Homeमहाराष्ट्रBreaking News ; महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन ?आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे मोठे...

Breaking News ; महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन ?आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे मोठे विधान…

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन ? आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे मोठे विधान…
पुणे :- राज्यातील करोना रुग्णांची वाढती संख्या चिंतेचा विषय ठरत असून पुन्हा एकदा लॉकडाउन लागणार का ? हा प्रश्न सर्वसामान्यांना सतावत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन हवा की थोड्या निर्बंधासहीत मोकळेपणाने रहायचे आहे हे जनतेने ठरवावं, असं म्हटलं आहे. त्यातच आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. लॉकडाउन हा शेवटचा पर्याय असेल असं त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

मुंबईत पुन्हा कोरोना संकट.
स्थानिक जिल्हाधिकारी, आयुक्तांना पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत. त्यांच्या स्तरावर करोना नियंत्रित करण्यासाठी ज्या उपाययोजनांची आवश्यकता आहे त्या त्यांनी कराव्यात अशी सूचना आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी रुग्ण वाढत आहेत तिथे या उपाययोजना केल्या जातील. मात्र लॉकडाउन हा सर्वात शेवटचा पर्याय असेल. याचा अर्थ आपण त्याच्यावर लक्ष ठेवून आहोत. गरज लागेल त्याप्रमाणे काळजी घेतली जाईल, असं राजेश टोपे म्हणाले आहेत.

महाराष्ट्रात पुन्हा लोकडाऊन ?
पुढे ते म्हणाले की, “फार मोठी संख्या वाढली आहे अशातला भाग नाही. जरुर चार पाचशेंनी वाढते, परत दोन तीनशेंनी कमी होते. त्यामुळे दररोज अडीच तीन हजाराने रुग्ण वाढण्याचं प्रमाण गेल्या दोन महिन्यांपासून आहे. पण करोनाचा प्रभाव आता कमी झाला आहे. किरकोळ स्वरुपात वाढला आहे, नाही असं नाही. आज फक्त ३६०० आहेत, कालच्या तुलनेत कमी झालेत. त्यामुळे चिंता करण्याचा विषय नाही. पण काळजी जरुर घेतली पाहिजे”.

“जिथे खूप गर्दी असते तिथे सातत्याने करोना चाचणी करणं, अधिक कठोर पद्धतीने नियमांचं पालन करणं महत्वाचा विषय वाटतो,” असं राजेश टोपे यांनी यावेळी सांगितलं. “मुंबई लोकलचा दुसरा टप्पा सुरु झाल्यामुळे करोना रुग्ण वाढलेत अशातला भाग नाही. मुंबईच्या आयुक्तांनीही फार वाढ झालेली नाही आणि होणार नाही असं स्पष्ट केलं आहे. त्यांनी खात्री दिली आहे. पण आपल्याला काटेकोरपणे नियमांचं पालन करावं लागेलच,” यावर राजेश टोपे यांनी जोर दिला.

कोविडविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राज्यातील विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली. बैठकीत उद्धव ठाकरे यांनी काही महत्वाच्या सूचना केल्या आहेत.

– कोरोनाचा संसर्ग वाढत असेल त्या भागात किंवा परिसरात टार्गेटेड पद्धतीने तपासण्या करा, एकेका रुग्णांचे किमान २० तरी संपर्क शोधलेच पाहिजेत.
– सर्व काही व्यवहार सुरू झाले आहेत, निर्बंध शिथिल केले आहेत त्यामुळे तरुण वर्ग घराबाहेर पडला आहे, त्यात जणू काही कोरोना संपला असे सगळे वागत आहेत, परिणामतः आपल्याच घरातील वृद्ध व ज्येष्ठ नागरिकांना आपण धोक्यात आणतो आहोत.
– मधल्या काळात आपण माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम राबवून राज्याचा आरोग्य नकाशा तयार केला. यातील सह व्याधी रुग्णांची परत आरोग्य कर्मचाऱ्यांनी विचारपूस सुरू करा.
– ज्या ज्या व्यावसायिक संस्था, संघटना लॉक डाऊन उठविण्यासाठी आपणाकडे येत होत्या त्या सर्व संबंधित संस्था, संघटना यांच्याशी परत एकदा बोलून एसओपीची काटेकोर अंमलबजावणी होईल याची खात्री करून घ्या.
– जिथे कंटेनमेंट आवश्यक आहे तिथे ते करा व त्याची अंमलबजावणी करा.
– गेले वर्षभर आपण कोरोनाशी लढतांना विविध क्षेत्रांसाठी नियम ( एसओपी) ठरविली आहे, मात्र त्याची अंमलबजावणी होतांना दिसत नाही हे गंभीर आहे.
– विशेषतः इतके दिवस थांबलेले लग्न समारंभ सुरू झाले आहेत, लोकांच्या गाठीभेटी, पार्ट्या व इतर सामाजिक कार्यक्रम कुठल्याही आरोग्याच्या नियमविना होतांना दिसतात.
– उपहारगृह, हॉटेल्सच्या वेळा आपण वाढविल्या आहेत मात्र नियमांचे पालन होताना दिसत नाही.
– स्थानिक प्रशासनाच्या पथकांनी अशा सर्व ठिकाणी भेटी देऊन तत्काळ कारवाई केली पाहिजे.
– ज्या विवाह किंवा इतर समारंभात मास्क व इतर नियम पाळलेले दिसणार नाहीत त्या हॉल्स किंवा सभागृहांवर परवाने रद्द करण्याची कडक कारवाई प्रसंगी केली पाहिजे.
– लोकांमध्ये बेफिकिरी आली असली तरी स्थानिक प्रशासन व पोलिसांत कर्तव्यात ढिलाई नको.
– हॉटेल्स, उपाहारगृहे यांना वेळा वाढवून दिल्या आगेत मात्र नियम पाळत नसतील तर लगेच कडक कारवाई करा.
– सार्वजनिक ठिकाणी पालिकांनी जंतुनाशक फवारणी नियमित करणे सुरू करावी.
– गावागावात जाऊन फिरत्या वाहनाद्वारे लोकांच्या चाचण्या वाढवा.
ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या फिल्ड हॉस्पिटलमधील सर्व यंत्रणा व्यवस्थित सुरू आहेत का याची खात्री करा.ही सुविधा वापरण्याची वेळ येऊ नये पण तयारीत राहा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आरोग्य आणि संस्कृती हेच समाजरचनेचे दोन आधारस्तंभ – आ.डॉ.गुट्टे

0
परभणी (जिल्हा प्रतिनिधी अनिल शेटे) : मानवी जीवन समृद्ध, सुसंस्कृत आणि आनंदी बनविण्यासाठी आरोग्य आणि संस्कृती या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. निरोगी...

उल्हासनगर सरकारी रुग्णालयाचा भोंगळ कारभार उघड; ऑपरेशनसाठी चार वेळा उपाशी ठेवूनही शस्त्रक्रिया लांबणीवर

0
ठाणे : उल्हासनगर येथील शासकीय जिल्हा मध्यवर्ती रुग्णालयातील कथित गलथान कारभारामुळे पुन्हा एकदा आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. राजकुमार पासी या रुग्णाला शस्त्रक्रियेच्या...

सिरोंचा पोलीस उपविभागाकडून गरजू युवतीस विवाहासाठी आर्थिक मदत

0
गडचिरोली (प्रतिनिधि जाबिर खान): गडचिरोली जिल्हा पोलीस दलामार्फत श्री.एम. रमेश पोलीस अधीक्षक गडचिरोली, श्री.कार्तिक मधिरा मा.अपर पोलीस अधीक्षक (अभियान)तसेच श्री गोकुल राजजी अपर पोलीस...

नागपुरातपहिल्यांदाचउलगडणार ‘क्रांतिज्योतीसावित्रीबाईफुले’ यांच्याजीवनावरीलमहानाट्य!

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड): स्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या आणि समाजाला अंधकारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास आता रंगमंचावर जिवंत...

ईद-उल-अजहा निमित्त सिरोंचा पोलीस स्टेशनमध्ये शांतता व कायदा सुव्यवस्थेबाबत बैठक

0
(तालुका प्रतिनिधी जाबिर खान): दि. 26 मे 2026 रोजी सिरोंचा पोलीस स्टेशन येथे SDPO संदेश नाईक आणि M.K. नांदे यांच्या उपस्थितीत ईद-उल-अजहा (बकरी...

आरोग्य आणि संस्कृती हेच समाजरचनेचे दोन आधारस्तंभ – आ.डॉ.गुट्टे

0
परभणी (जिल्हा प्रतिनिधी अनिल शेटे) : मानवी जीवन समृद्ध, सुसंस्कृत आणि आनंदी बनविण्यासाठी आरोग्य आणि संस्कृती या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. निरोगी...

उल्हासनगर सरकारी रुग्णालयाचा भोंगळ कारभार उघड; ऑपरेशनसाठी चार वेळा उपाशी ठेवूनही शस्त्रक्रिया लांबणीवर

0
ठाणे : उल्हासनगर येथील शासकीय जिल्हा मध्यवर्ती रुग्णालयातील कथित गलथान कारभारामुळे पुन्हा एकदा आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. राजकुमार पासी या रुग्णाला शस्त्रक्रियेच्या...

सिरोंचा पोलीस उपविभागाकडून गरजू युवतीस विवाहासाठी आर्थिक मदत

0
गडचिरोली (प्रतिनिधि जाबिर खान): गडचिरोली जिल्हा पोलीस दलामार्फत श्री.एम. रमेश पोलीस अधीक्षक गडचिरोली, श्री.कार्तिक मधिरा मा.अपर पोलीस अधीक्षक (अभियान)तसेच श्री गोकुल राजजी अपर पोलीस...

नागपुरातपहिल्यांदाचउलगडणार ‘क्रांतिज्योतीसावित्रीबाईफुले’ यांच्याजीवनावरीलमहानाट्य!

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड): स्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या आणि समाजाला अंधकारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास आता रंगमंचावर जिवंत...

ईद-उल-अजहा निमित्त सिरोंचा पोलीस स्टेशनमध्ये शांतता व कायदा सुव्यवस्थेबाबत बैठक

0
(तालुका प्रतिनिधी जाबिर खान): दि. 26 मे 2026 रोजी सिरोंचा पोलीस स्टेशन येथे SDPO संदेश नाईक आणि M.K. नांदे यांच्या उपस्थितीत ईद-उल-अजहा (बकरी...
error: Content is protected !!