Homeताज्या बातम्याचकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट; सपोनि सचिन इंगळेंच्या तात्काळ बदलीची...

चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट; सपोनि सचिन इंगळेंच्या तात्काळ बदलीची नागरिकांची मागणी

गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : वरिष्ठांच्या मर्जीतील अधिकारी असल्याचा दावा; कारवाईकडे पोलिसांची जाणीवपूर्वक डोळेझाक गेवराई तालुक्यातील चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुटखा, मटका, अवैध दारू आणि वाळू तस्करीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून सपोनि सचिन इंगळे यांच्या कार्यकाळात या अवैध धंद्यांना आळा बसण्याऐवजी जणू राजाश्रयच मिळाल्याचा संतप्त आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. “पोलीस अधीक्षकांशी आपली जवळीक असल्याने कारवाई होणार नाही” अशी दर्पोक्ती करत संबंधित अधिकाऱ्यांकडून कारवाई टाळली जात असल्याने, सपोनि इंगळे यांची तात्काळ बदली करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
अवैध धंद्यांना मोकळे रान आणि धोक्यात आलेली शांतता.

चकलांबा परिसरात सध्या कायदा व सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. मागील तीन महिन्यांत अवैध व्यवसायांवर वचक बसण्याऐवजी त्यांच्यात मोठी वाढ झाली आहे. खुलेआम चालणाऱ्या या धंद्यांमुळे तरुण पिढी व्यसनाधीनतेकडे ओढली जात असून, ग्रामीण भागातील शांतता आणि सुरक्षितता धोक्यात आली आहे. प्रशासनाने वेळीच कठोर पावले न उचलल्यास भविष्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सुरळेगावात दिवसाढवळ्या वाळू उपसा
सुरळेगाव आणि आसपासच्या परिसरात वाळू माफियांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. येथे दिवसाढवळ्या राजरोसपणे अवैधरित्या वाळूचा उपसा सुरू आहे. मात्र, या गंभीर प्रकाराकडे चकलांबा पोलिसांकडून सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. पोलिसांच्या या संशयास्पद भूमिकेमुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात असून, महसूल व पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पोलीस अधीक्षकांकडून कारवाईची अपेक्षा
सपोनि सचिन इंगळे हे वरिष्ठांच्या अत्यंत जवळचे मानले जातात, त्यामुळे स्थानिक पातळीवर कुणीही तक्रार केली तरी त्याचा काहीही उपयोग होत नसल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. या सर्व गैरप्रकारांची जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तातडीने गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

नागरिकांच्या प्रमुख मागण्या:
चकलांबा परिसरातील सर्व अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावेत.

सुरळेगाव येथील नियमबाह्य वाळू उपशाची सखोल चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत.अवैध धंद्यांना पाठीशी घालणाऱ्या सपोनि सचिन इंगळे यांची सखोल चौकशी करून त्यांची येथून तत्काळ बदली करावी.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘टाईम्स ऑफ महाराष्ट्र’ विशेष वृत्त: भारती विद्यापीठ ट्रॅफिक पोलिसांची नागरिकांवर उघड दहशत! नियमनाऐवजी ‘गाड्या...

0
पुणे: शहरात वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असताना, भारती विद्यापीठ वाहतूक विभागाचे पोलीस मात्र वाहतूक नियमन करण्याऐवजी नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यात धन्यता मानत असल्याचे धक्कादायक...

आत्मा योजनेतून सिन्नरमध्ये विदेशी भाजीपाला शेतीला चालना; नाविन्यपूर्ण पिकांमुळे शेतकऱ्यांना उत्पन्नवाढीची संधी

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड)  कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत सिन्नर तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या विदेशी भाजीपाला शेती शाळा आणि पिक प्रात्यक्षिक उपक्रमामुळे नाविन्यपूर्ण शेतीला...

महाराष्ट्रात बियाणे कायदा अधिक कठोर होणार; कृषिमंत्री भरणे यांच्या बैठकीत आमदार रणधीर सावरकरांच्या महत्त्वपूर्ण...

0
अकोला:महाराष्ट्र राज्यात बियाणे उत्पादन, विक्री , वितरण व साठवणूक याबाबत शेतकऱ्यांचे सर्वांगीण हीत लक्षात घेऊन परीपुर्ण आणि कठोर असा नवीन कायदा कायदा तयार करण्याकरिता...

दौंडमध्ये मोकाट जनावरे व कुत्र्यांच्या प्रश्नावर प्रशासनाविरोधात धरणे आंदोलन; मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड,मयुर साळवे) दौंड शहरातील मोकाट जनावरे व भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, या समस्येकडे नगरपालिकेच्या प्रशासनाचे होत असलेले...

महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार; २० जुलै रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

0
जळगाव:(प्रतिनिधी : विनोद पवार) महिलांच्या विविध समस्या, तक्रारी व अडचणींचे प्रभावी आणि तातडीने निराकरण करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोमवार, २० जुलै २०२६ रोजी...

‘टाईम्स ऑफ महाराष्ट्र’ विशेष वृत्त: भारती विद्यापीठ ट्रॅफिक पोलिसांची नागरिकांवर उघड दहशत! नियमनाऐवजी ‘गाड्या...

0
पुणे: शहरात वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असताना, भारती विद्यापीठ वाहतूक विभागाचे पोलीस मात्र वाहतूक नियमन करण्याऐवजी नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यात धन्यता मानत असल्याचे धक्कादायक...

आत्मा योजनेतून सिन्नरमध्ये विदेशी भाजीपाला शेतीला चालना; नाविन्यपूर्ण पिकांमुळे शेतकऱ्यांना उत्पन्नवाढीची संधी

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड)  कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत सिन्नर तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या विदेशी भाजीपाला शेती शाळा आणि पिक प्रात्यक्षिक उपक्रमामुळे नाविन्यपूर्ण शेतीला...

महाराष्ट्रात बियाणे कायदा अधिक कठोर होणार; कृषिमंत्री भरणे यांच्या बैठकीत आमदार रणधीर सावरकरांच्या महत्त्वपूर्ण...

0
अकोला:महाराष्ट्र राज्यात बियाणे उत्पादन, विक्री , वितरण व साठवणूक याबाबत शेतकऱ्यांचे सर्वांगीण हीत लक्षात घेऊन परीपुर्ण आणि कठोर असा नवीन कायदा कायदा तयार करण्याकरिता...

दौंडमध्ये मोकाट जनावरे व कुत्र्यांच्या प्रश्नावर प्रशासनाविरोधात धरणे आंदोलन; मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड,मयुर साळवे) दौंड शहरातील मोकाट जनावरे व भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, या समस्येकडे नगरपालिकेच्या प्रशासनाचे होत असलेले...

महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार; २० जुलै रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

0
जळगाव:(प्रतिनिधी : विनोद पवार) महिलांच्या विविध समस्या, तक्रारी व अडचणींचे प्रभावी आणि तातडीने निराकरण करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोमवार, २० जुलै २०२६ रोजी...
error: Content is protected !!