निफाड (प्रतिनिधी योगेश कर्डिले) : निफाड तालुक्यात सध्या पोलीस निरीक्षक श्री. गणेशजी गुरव यांच्या कार्यशैलीची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू असून, सामान्य नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विशेष विश्वास आणि आदराची भावना निर्माण झाली आहे.
गुन्हेगारांविरोधात कठोर भूमिका आणि सामान्य माणसासाठी संवेदनशील व मदतीची भूमिका या दोन्ही गोष्टींचा सुंदर समतोल साधत गुरव साहेबांनी निफाड तालुक्यात एक वेगळी कार्यपद्धती निर्माण केली आहे. त्यामुळे आज “गुरव पॅटर्न” हा शब्द गावागावांत चर्चेचा विषय ठरत आहे.

तालुक्यातील वाढते , गुन्हेगारी, गावांतील तणाव, महिलांवरील अत्याचार तसेच सामाजिक प्रश्नांवर त्यांनी वेळोवेळी धडक कारवाया करत कायद्याचा धाक निर्माण केला. अनेक गुन्हेगारांवर कठोर कारवाई करून “कायद्यापुढे कोणीही मोठा नाही” हा संदेश त्यांनी स्पष्टपणे दिला.
मात्र दुसरीकडे एखादा गरीब शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक किंवा सामान्य माणूस अडचण घेऊन पोलीस ठाण्यात गेला तर त्याचे म्हणणे शांतपणे ऐकून त्याला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी गुरव साहेब स्वतः पुढाकार घेतात. त्यामुळे “पोलीस म्हणजे फक्त धाक नाही, तर आधारही आहे,” अशी भावना नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे.
रात्रीच्या गस्तीद्वारे गुन्हेगारीवर नियंत्रण, संवेदनशील भागांवर विशेष लक्ष, तरुणांना योग्य मार्गदर्शन आणि जनतेशी थेट संवाद या माध्यमातून त्यांनी पोलिसांविषयी सकारात्मक वातावरण तयार केले आहे.
अनेक गावांमधून नागरिक एकच भावना व्यक्त करताना दिसतात
गुरव साहेब आहेत म्हणून आम्ही निर्धास्त आहोत.
खाकी वर्दीत राहूनही माणुसकी जपणारा अधिकारी म्हणून गणेशजी गुरव यांच्याकडे आज निफाड तालुका आशेने पाहत आहे. चांगल्या लोकांसाठी मदतीचा हात आणि गुन्हेगारांसाठी कठोर निर्णय हीच त्यांच्या कार्यशैलीची खरी ओळख बनली आहे.






















