Homeताज्या बातम्याओबीसीच्या फेरसर्वेक्षण करण्यास सरकारची टाळाटाळ....

ओबीसीच्या फेरसर्वेक्षण करण्यास सरकारची टाळाटाळ….

ओबीसीच्या फेरसर्वेक्षण करण्यास सरकारची टाळाटाळ….

 

पुणे : महाराष्ट्रामध्ये स्थितीला इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) व त्याचे उपवर्ग मिळून ३२ टक्के आरक्षण आहे. सदरचे आरक्षण हे घटनाबाह्य असल्याने मराठा सेवक समितीने मराठा सेवक प्रशांत भोसले यांचे माध्यमातून उच्च न्यायालय मुंबई येथे जनहित याचिका दाखल केलेली आहे.

मात्र, सरकार फेरसर्वेक्षण करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप मराठा सेवक समितीचे प्रशांत भोसले आणि प्रमोद आरसुळ यांनी पत्रकार परिषदेत केला.

ही याचिका २५ जानेवारी २०२२ रोजी दाखल केलेली आहे. महाराष्ट्रातील इतर मागास प्रवर्गात (ओबीसी) असणाऱ्या सर्व जातींची जातनिहाय जनगणना करावी, ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्यात याचे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग कायदा २००५ नुसार प्रत्येक दहा वर्षांने आवश्यक असणारे ओबीसींचे सर्वेक्षण करण्यात यावे, १९६७, १९९४, १९९५ साली ओबीसी आरक्षणाबाबत काढण्यात आलेले घटनाबाह्य व बेकायदेशीर शासन निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावेत व आरक्षणास स्थगिती द्यावी, खुल्या प्रवर्गातील ओबीसी अतिक्रमण यामुळे वाढलेले प्रतिनिधित्व तपासावे, महाराष्ट्रात आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या जातींचा इंपेरिकल डेटा सादर करावा या मुद्यांवर या याचिकेत सुनावणी सुरू आहे.

या याचिकेमध्ये महाराष्ट्र सरकार, राज्य मागासवर्ग आयोग, राष्ट्रीय मागासवर्ग आयोग यांचे सोबतच रजिस्टर जनरल तथा आयुक्त राष्ट्रीय जनगणना विभाग, आयुक्त राज्य जनगणना आयुक्त यांना देखील प्रतिवादी करण्यात आलेले आहे. राज्य सरकार कोणत्याही कामकाजाशिवाय चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या याचिका कोणाचीही मागणी नसताना आमच्या याचिकेशी जोडून वेळकाढुपणा व ओबीसी आरक्षणाचे फेरसर्वेक्षण करण्यास टाळाटाळ करत आहे. या प्रकरणात राज्याचे महाधिवक्ता यांनी प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी वेळ मागण्यात आला असून मुख्य न्यायाधीश यांनी ३ जानेवारी २०२४ रोजी पुढील सुनावणी ठेवलेली आहे, तर सरकार आणि आयोगाला त्यांचे म्हणणे १० डिसेंबर पर्यंत न्यायालयात दाखल करण्यास सांगितले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विमाननगरमध्ये निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर; रहिवाशांच्या तक्रारीनंतर मनपा ‘ॲक्शन मोड’मध्ये; टाईम्स ऑफ महाराष्ट्रच्या बातमीचा...

0
Times of Maharashtra Desk, Pune: विमाननगरमधील उच्चभ्रू वस्ती असलेल्या कोणार्क नगर, लेन क्रमांक १३ परिसरात नियम धाब्यावर बसवून निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर होत असल्याचा...

गेवराईत श्रीमद् भागवत कथेचा भव्य सोहळा; २६ एप्रिलपासून दसरा मैदानावर आध्यात्मिक मेजवानी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई शहरातील दसरा मैदानावर दिव्य ज्योती जागृती संस्थानच्या वतीने श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले असून,...

आवलगावच्या शिरपेचात मानाचा तुरा; युवा उद्योजक जमीर पठाण यांना ‘महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कार

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :  जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील आवलगाव येथील युवा उद्योजक जमीर सुलेमान खान पठाण यांनी आपल्या मेहनत, जिद्द आणि गुणवत्तेच्या जोरावर उल्लेखनीय यश...

माणगावातील ‘ओमकार रेसिडेन्सी’ लॉजमध्ये तरुणीचा संशयास्पद मृत्यू; संशयित फरार

0
माणगांव (प्रतिनिधी जहेंद्र मुंढे) : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील ‘ओमकार रेसिडेन्सी’ या लॉजमध्ये एका तरुणीचा...

वाडा तालुक्यात फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

0
पालघर (प्रतिनिधी आशितोष गावंडे) :  जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कोनसाईत परिसरात अनधिकृत फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत एका...

विमाननगरमध्ये निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर; रहिवाशांच्या तक्रारीनंतर मनपा ‘ॲक्शन मोड’मध्ये; टाईम्स ऑफ महाराष्ट्रच्या बातमीचा...

0
Times of Maharashtra Desk, Pune: विमाननगरमधील उच्चभ्रू वस्ती असलेल्या कोणार्क नगर, लेन क्रमांक १३ परिसरात नियम धाब्यावर बसवून निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर होत असल्याचा...

गेवराईत श्रीमद् भागवत कथेचा भव्य सोहळा; २६ एप्रिलपासून दसरा मैदानावर आध्यात्मिक मेजवानी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई शहरातील दसरा मैदानावर दिव्य ज्योती जागृती संस्थानच्या वतीने श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले असून,...

आवलगावच्या शिरपेचात मानाचा तुरा; युवा उद्योजक जमीर पठाण यांना ‘महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कार

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :  जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील आवलगाव येथील युवा उद्योजक जमीर सुलेमान खान पठाण यांनी आपल्या मेहनत, जिद्द आणि गुणवत्तेच्या जोरावर उल्लेखनीय यश...

माणगावातील ‘ओमकार रेसिडेन्सी’ लॉजमध्ये तरुणीचा संशयास्पद मृत्यू; संशयित फरार

0
माणगांव (प्रतिनिधी जहेंद्र मुंढे) : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील ‘ओमकार रेसिडेन्सी’ या लॉजमध्ये एका तरुणीचा...

वाडा तालुक्यात फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

0
पालघर (प्रतिनिधी आशितोष गावंडे) :  जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कोनसाईत परिसरात अनधिकृत फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत एका...
error: Content is protected !!