गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : कु.हर्षदा पोपळघट प्रथम सृष्टी औटी द्वितीय तर श्रुती राजापूरकर तृतीय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परिक्षेत उमापूर येथील उच्च माध्यमिक विद्यालयाने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी घवघवीत यश मिळवून यशाची परंपरा कायम राखली आहे.
जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित उच्च माध्यमिक विद्यालय, उमापुर या विद्यालयाचा इयत्ता बारावी (विज्ञान) शाखेचा १०० टक्के निकाल लागला असून विज्ञान शाखेची कु.पोपळघट हर्षदा गणेश ८९.६७ % टक्के गुण घेवून सर्वप्रथम तर द्वितीय – कु.औटी सृष्टी अजय ८७.३३%, तृतीय-कु.राजापूरकर श्रुती अमोल ८६.५०% टक्के गुण मिळवून मुलींनी बाजी मारली आहे.


या यशाबद्दल त्यांचे व सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा शिक्षण महर्षी माजी मंञी शिवाजीराव पंडित,अध्यक्ष मा.अमरसिंह पंडित, सचिव मा.जयसिंह पंडित,मा.आ.विजयसिंह पंडित, युवा नेते पृथ्वीराजे पंडित, युवा नेते रणविर (काका) पंडित, प्रशासकीय अधिकारी प्रमोद गोरकर सर, गोगुले सर, हाटोटे सर, प्राचार्य भक्तराज पौळ सर व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच गांवकरी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.






















