर्घकाळ स्मरणात राहील, असा ठरला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; समता व न्यायाचा संदेश

0
   मारेगाव - यवतमाळ (प्रतिनिधी देवा आत्राम) :  जिल्ह्यातील वाई येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली....

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा रेड अलर्ट प्रशासन सतर्क, नागरिकांना दक्षतेचे आवाहन

0
 जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश पट्ट्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून, जळगाव जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे....

फळ विक्रेत्याच्या लेकीची गगनभरारी! काशीवाडीच्या आलिया शेखची पोलीस दलात निवड

0
पुणे (प्रतिनिधी): पुण्यातील काशीवाडीसारख्या दाट वस्तीत राहणाऱ्या एका सामान्य फळ विक्रेत्याच्या मुलीने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस दलात भरती होऊन घवघवीत यश संपादन...

दौंडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; अन्नदान व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

0
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड) :  गोपाळवाडी रोड, सरपंच वस्ती येथील संविधान तिरंगा चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला...

सामाजिक परिवर्तन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून चकलांब्यात एकता, श्रद्धा आणि उत्साहात फुले–आंबेडकर जयंती...

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  तालुक्यातील चकलांबा येथे महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या गुरु शिष्यांची संयुक्त जयंती अत्यंत उत्साहात आणि...

वाई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; समता व न्यायाचा संदेश

0
   मारेगाव - यवतमाळ (प्रतिनिधी देवा आत्राम) :  जिल्ह्यातील वाई येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली....

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा रेड अलर्ट प्रशासन सतर्क, नागरिकांना दक्षतेचे आवाहन

0
 जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश पट्ट्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून, जळगाव जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे....

फळ विक्रेत्याच्या लेकीची गगनभरारी! काशीवाडीच्या आलिया शेखची पोलीस दलात निवड

0
पुणे (प्रतिनिधी): पुण्यातील काशीवाडीसारख्या दाट वस्तीत राहणाऱ्या एका सामान्य फळ विक्रेत्याच्या मुलीने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस दलात भरती होऊन घवघवीत यश संपादन...

दौंडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; अन्नदान व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

0
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड) :  गोपाळवाडी रोड, सरपंच वस्ती येथील संविधान तिरंगा चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला...

सामाजिक परिवर्तन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून चकलांब्यात एकता, श्रद्धा आणि उत्साहात फुले–आंबेडकर जयंती...

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  तालुक्यातील चकलांबा येथे महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या गुरु शिष्यांची संयुक्त जयंती अत्यंत उत्साहात आणि...
error: Content is protected !!