Homeमहाराष्ट्रगेवराई येथील बालग्राम अनाथालयातील विकासचा अनुष्कासोबत थाटात विवाह संपन्न

गेवराई येथील बालग्राम अनाथालयातील विकासचा अनुष्कासोबत थाटात विवाह संपन्न

गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : ज्या हातांना कधीकाळी केवळ आधाराची गरज होती, त्या हातांनी आज एका नव्या संसाराची स्वप्ने कवेत घेतली आहेत. गेवराई येथील बालग्राम परिवाराचा लाडका विकास आणि अमरावतीची अनुष्का यांचा विवाह सोहळा नुकताच अत्यंत साधेपणाने आणि तितक्याच भावनिक वातावरणात संपन्न झाला.

एका अनाथ मुलाचा अनाथालयापासून ते एका नामांकित कंपनीतील उच्च पदापर्यंतचा आणि आता हक्काचं घर मिळवण्यापर्यंतचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.

विकासचे बालपण बालग्राम परिवाराच्या छायेत गेले. आई-वडिलांचे छत्र नसताना बालग्रामने त्याला केवळ निवाराच दिला नाही, तर माया, संस्कार आणि शिक्षणाचे बळ दिले. आपल्या कष्टाच्या आणि बालग्रामने दाखवलेल्या योग्य मार्गाच्या जोरावर विकासने पुण्यात उच्च शिक्षण पूर्ण केले.

आज तो एका नामांकित कंपनीत सन्मानाने नोकरी करत असून स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभा आहे. विवाह सोहळ्यादरम्यान विकासच्या डोळ्यांत दिसणारा आनंद आणि आत्मविश्वास उपस्थितांचे मन जिंकून घेणारा होता.

“कधीकाळी आपण एकटे आहोत ही जाणीव असायची, पण आज अनुष्काच्या रूपाने मला हक्काचं ‘आपलं माणूस’ मिळालं आहे,” अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

बालग्राम परिवारासाठी हा क्षण केवळ एका लग्नाचा नसून त्यांनी जपलेल्या एका रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाल्याचे समाधान देणारा ठरला.

भपकेबाजपणाला फाटा देत अत्यंत साध्या पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला. एका अनाथ बालकाच्या आयुष्यातील पोकळी आज प्रेमाने आणि नात्याच्या विश्वासाने भरून निघाली आहे.

या विवाह सोहळ्याला बालग्राम परिवारातील सदस्य आणि स्नेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. विकास आणि अनुष्का या नवदांपत्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्यांचे पुढील जीवन सुख, समृद्धी आणि समाधानाचे जावो, अशी सदिच्छा गेवराई येथील बालग्राम परिवाराने व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दौंड शहरात संभाव्य पाणीटंचाईचा धोका; नगरसेविका स्वाती निलेश सावंत यांची तातडीच्या उपाययोजनांची मागणी

0
दौंड-(प्रतिनिधी मयुर साळवे संघराज गायकवाड): दौंड, दि. २२ जून : भारतीय हवामान विभागाने (IMD) यंदा ‘एल निनो’च्या प्रभावामुळे पर्जन्यमान कमी होण्याची शक्यता वर्तविल्याने भविष्यात...

पुणे वन विभागात कोट्यवधींच्या कामांवर भ्रष्टाचाराचे आरोप; गैरव्यवहार उघड करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकार्‍यालाच धमकी...

0
पुणे : पुणे वन विभागातील कोट्यवधी रुपयांच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, या कथित गैरव्यवहाराची माहिती उघड करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यालाच गुन्हा...

जवाहर नवोदय विद्यालय येथे इयत्ता अकरावी विज्ञान शाखेत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ प्रवेशासाठी सुवर्णसंधी !

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : जवाहर नवोदय विद्यालय, गढी, ता. गेवराई, जि. बीड येथे इयत्ता अकरावी विज्ञान शाखेच्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी गुणवत्तेनुसार प्रवेश...

निर्भय सेवा समितीचा स्तुत्य उपक्रम; गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा आधार

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : आदर्श बेटावद बु. गावातील निर्भय सेवा समिती ही संस्था गोरगरीब व गरजू नागरिकांच्या मदतीसाठी सदैव पुढाकार घेत असते....

निर्भय सेवा समितीचा स्तुत्य उपक्रम; गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा आधार Jalgaon ता. जामनेर

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): आदर्श बेटावद बु. गावातील निर्भय सेवा समिती ही संस्था गोरगरीब व गरजू नागरिकांच्या मदतीसाठी सदैव पुढाकार घेत असते. चालू शैक्षणिक...

दौंड शहरात संभाव्य पाणीटंचाईचा धोका; नगरसेविका स्वाती निलेश सावंत यांची तातडीच्या उपाययोजनांची मागणी

0
दौंड-(प्रतिनिधी मयुर साळवे संघराज गायकवाड): दौंड, दि. २२ जून : भारतीय हवामान विभागाने (IMD) यंदा ‘एल निनो’च्या प्रभावामुळे पर्जन्यमान कमी होण्याची शक्यता वर्तविल्याने भविष्यात...

पुणे वन विभागात कोट्यवधींच्या कामांवर भ्रष्टाचाराचे आरोप; गैरव्यवहार उघड करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकार्‍यालाच धमकी...

0
पुणे : पुणे वन विभागातील कोट्यवधी रुपयांच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, या कथित गैरव्यवहाराची माहिती उघड करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यालाच गुन्हा...

जवाहर नवोदय विद्यालय येथे इयत्ता अकरावी विज्ञान शाखेत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ प्रवेशासाठी सुवर्णसंधी !

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : जवाहर नवोदय विद्यालय, गढी, ता. गेवराई, जि. बीड येथे इयत्ता अकरावी विज्ञान शाखेच्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी गुणवत्तेनुसार प्रवेश...

निर्भय सेवा समितीचा स्तुत्य उपक्रम; गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा आधार

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : आदर्श बेटावद बु. गावातील निर्भय सेवा समिती ही संस्था गोरगरीब व गरजू नागरिकांच्या मदतीसाठी सदैव पुढाकार घेत असते....

निर्भय सेवा समितीचा स्तुत्य उपक्रम; गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा आधार Jalgaon ता. जामनेर

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): आदर्श बेटावद बु. गावातील निर्भय सेवा समिती ही संस्था गोरगरीब व गरजू नागरिकांच्या मदतीसाठी सदैव पुढाकार घेत असते. चालू शैक्षणिक...
error: Content is protected !!