Homeताज्या बातम्याशरद पवार आणि अजित पवारांच्या मुलाखतीवर जयंत पाटील म्हणाले -"त्यावर मला भाष्य...

शरद पवार आणि अजित पवारांच्या मुलाखतीवर जयंत पाटील म्हणाले -“त्यावर मला भाष्य करायचे नाही…

शरद पवार आणि अजित पवारांच्या मुलाखतीवर जयंत पाटील म्हणाले -“त्यावर मला भाष्य करायचे नाही…
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची आज सकाळी अजित पवार गटातील नेते आणि सरकारमधील सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भेट घेतली. त्यानंतर काही वेळातच अजित पवार आणि शरद पवार यांचीही प्रतापराव पवारांच्या घरी दिवाळीनिमित्त भेट झाली.

 

ज्यामुळे दोन्ही गटातील प्रमुख नेत्यांच्या लागोपाठ भेटी झाल्याने याबाबत राजकीय वर्तुळात विविध चर्चा करण्यात येत आहेत. काका-पुतण्यांच्या आजच्या भेटीवेळी सुप्रिया सुळे देखील तिथेच उपस्थित होत्या. परंतु, या भेटीबाबत जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडूनही प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

 

आजच्या या भेटीबाबत जयंत पाटील प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, मला त्यावर काही भाष्य करायचे नाही. कुटुंबाने कुठे भेटावे? काय करावे? याविषयी तुम्ही किंवा मी भाष्य करण्याची आवश्यकता नाही. मी पक्षाचा अध्यक्ष आहे. त्यामुळे पक्षाविषयी काही प्रश्न असेल तर मी जरूर उत्तर देईन. कुटुंबाने काय करावे? याविषयी मी भाष्य करणे उचित नाही, असे म्हणत त्यांनी या भेटीवर प्रतिक्रिया देणे टाळले आहे.

आज पुण्यातील मोदी बागेत शरद पवार यांची दिलीप वळसे पाटील यांनी भेट घेतली. त्यानंतर शरद पवार यांचे बंधू आणि पुण्यातील उद्योगपती प्रतापराव पाटील यांच्या घरी शरद पवार आणि अजित यांची भेट झाली. ज्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा करण्यात येत आहे. परंतु, प्रतापराव पवार यांच्या घरी झालेल्या भेटीबाबत शरद पवार यांची बहीण सरोज पाटील यांनी माहिती देत सांगितले की, आजचा दिवस खूप आनंदाचा असतो. नेहमीप्रमाणे सर्वजण एकत्र आले होते. एकमेकांची मजा, मस्करी, गप्पा रंगल्या होत्या.

तर, भाऊबीजेला दरवर्षी पवार कुटुंब एकत्र जमलेले असते. त्यामुळे या भाऊबीजेला पवार कुटुंबीय बारामतीमध्ये एकत्र येणार का? असा प्रश्न प्रसार माध्यमांनी सरोज पाटील यांना विचारला असता त्या म्हणाल्या की, बारामतीत कुटुंब एकत्र येणार नाही, मी कोल्हापूरला निघाले आहे. तर अजित पवार यांची प्रकृती आता बरी असल्याची माहिती त्यांच्याकडून यावेळी देण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

झिंगानूर–सिरोंचा मुख्य रस्ता बुधवारपासून बंद; नैगुंडा नाल्यावरील रापटा पुरात वाहून गेला

0
प्रतिनिधी : (जाबिर खान) सिरोंचा झिंगानूर–सिरोंचा मुख्य मार्गावरील नैगुंडा नाल्यावरील रापटा सलग चार ते पाच दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर्णपणे उध्वस्त झाल्याने बुधवारपासून या...

जिल्हा पोलीस दलात ‘नो हेल्मेट, नो एन्ट्री’ नियम लागू; एसपी श्रीकांत धिवरे यांचा सुरक्षा...

0
विनोद पवार | जळगाव प्रतिनिधी जळगाव : रस्ते अपघातांमध्ये दुचाकीस्वारांच्या वाढत्या मृत्यूच्या घटना लक्षात घेऊन जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पोलीस दलात...

विंचूर जवळ भीषण अपघात; छोटा हत्ती चालकाचा जागीच मृत्यू, कांदा मालक शेतकरी गंभीर जखमी

0
एकेरी वाहतुकीमुळे विंचूर परिसरात अपघातांचे प्रमाण वाढले; नागरिकांकडून तातडीने उपाययोजनांची मागणी निफाड तालुक्यातील विंचूर जवळ आज गुरुवार, दि.३० दुपारी सुमारे १ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण...

संततधारेमुळे देऊळगाव राजा तालुक्यातील शेतकरी सुखावला.

0
 देऊळगाव राजा तालुका (प्रतिनिधी बबनराव नागरे) देऊळगाव राजा तालुक्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले होते.दमदार पाऊस न पडल्याने पावसाची चातकाप्रमाणे शेतकरी वाट बघत...

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे – साहित्य , शाहिरी आणि सामाजिक समतेचा अखंड लढा

0
विष्णु गायकवाड गेवराई तालुका प्रतिनिधी: महाराष्ट्राच्या सांस्कृतिक , साहित्यिक आणि सामाजिक इतिहासात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्थान अत्यंत मानाचे आहे . समाजातील उपेक्षित ,...

झिंगानूर–सिरोंचा मुख्य रस्ता बुधवारपासून बंद; नैगुंडा नाल्यावरील रापटा पुरात वाहून गेला

0
प्रतिनिधी : (जाबिर खान) सिरोंचा झिंगानूर–सिरोंचा मुख्य मार्गावरील नैगुंडा नाल्यावरील रापटा सलग चार ते पाच दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर्णपणे उध्वस्त झाल्याने बुधवारपासून या...

जिल्हा पोलीस दलात ‘नो हेल्मेट, नो एन्ट्री’ नियम लागू; एसपी श्रीकांत धिवरे यांचा सुरक्षा...

0
विनोद पवार | जळगाव प्रतिनिधी जळगाव : रस्ते अपघातांमध्ये दुचाकीस्वारांच्या वाढत्या मृत्यूच्या घटना लक्षात घेऊन जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पोलीस दलात...

विंचूर जवळ भीषण अपघात; छोटा हत्ती चालकाचा जागीच मृत्यू, कांदा मालक शेतकरी गंभीर जखमी

0
एकेरी वाहतुकीमुळे विंचूर परिसरात अपघातांचे प्रमाण वाढले; नागरिकांकडून तातडीने उपाययोजनांची मागणी निफाड तालुक्यातील विंचूर जवळ आज गुरुवार, दि.३० दुपारी सुमारे १ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण...

संततधारेमुळे देऊळगाव राजा तालुक्यातील शेतकरी सुखावला.

0
 देऊळगाव राजा तालुका (प्रतिनिधी बबनराव नागरे) देऊळगाव राजा तालुक्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले होते.दमदार पाऊस न पडल्याने पावसाची चातकाप्रमाणे शेतकरी वाट बघत...

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे – साहित्य , शाहिरी आणि सामाजिक समतेचा अखंड लढा

0
विष्णु गायकवाड गेवराई तालुका प्रतिनिधी: महाराष्ट्राच्या सांस्कृतिक , साहित्यिक आणि सामाजिक इतिहासात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्थान अत्यंत मानाचे आहे . समाजातील उपेक्षित ,...
error: Content is protected !!