Homeताज्या बातम्यापालकमंत्र्यांच्या नियुक्तीनंतर महायुतीत धुसफूस, रायगडमध्ये भरत गोगावले नाराज

पालकमंत्र्यांच्या नियुक्तीनंतर महायुतीत धुसफूस, रायगडमध्ये भरत गोगावले नाराज

देवेंद्र फडणवीस :- यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या महायुतीच्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन महिना लोटला तरी खोळंबलेल्या जिल्ह्यांच्या पाकमंत्र्यांच्या नियुक्त्या शनिवारी जाहीर करण्यात आल्या होत्या.

नियुक्त्या जाहीर झाल्यानंतर त्यावरून महायुतीमध्ये धुसफूस सुरू झाल्याचे दिसत आहे. दरम्यान, रायगडचं पालकमंत्रिपद अदिती तटकरे यांना मिळाल्यानंतर पालकमंत्रिपदासाठी इच्छूक असलेले शिवसेना शिंदे गटातील मंत्री भरत गोगावले हे नाराज झाले आहेत. तसेच त्यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे.

रायगडचं पालकमंत्रिपद अजित पवार गटाचे नेते सुनिल तटकरे यांच्या कन्या अदिती तटकरे यांना जाहीर झाल्यानंतर शिवसैनिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना भरत गोगावले म्हणाले की, हा आमच्या मनाच्या विरुद्ध घडलेला प्रकार आहे त्यामुळे आम्ही नाराज आहोत. घरामध्ये चुलीपर्यंत सामोरा जाणारा मी एकमेव आमदार आहे, याची कार्यकर्ते, पदाधिकारी यांना खात्री आहे. त्यामुळे त्यांना जी आपुलकी आहे, भावना आहे, ती त्यांनी व्यक्त केली आहे, असे भरत गोगावले यांनी सांगितले. तसेच त्यांनी संतप्त कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन केलं.

भरत गोगावले पुढे म्हणाले की, आम्ही सरकारमध्ये आहोत. आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सल्ला दिला आहे की, कुठे उद्रेक होईल, असं काही करायचं नाही. तसेच मी एकनाथ शिंदे यांची यासंदर्भात भेट घेणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, काल झालेल्या पालकमंत्र्यांच्या नियुक्त्यांमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई आणि ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलं होतं. त्याबरोबरच गुलाबराव पाटील यांच्याकडे जळगाव, संजय राठोड यांच्याकडे यवतमाळ, उदय सामंत यांच्याकडे रत्नागिरी, शंभुराज देसाई यांच्याकडे सातारा, संजय शिरसाट यांच्याकडे छत्रपती संभाजीनगर, प्रताप सरनाईक यांच्याकडे धाराशिव, प्रकाश आबिटकर यांच्याकडे कोल्हापूरचं पालकमंत्रिपद सोपवण्यात आलं होतं. तर आशिष जयस्वाल यांच्याकडे गडचिरोलीचं सहपालकमंत्रिपद सोपवण्यात आलं होतं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मौजा भूज येथे ‘मुजरा माझ्या लावणीचा’ कार्यक्रमाची रंगत; लोककलेचा जागर

0
भूजच्या मंडईत लावणी कार्यक्रमाला रसिकांची दाद; कॉम्रेड विनोद झोडगे यांच्या हस्ते उद्घाटन ब्रम्हपुरी / प्रतिनिधी रुपेश देशमुख: तालुक्यातील मौजा भूज (पद्मापूर) येथे मंडईनिमित्त नवतरुण कला...

“विलीनिकरणाचा आम्ही विषय बंद केला” शशिकांत शिंदेंचे स्पष्ट वक्तव्य

0
Times Of Maharashtra Desk : अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. त्यांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर...

मंत्रालयातील लाचप्रकरणानंतर खळबळ; मंत्री नरहरी झिरवळ संपर्काबाहेर?

0
Times Of Maharashtra Desk : राज्याच्या प्रशासनाचे प्रमुख केंद्र असलेल्या मंत्रालयात लाच प्रकरण उघडकीस आल्याने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अन्न...

मुलुंडच्या शास्त्री रोडवर भीषण अपघात, मेट्रोचा स्लॅब कोसळला, ऑटो अन् कारचा चेंदामेंदा, एकाचा...

0
Times of Maharashtra Desk : मुंबई मुलुंड(पश्चिम)परिसरातील लाल बहादूर शास्त्री  मार्गावर शनिवारी दुपारी मेट्रो बांधकामादरम्यान भीषण अपघात घडला. बांधकाम सुरू असलेल्या मेट्रो पिलरचा सिमेंटचा...

७ वर्षांनंतरही ताज्या जखमा, पुलवामाच्या शहीदांना देशाचा कृतज्ञ नमन-पुलवामाच्या ४० वीरांना राष्ट्राचा साश्रू सलाम

0
"विसरलो नाही, विसरणार नाही!" :पुलवामाच्या जखमेला ७ वर्षे पूर्ण, ४० वीरपुत्रांना देशाचा साश्रू नयनांनी सलाम! विशेष लेख : प्रतिनिधी चैताली वर्तक :  १४ फेब्रुवारी- जगभरात...

मौजा भूज येथे ‘मुजरा माझ्या लावणीचा’ कार्यक्रमाची रंगत; लोककलेचा जागर

0
भूजच्या मंडईत लावणी कार्यक्रमाला रसिकांची दाद; कॉम्रेड विनोद झोडगे यांच्या हस्ते उद्घाटन ब्रम्हपुरी / प्रतिनिधी रुपेश देशमुख: तालुक्यातील मौजा भूज (पद्मापूर) येथे मंडईनिमित्त नवतरुण कला...

“विलीनिकरणाचा आम्ही विषय बंद केला” शशिकांत शिंदेंचे स्पष्ट वक्तव्य

0
Times Of Maharashtra Desk : अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. त्यांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर...

मंत्रालयातील लाचप्रकरणानंतर खळबळ; मंत्री नरहरी झिरवळ संपर्काबाहेर?

0
Times Of Maharashtra Desk : राज्याच्या प्रशासनाचे प्रमुख केंद्र असलेल्या मंत्रालयात लाच प्रकरण उघडकीस आल्याने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अन्न...

मुलुंडच्या शास्त्री रोडवर भीषण अपघात, मेट्रोचा स्लॅब कोसळला, ऑटो अन् कारचा चेंदामेंदा, एकाचा...

0
Times of Maharashtra Desk : मुंबई मुलुंड(पश्चिम)परिसरातील लाल बहादूर शास्त्री  मार्गावर शनिवारी दुपारी मेट्रो बांधकामादरम्यान भीषण अपघात घडला. बांधकाम सुरू असलेल्या मेट्रो पिलरचा सिमेंटचा...

७ वर्षांनंतरही ताज्या जखमा, पुलवामाच्या शहीदांना देशाचा कृतज्ञ नमन-पुलवामाच्या ४० वीरांना राष्ट्राचा साश्रू सलाम

0
"विसरलो नाही, विसरणार नाही!" :पुलवामाच्या जखमेला ७ वर्षे पूर्ण, ४० वीरपुत्रांना देशाचा साश्रू नयनांनी सलाम! विशेष लेख : प्रतिनिधी चैताली वर्तक :  १४ फेब्रुवारी- जगभरात...
error: Content is protected !!