Homeमहाराष्ट्ररेल्वे बायपाससाठी भूसंपादन; शेतकऱ्यांच्या हक्कांबाबत जागरूकता वाढविण्याची गरज

रेल्वे बायपाससाठी भूसंपादन; शेतकऱ्यांच्या हक्कांबाबत जागरूकता वाढविण्याची गरज

परभणी(अनिल शेटे) : गंगाखेड रेल्वे बायपास प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रिया वेगाने सुरू असताना शेतकऱ्यांमध्ये हक्कांविषयी जागरूकतेचा अभाव दिसून येत आहे. प्रशासनाकडून मोजणी व कागदपत्रांची पूर्तता केली जात असली तरी अनेक शेतकरी योग्य भरपाई, पुनर्वसन आणि कायदेशीर हक्कांबाबत अनभिज्ञ असल्याचे चित्र आहे.
भूसंपादन करताना भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापन हक्क कायदा 2013 अंतर्गत शेतकऱ्यांना बाजारभावाच्या अनेक पट भरपाई देणे बंधनकारक आहे. यामध्ये जमिनीबरोबरच उभ्या पिकांचे, झाडांचे व बांधकामांचे स्वतंत्र मूल्यांकन करून नुकसानभरपाई दिली जाते.

याशिवाय प्रकल्प सुरू करण्यापूर्वी सामाजिक परिणाम मूल्यांकन (SIA) करणे आवश्यक असून, या प्रक्रियेत शेतकऱ्यांना आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडून जमीन संपादनापूर्वी लेखी नोटीस देणे, पारदर्शक माहिती देणे व हरकती नोंदविण्याची संधी उपलब्ध करून देणेही कायद्यानुसार आवश्यक आहे.
भूसंपादनामुळे विस्थापित होणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ आर्थिक भरपाईच नव्हे, तर पुनर्वसन व पुनर्स्थापनाचे लाभ देणे बंधनकारक आहे. यामध्ये घरासाठी जागा, स्थलांतर खर्च, जीवननिर्वाह भत्ता तसेच काही प्रकरणात रोजगाराच्या संधींचा समावेश होतो.

दरम्यान, भरपाई कमी मिळाल्यास किंवा अन्याय झाल्यास शेतकऱ्यांना न्यायालयात दाद मागण्याचा हक्क आहे. न्यायालयीन प्रक्रियेत वेळ व प्रलंबित प्रकरणे राहत असल्याने योग्य वेळी योग्य मोबदला मिळत नाही. जमीन ताब्यात घेण्यापूर्वी पूर्ण भरपाई ,वस्तुस्थितीला गृहीत धरून मोबदला देणे आवश्यक असून, अन्यथा ती कारवाई बेकायदेशीर ठरू शकते.

रेल्वे बायपाससारखे सार्वजनिक प्रकल्प विकासासाठी महत्त्वाचे असले तरी शेतकऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण तितकेच गरजेचे आहे. त्यामुळे प्रशासनाने पारदर्शकता ठेवून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी, अशी मागणी स्थानिक पातळीवरून होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दौंडमध्ये तंबाखूजन्य पदार्थांविरोधात कारवाई मोठ्या पुरवठादारांवर कारवाईची मागणी जोरात

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड) : दौंड शहर आणि तालुक्यात अवैध गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची चर्चा पुन्हा एकदा समोर आली...

गेवराईचे पत्रकार विष्णू गायकवाड यांना ‘महाराष्ट्र नायक’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

0
बीड (प्रतिनिधी विशेष) : बीड जिल्ह्यासाठी आणि गेवराई तालुक्यासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. समाजातील विविध प्रश्नांवर आपल्या प्रभावी लेखणीतून आवाज उठवणारे ‘लोकमत’चे धडाडीचे पत्रकार...

चंद्रपूर मनपाच्या २०१४ GIS सर्व्हेवर पुन्हा संशय “साठगाठ घोटाळा”च्या आरोपांनी खळबळ

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर महानगरपालिकेने २०१४ मध्ये राबविलेल्या GIS आधारित मालमत्ता सर्व्हे प्रकल्पावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शहर विकास,...

जळगावात ‘कॉकरोच जनता पार्टी’ची सोशल मीडियावर धूम राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : जळगावातील राजकीय वातावरणात सध्या “कॉकरोच जनता पार्टी” या अनोख्या नावाची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. या नावाने तयार करण्यात...

बकरी ईद निमित्त बोकड वाहतुकीवरील कारवाई थांबवा – शाहरुख मुलाणी

0
मुंबई प्रतिनिधी :- बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर बोकड वाहतूक करणाऱ्या गरीब शेतकरी व ग्राहकांवर पोलीस आणि आरटीओ प्रशासनाकडून होत असलेल्या कारवाईविरोधात महाराष्ट्र राज्य मुल्ला...

दौंडमध्ये तंबाखूजन्य पदार्थांविरोधात कारवाई मोठ्या पुरवठादारांवर कारवाईची मागणी जोरात

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड) : दौंड शहर आणि तालुक्यात अवैध गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची चर्चा पुन्हा एकदा समोर आली...

गेवराईचे पत्रकार विष्णू गायकवाड यांना ‘महाराष्ट्र नायक’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

0
बीड (प्रतिनिधी विशेष) : बीड जिल्ह्यासाठी आणि गेवराई तालुक्यासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. समाजातील विविध प्रश्नांवर आपल्या प्रभावी लेखणीतून आवाज उठवणारे ‘लोकमत’चे धडाडीचे पत्रकार...

चंद्रपूर मनपाच्या २०१४ GIS सर्व्हेवर पुन्हा संशय “साठगाठ घोटाळा”च्या आरोपांनी खळबळ

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर महानगरपालिकेने २०१४ मध्ये राबविलेल्या GIS आधारित मालमत्ता सर्व्हे प्रकल्पावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शहर विकास,...

जळगावात ‘कॉकरोच जनता पार्टी’ची सोशल मीडियावर धूम राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : जळगावातील राजकीय वातावरणात सध्या “कॉकरोच जनता पार्टी” या अनोख्या नावाची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. या नावाने तयार करण्यात...

बकरी ईद निमित्त बोकड वाहतुकीवरील कारवाई थांबवा – शाहरुख मुलाणी

0
मुंबई प्रतिनिधी :- बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर बोकड वाहतूक करणाऱ्या गरीब शेतकरी व ग्राहकांवर पोलीस आणि आरटीओ प्रशासनाकडून होत असलेल्या कारवाईविरोधात महाराष्ट्र राज्य मुल्ला...
error: Content is protected !!