Times of Maharashtra Desk: बांगलादेशमध्ये हिंदू तरुणांची हत्या होण्याची घटनांचा आलेख चिंतेचा आहे. सोमवारी सायंकाळी भालुका उपजिल्ह्यातील लबीब ग्रुपच्या सुलतान स्वेटर लिमिटेड कारखान्यात बजेंद्र बिस्वास नावाच्या हिंदू तरुणाचा मृत्यू झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, बजेंद्र हा कारखान्यात सुरक्षा रक्षक म्हणून तैनात होता आणि त्याचवेळी अन्सार संघटनेचा सदस्यही होता.
घटनेवेळी बजेंद्रसोबत त्याचा मुस्लिम मित्र नोमान मिया होता. पोलिसांनी सांगितले की, संभाषणाच्या दरम्यान नोमानने मजा करण्याच्या उद्देशाने बंदूक बजेंद्रकडे धरली, मात्र अनपेक्षितपणे ट्रिगर दाबला गेला. गोळी बजेंद्रच्या डाव्या मांडीला लागून त्याचा मृत्यू झाला. नोमानला पोलिसांनी अटक केली आहे. कारखान्यात सुरक्षिततेसाठी वीस अन्सार सदस्य तैनात होते आणि बजेंद्रसुद्धा त्यांच्यात होता.
ही घटना त्या जिल्ह्यातील हिंसक घटनांच्या मालिकेचा भाग ठरली आहे. फक्त दहा दिवसांपूर्वी, १८ डिसेंबर रोजी, मैमनसिंग जिल्ह्यात दीपू चंद्र दास या हिंदू तरुणाची जमावाने मारहाण करून हत्या करण्यात आली आणि मृतदेह सार्वजनिक ठिकाणी जाळला गेला होता. यापूर्वी ढाकामध्ये अमृत मंडल यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती; त्याच्यावर खंडणी घेण्याचा आरोप होता.
ह्या तीन घटनांमुळे बांगलादेशमधील अल्पसंख्याक हिंदू समुदायात मोठा घाबराट आणि असुरक्षितता पसरली आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी घटनांचे त्वरित तपास सुरू केले आहेत.






















