Homeताज्या बातम्याक्रांतिवीर ज्युनिअर कॉलेज म्हसवडचा एचएससी निकालात झळाळता यश; ९८% निकालाची परंपरा कायम

क्रांतिवीर ज्युनिअर कॉलेज म्हसवडचा एचएससी निकालात झळाळता यश; ९८% निकालाची परंपरा कायम

म्हसवड (प्रतिनिधी महेश कांबळे) :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या एचएससी परीक्षा २०२६ चा निकाल नुकताच जाहीर झाला असून, म्हसवड येथील क्रांतिवीर ज्युनिअर कॉलेजने यंदाही उज्वल यश संपादन करत आपली यशाची परंपरा कायम ठेवली आहे. विज्ञान शाखेमध्ये कुमारी सेजल प्रवीण फडतरे हिने ८० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे.

क्रांतिवीर शैक्षणिक संकुलांतर्गत येणाऱ्या या कॉलेजचा एकूण निकाल तब्बल ९८ टक्के लागला असून, परिसरात सर्वाधिक टक्केवारी मिळवण्याचा मानही संस्थेने मिळवला आहे. द्वितीय क्रमांक ओम दत्तात्रय लांब (७२ टक्के) याने मिळवला, तर तृतीय क्रमांक सौरभ शांताराम घुटुकडे (७० टक्के) याने पटकावला.

विद्यार्थ्यांनी विषयानिहायही उत्कृष्ट कामगिरी नोंदवली आहे. क्रॉप सायन्स या विषयात २०० पैकी १८९ गुण मिळवत अनुजा दिपक जावीर हिने प्रथम क्रमांक मिळवला. शिवानी दिलीप कापसे (१८७ गुण) हिने द्वितीय, तर आशा सुखदेव खांडेकर (१८१ गुण) हिने तृतीय क्रमांक पटकावला.

माहिती व तंत्रज्ञान विषयात १०० पैकी ९७ गुण मिळवत मेधा कृष्णराज जाधव हिने प्रथम क्रमांक मिळवला. सौरभ शांताराम घुटुकडे आणि नेत्रा मनोज सरतापे यांनी प्रत्येकी ९६ गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळवला, तर अविनाश दत्तात्रय कलढोणे (९२ गुण) तृतीय क्रमांकावर राहिला.

या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर, सचिव सौ. सुलोचना बाबर, उपाध्यक्ष ॲड. इंद्रजीत बाबर, संचालक तात्यासाहेब औताडे, प्राध्यापिका शरयू देवकर, सौ. हर्षदा इंद्रजीत बाबर तसेच प्राचार्य विठ्ठल लवटे आणि सर्व शिक्षकवर्ग यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. पालकांनीही विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले.

क्रांतिवीर ज्युनिअर कॉलेजने केवळ शैक्षणिक गुणवत्ताच नव्हे तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे. म्हसवड पंचक्रोशीत सर्वाधिक निकाल आणि उच्च वैयक्तिक टक्केवारी मिळवत या कॉलेजने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तुलंगा बुद्रुक दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तात्काळ १ लाखांची मदत जाहीर

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव) : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील तुलंगा बुद्रुक येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत नदीमध्ये बुडून दिलीप मुंडे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे...

कंप्लेशन प्रमाणपत्राशिवाय फ्लॅट नोंदणीचा धंदा : चंद्रपुरात अवैध बांधकामांना प्रशासनाचे मूक संरक्षण?

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर शहरात सध्या बांधकाम व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेला प्रकार हा केवळ नियमभंग नाही, तर सामान्य नागरिकांच्या आयुष्यभराच्या कमाईशी खेळणारा...

गेवराईतील श्री समर्थ पार्क परिसरात विद्युत रोहित्र बसविण्याची मागणी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई शहराचा विस्तार दिवसेंदिवस मोठ्या वेगाने होत असताना ताकडगाव रोड परिसरातील श्री समर्थ पार्क, मातोश्री पार्क तसेच माधव नगर...

राखीव उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून बाहेर ढकलणे म्हणजे सामाजिक न्यायावर घाला!

0
मुंबई (प्रतिनिधी निलेश ठाकरे)  : राज्य सरकारने राखीव प्रवर्गातील उमेदवारांसंदर्भात घेतलेला नवा निर्णय आता मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव किंवा...

वच्छालाबाई रामकिसन गलधर यांचे दुःखद निधन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  तालुक्यातील धुमेगाव येथील रहिवासी वच्छालाबाई रामकिसन गलधर (वय ९६) यांचे मंगळवार दि. १२ मे रोजी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या...

तुलंगा बुद्रुक दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तात्काळ १ लाखांची मदत जाहीर

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव) : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील तुलंगा बुद्रुक येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत नदीमध्ये बुडून दिलीप मुंडे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे...

कंप्लेशन प्रमाणपत्राशिवाय फ्लॅट नोंदणीचा धंदा : चंद्रपुरात अवैध बांधकामांना प्रशासनाचे मूक संरक्षण?

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर शहरात सध्या बांधकाम व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेला प्रकार हा केवळ नियमभंग नाही, तर सामान्य नागरिकांच्या आयुष्यभराच्या कमाईशी खेळणारा...

गेवराईतील श्री समर्थ पार्क परिसरात विद्युत रोहित्र बसविण्याची मागणी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई शहराचा विस्तार दिवसेंदिवस मोठ्या वेगाने होत असताना ताकडगाव रोड परिसरातील श्री समर्थ पार्क, मातोश्री पार्क तसेच माधव नगर...

राखीव उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून बाहेर ढकलणे म्हणजे सामाजिक न्यायावर घाला!

0
मुंबई (प्रतिनिधी निलेश ठाकरे)  : राज्य सरकारने राखीव प्रवर्गातील उमेदवारांसंदर्भात घेतलेला नवा निर्णय आता मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव किंवा...

वच्छालाबाई रामकिसन गलधर यांचे दुःखद निधन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  तालुक्यातील धुमेगाव येथील रहिवासी वच्छालाबाई रामकिसन गलधर (वय ९६) यांचे मंगळवार दि. १२ मे रोजी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या...
error: Content is protected !!