दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड) : गोपाळवाडी रोड, सरपंच वस्ती येथील संविधान तिरंगा चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला दौंड नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा छायाताई थोरात यांच्यासह सरिता कुल व मोनाली वीर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

या जयंती सोहळ्याचे आयोजन दलित पँथर ऑफ इंडिया, पुणे जिल्हाध्यक्ष संघराज गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राहुल आढाव, जयवंत म्हस्के, अनिकेत रणसिंग, गौरव कुल, अमोल आवारे, सचिन आढाव, गणेश लोंढे, संजय सपकाळ, संतोष माने आणि जयश्री माने यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या संख्येने नागरिकांनी याचा लाभ घेतला. तसेच सायंकाळी शालेय विद्यार्थ्यांना वह्या व इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात गौरव कुल व सरिता कुल यांचे विशेष योगदान राहिले.
सामाजिक बांधिलकी जपत आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करत हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.






















