Homeताज्या बातम्याफडणवीसांनी पुणेकरांना दिशाभूल करणारी माहिती दिली...

फडणवीसांनी पुणेकरांना दिशाभूल करणारी माहिती दिली…

फडणवीसांनी पुणेकरांना दिशाभूल करणारी माहिती दिली…

 

पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगरमध्ये झालेल्या अपघातावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांनाही वेग आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि नंतर पत्रकार परिषद घेत सविस्तर भूमिका मांडली.

याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीपासून कठोर कारवाई करण्याच्या दृष्टीने आरोपीवर ३०४ हे कलम लावले होते, अशी माहितीही फडणवीसांनी दिली होती. मात्र फडणवीसांचा हा दावा पुणेकरांची दिशाभूल करणारा असून पोलिसांनी सुरुवातीला ३०४ अ हे कलम लावलं असल्याचा दावा करत काँग्रेस आमदार आणि लोकसभा निवडणुकीतील उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी गंभीर आरोप केले आहेत.

रवींद्र धंगेकर यांनी ‘एक्स’वर पोस्ट लिहीत म्हटलं आहे की, “काल गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये पुणेकरांची दिशाभूल करणाऱ्या काही बाबी समोर आल्या आहेत. घटना घडल्यानंतर पहिल्या FIR मध्ये कलम ३०४ चा उल्लेख नाही.अर्थात ही येरवडा पोलीस स्टेशनचे पीआय व तपास अधिकारी यांनी गुन्ह्याचे गांभीर्य कमी व्हावे यासाठी केलेली पळवाट आहे का? यासाठी कुठला आर्थिक व्यवहार झाला आहे का? विशेषतः ही F.I.R प्रेसला देखील व्हायरल करण्यात आली होती,” अशा शब्दांत धंगेकर यांनी पोलीस आणि गृहमंत्र्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे.

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले होते?

पोलिसांच्या भूमिकेचा बचाव करताना काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं की, ” पोलिसांनी एफआयआर दाखल किती वाजता केला, त्याचं टायमिंग आहे. एफआयरमध्ये सुरुवातीलाच पोलिसांनी कलम ३०४ लावले आहे, ३०४ अ लावला असता तर आरोपीला सुटण्याचे सर्व पर्याय होते. मात्र पोलिसांनी तसं न करता आरोपीने केलेलं कृत्य गंभीर असल्याने त्याला अडल्ट गृहित धरून ३०४ कलम लावले. त्यामुळे याच्यावर राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं आहे. पण बाल न्याय मंडळाने दिलेला निकाल हा धक्कादायक आहे आणि आम्हाला आश्चर्यचकित करणारा आहे, हे मी उघडपणे सांगतो,” अशी भूमिका फडणवीस यांनी मांडली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वीज कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू कठोरा बुद्रुक शिवारातील घटना; परिसरात हळहळ

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): भुसावळ तालुक्यातील कठोरा बुद्रुक शिवारात शेतात पेरणीचे काम सुरू असताना अचानक झालेल्या विजेच्या कडकडाटात २१ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची...

वडसावित्री पौर्णिमेनिमित्त वडाची रोपे समितीकडे सुपूर्द करण्याचे आवाहन

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): वडसावित्री पौर्णिमेनिमित्त पूजनासाठी आणलेली वडाची रोपे जतन करणे शक्य नसल्यास ती ढगा डोंगर संवर्धन समितीकडे सुपूर्द करावीत, असे आवाहन समितीने...

वटपौर्णिमेनिमित्त वृक्षमित्र फाउंडेशनकडून वडाचे वृक्षारोपण

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): वटपौर्णिमेच्या निमित्ताने वृक्षमित्र फाउंडेशनच्या वतीने सरदवाडी रोडवरील महालक्ष्मी नगर येथील रामेश्वर महादेव मंदिर परिसरात वडाच्या रोपाचे वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा...

सीबीएसईचे तीन-भाषा धोरण जाहीर इयत्ता ७, ८, ९ च्या विद्यार्थ्यांना एकदाच दिलासा

0
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 अंतर्गत २०२६-२७ शैक्षणिक वर्षापासून तीन-भाषा धोरणाच्या अंमलबजावणीसाठी सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे सोमवारी जाहीर केली. या...

आसाम-अरुणाचलमध्ये महापुराचा कहर; २२ हजारांहून अधिक नागरिक बाधित

0
गुवाहाटी |आसाम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसाने सोमवारीही थैमान सुरूच ठेवले असून, अचानक आलेल्या पुरामुळे दोन्ही राज्यांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आसाममध्ये सहा जिल्ह्यांतील...

वीज कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू कठोरा बुद्रुक शिवारातील घटना; परिसरात हळहळ

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): भुसावळ तालुक्यातील कठोरा बुद्रुक शिवारात शेतात पेरणीचे काम सुरू असताना अचानक झालेल्या विजेच्या कडकडाटात २१ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची...

वडसावित्री पौर्णिमेनिमित्त वडाची रोपे समितीकडे सुपूर्द करण्याचे आवाहन

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): वडसावित्री पौर्णिमेनिमित्त पूजनासाठी आणलेली वडाची रोपे जतन करणे शक्य नसल्यास ती ढगा डोंगर संवर्धन समितीकडे सुपूर्द करावीत, असे आवाहन समितीने...

वटपौर्णिमेनिमित्त वृक्षमित्र फाउंडेशनकडून वडाचे वृक्षारोपण

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): वटपौर्णिमेच्या निमित्ताने वृक्षमित्र फाउंडेशनच्या वतीने सरदवाडी रोडवरील महालक्ष्मी नगर येथील रामेश्वर महादेव मंदिर परिसरात वडाच्या रोपाचे वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा...

सीबीएसईचे तीन-भाषा धोरण जाहीर इयत्ता ७, ८, ९ च्या विद्यार्थ्यांना एकदाच दिलासा

0
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 अंतर्गत २०२६-२७ शैक्षणिक वर्षापासून तीन-भाषा धोरणाच्या अंमलबजावणीसाठी सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे सोमवारी जाहीर केली. या...

आसाम-अरुणाचलमध्ये महापुराचा कहर; २२ हजारांहून अधिक नागरिक बाधित

0
गुवाहाटी |आसाम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसाने सोमवारीही थैमान सुरूच ठेवले असून, अचानक आलेल्या पुरामुळे दोन्ही राज्यांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आसाममध्ये सहा जिल्ह्यांतील...
error: Content is protected !!