Homeमहाराष्ट्रअवकाळी पावसाचा तडाखा शिरपूरमध्ये शेतकऱ्यांना वाढीव नुकसान भरपाईची मागणी

अवकाळी पावसाचा तडाखा शिरपूरमध्ये शेतकऱ्यांना वाढीव नुकसान भरपाईची मागणी

शिरपूर (प्रतिनिधी शेटे): शिरपूर तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, बाधित शेतकऱ्यांना तात्काळ वाढीव नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी ‘शिरपूर फर्स्ट’ संघटनेने केली आहे.

या मागणीसाठी संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात भेट देत निवेदन सादर केले. यावेळी कार्यकर्त्यांनी कांदा, मका आणि केळीची पिके गळ्यात टांगून अनोख्या पद्धतीने आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले.

जानेवारी महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे भाटपुरा, सावेर, अजनाड, थाळनेर परिसरातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर २ एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पावसाने सुमारे ३० गावांतील शेतीचे नुकसान वाढवले. मात्र, अद्यापही अनेक शेतकऱ्यांना अपेक्षित नुकसान भरपाई मिळालेली नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली.

याशिवाय पीक विम्याची थकीत रक्कम लवकर वितरित करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास येत्या सात ते आठ दिवसांत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

यावेळी हंसराज चौधरी, चेतन मोरे, प्रशांत राजपूत, ईश्वर पाटील आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिक्षण क्षेत्राला भ्रष्टाचाराची वाळवी! ४१९ तोळे सोने अन् कोट्यवधींची माया; दीड दिवसात जामीन?

0
पुणे : ज्यांच्या खांद्यावर शिक्षण क्षेत्रातील पारदर्शकता टिकवण्याची जबाबदारी होती, तेच 'शालार्थ आयडी' घोटाळ्याच्या चौकशीचे प्रमुख आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष...

रोहन ओव्हाळ खून प्रकरणाचा मास्टरमाईंड जेरबंद; मार्केटयार्ड पोलिसांची ६ तासांत धडाकेबाज कारवाई

0
Times Of Maharashtra Desk : शहरात खळबळ उडवून देणाऱ्या प्रसिद्ध रॅपर आणि रील स्टार रोहन कांतीलाल ओव्हाळ याच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात...

पुण्यात बिल्डरची फसवणूक करून फ्लॅटवर बेकायदेशीर ताबा; प्रविण ओसवाल यांच्या विरोधात कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये...

0
Times Of Maharashtra Desk : पुण्यातील कोंढवा परिसरात एका नामांकित बिल्डरची फसवणूक करून, फ्लॅटचे पूर्ण पैसे न देताच बेकायदेशीरपणे ताबा मिळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर...

फोन न केल्याचा राग शिरपूरमध्ये पत्नीचा दगडाने खून पती अटकेत

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) : तालुक्यातील खैरखुटी येथे १९ एप्रिल रोजी रात्री घडलेल्या धक्कादायक घटनेत, पत्नीने फोन न केल्याच्या रागातून पतीने तिचा दगडाने खून केल्याची...

जिथे जायला लोक घाबरत, तिथेच डोलतंय फळांचं नंदनवन‌

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : शासकीय योजना म्हणजे निव्वळ भ्रष्टाचार आणि कागदी घोडे नाचवणे, असा सर्वसामान्यांचा समज असतो. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील...

शिक्षण क्षेत्राला भ्रष्टाचाराची वाळवी! ४१९ तोळे सोने अन् कोट्यवधींची माया; दीड दिवसात जामीन?

0
पुणे : ज्यांच्या खांद्यावर शिक्षण क्षेत्रातील पारदर्शकता टिकवण्याची जबाबदारी होती, तेच 'शालार्थ आयडी' घोटाळ्याच्या चौकशीचे प्रमुख आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष...

रोहन ओव्हाळ खून प्रकरणाचा मास्टरमाईंड जेरबंद; मार्केटयार्ड पोलिसांची ६ तासांत धडाकेबाज कारवाई

0
Times Of Maharashtra Desk : शहरात खळबळ उडवून देणाऱ्या प्रसिद्ध रॅपर आणि रील स्टार रोहन कांतीलाल ओव्हाळ याच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात...

पुण्यात बिल्डरची फसवणूक करून फ्लॅटवर बेकायदेशीर ताबा; प्रविण ओसवाल यांच्या विरोधात कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये...

0
Times Of Maharashtra Desk : पुण्यातील कोंढवा परिसरात एका नामांकित बिल्डरची फसवणूक करून, फ्लॅटचे पूर्ण पैसे न देताच बेकायदेशीरपणे ताबा मिळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर...

फोन न केल्याचा राग शिरपूरमध्ये पत्नीचा दगडाने खून पती अटकेत

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) : तालुक्यातील खैरखुटी येथे १९ एप्रिल रोजी रात्री घडलेल्या धक्कादायक घटनेत, पत्नीने फोन न केल्याच्या रागातून पतीने तिचा दगडाने खून केल्याची...

जिथे जायला लोक घाबरत, तिथेच डोलतंय फळांचं नंदनवन‌

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : शासकीय योजना म्हणजे निव्वळ भ्रष्टाचार आणि कागदी घोडे नाचवणे, असा सर्वसामान्यांचा समज असतो. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील...
error: Content is protected !!