Homeताज्या बातम्यागेवराई तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली १०० कोटींचे सिंडीकेट कार्यरत असल्याचा आ. विजयसिंह पंडित यांचा...

गेवराई तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली १०० कोटींचे सिंडीकेट कार्यरत असल्याचा आ. विजयसिंह पंडित यांचा आरोप

गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : घरकुल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उत्खनन सुरू असून या प्रकरणाची विशेष तपास पथक (एसआयटी) मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आमदार विजयसिंह पंडित यांनी केली आहे. शासनाच्या धोरणाचा गैरफायदा घेत गेवराई तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली सुमारे १०० कोटी रुपयांचे वाळू उपसा सिंडीकेट कार्यरत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

शनिवार, ६ जून रोजी श्री क्षेत्र राक्षसभुवन (शनिचे) येथे पत्रकार परिषदेत बोलताना आ. पंडित यांनी हा आरोप केला. त्यांनी सांगितले की, शासनाच्या विविध घरकुल योजनांतील लाभार्थ्यांना प्रत्येकी पाच ब्रास वाळू उपलब्ध करून देण्याचे धोरण आहे. त्यानुसार गेवराई पंचायत समितीसह बीड जिल्ह्यातील विविध पंचायत समित्यांकडून सुमारे १,६०० लाभार्थ्यांची यादी तहसील प्रशासनाकडे देण्यात आली आहे. या संख्येनुसार सुमारे ८ हजार ब्रास वाळू उपसा अपेक्षित असताना प्रत्यक्षात लाखो ब्रास वाळूचे उत्खनन सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

गोदावरी नदीपात्रातून मोठ्या यंत्रसामग्रीच्या साहाय्याने आणि शेकडो टिप्परद्वारे वाळूची वाहतूक केली जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. या उत्खननामुळे राक्षसभुवन येथील स्मशानभूमी, दशक्रिया विधीची जागा, मंडप व्यावसायिकांची जागा तसेच परिसरातील पुरातन मंदिरांना हानी पोहोचत असल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि ग्रामस्थांनी अनेक तक्रारी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोपही त्यांनी केला.

आ. पंडित म्हणाले की, घरकुल लाभार्थ्यांचे ओटीपी मिळविण्यासाठी दलालांची फौज कार्यरत असून काही लाभार्थ्यांना अंधारात ठेवून तर काहींना आर्थिक प्रलोभने देऊन ओटीपी गोळा केले जात आहेत. रात्रीच्या वेळी पोलीस व महसूल प्रशासनाच्या उपस्थितीत वाळू उपसा सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच तहसील प्रशासनाला सहकार्य न करणाऱ्या काही वाळू व्यावसायिकांवर वाहन जप्ती व दंडात्मक कारवाई केली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याचेही त्यांनी सांगितले.

या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी राज्य शासनाकडे लेखी निवेदनाद्वारे एसआयटी तपासाची मागणी करण्यात आल्याचे सांगून दोषींवर कारवाई होईपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचा इशाराही आ. विजयसिंह पंडित यांनी दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

झिंगानूर–सिरोंचा मुख्य रस्ता बुधवारपासून बंद; नैगुंडा नाल्यावरील रापटा पुरात वाहून गेला

0
प्रतिनिधी : (जाबिर खान) सिरोंचा झिंगानूर–सिरोंचा मुख्य मार्गावरील नैगुंडा नाल्यावरील रापटा सलग चार ते पाच दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर्णपणे उध्वस्त झाल्याने बुधवारपासून या...

जिल्हा पोलीस दलात ‘नो हेल्मेट, नो एन्ट्री’ नियम लागू; एसपी श्रीकांत धिवरे यांचा सुरक्षा...

0
विनोद पवार | जळगाव प्रतिनिधी जळगाव : रस्ते अपघातांमध्ये दुचाकीस्वारांच्या वाढत्या मृत्यूच्या घटना लक्षात घेऊन जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पोलीस दलात...

विंचूर जवळ भीषण अपघात; छोटा हत्ती चालकाचा जागीच मृत्यू, कांदा मालक शेतकरी गंभीर जखमी

0
एकेरी वाहतुकीमुळे विंचूर परिसरात अपघातांचे प्रमाण वाढले; नागरिकांकडून तातडीने उपाययोजनांची मागणी निफाड तालुक्यातील विंचूर जवळ आज गुरुवार, दि.३० दुपारी सुमारे १ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण...

संततधारेमुळे देऊळगाव राजा तालुक्यातील शेतकरी सुखावला.

0
 देऊळगाव राजा तालुका (प्रतिनिधी बबनराव नागरे) देऊळगाव राजा तालुक्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले होते.दमदार पाऊस न पडल्याने पावसाची चातकाप्रमाणे शेतकरी वाट बघत...

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे – साहित्य , शाहिरी आणि सामाजिक समतेचा अखंड लढा

0
विष्णु गायकवाड गेवराई तालुका प्रतिनिधी: महाराष्ट्राच्या सांस्कृतिक , साहित्यिक आणि सामाजिक इतिहासात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्थान अत्यंत मानाचे आहे . समाजातील उपेक्षित ,...

झिंगानूर–सिरोंचा मुख्य रस्ता बुधवारपासून बंद; नैगुंडा नाल्यावरील रापटा पुरात वाहून गेला

0
प्रतिनिधी : (जाबिर खान) सिरोंचा झिंगानूर–सिरोंचा मुख्य मार्गावरील नैगुंडा नाल्यावरील रापटा सलग चार ते पाच दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर्णपणे उध्वस्त झाल्याने बुधवारपासून या...

जिल्हा पोलीस दलात ‘नो हेल्मेट, नो एन्ट्री’ नियम लागू; एसपी श्रीकांत धिवरे यांचा सुरक्षा...

0
विनोद पवार | जळगाव प्रतिनिधी जळगाव : रस्ते अपघातांमध्ये दुचाकीस्वारांच्या वाढत्या मृत्यूच्या घटना लक्षात घेऊन जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पोलीस दलात...

विंचूर जवळ भीषण अपघात; छोटा हत्ती चालकाचा जागीच मृत्यू, कांदा मालक शेतकरी गंभीर जखमी

0
एकेरी वाहतुकीमुळे विंचूर परिसरात अपघातांचे प्रमाण वाढले; नागरिकांकडून तातडीने उपाययोजनांची मागणी निफाड तालुक्यातील विंचूर जवळ आज गुरुवार, दि.३० दुपारी सुमारे १ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण...

संततधारेमुळे देऊळगाव राजा तालुक्यातील शेतकरी सुखावला.

0
 देऊळगाव राजा तालुका (प्रतिनिधी बबनराव नागरे) देऊळगाव राजा तालुक्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले होते.दमदार पाऊस न पडल्याने पावसाची चातकाप्रमाणे शेतकरी वाट बघत...

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे – साहित्य , शाहिरी आणि सामाजिक समतेचा अखंड लढा

0
विष्णु गायकवाड गेवराई तालुका प्रतिनिधी: महाराष्ट्राच्या सांस्कृतिक , साहित्यिक आणि सामाजिक इतिहासात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्थान अत्यंत मानाचे आहे . समाजातील उपेक्षित ,...
error: Content is protected !!