Homeताज्या बातम्याआज लोकसभेचे बिगुल वाजणार दुपारी 3 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद.

आज लोकसभेचे बिगुल वाजणार दुपारी 3 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद.

 

आज लोकसभेचे बिगुल वाजणार दुपारी ३ वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद…

 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. राजकीय पक्षांसह देशातील जनताही मतदानाच्या तारखांची आतुरतेने वाट पाहत आहे. बहुप्रतीक्षित लोकसभा निवडणुकीचे बिगुल आज वाजणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयुक्त शनिवार १६ मार्च रोजी दुपारी 3 वाजता लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा करणार आहेत. त्याचवेळी चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखाही जाहीर होण्याची शक्यता आहे.

देशभरातील लोकसभेची निवडणूक किती टप्प्यात पार पडणार, कुठल्या राज्यात कधी मतदान होणार, कुठल्या दिवशी निकाल जाहीर होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. मतदान आणि निवडणूक प्रक्रियेबाबत काही नावीन्यपूर्ण घोषणा होणार का, याचीही उत्सुकता लागून राहिली आहे. ही प्रतीक्षा आता संपली आहे. निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद उद्या होणार आहे. आयोगाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या पत्रकार परिषदेचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

या राज्यांत विधानसभा निवडणूक

लोकसभेबरोबर आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, ओडिशा आणि सिक्कीम या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. जम्मू-कश्मीरमध्येही विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे.

केंद्रातील सत्ताधारी भाजपने ‘अबकी बार ४०० पार’चा नारा देत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात तिसऱयांदा सत्तेत येण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. तर देशभरातील सर्व विरोधी पक्षांनी इंडिया आघाडीच्या माध्यमातून एकत्र येत मोदी सरकारची हुकूमशाही राजवट उलथवून लावण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यावर खऱया अर्थाने देशात लोकशाहीचा महासंग्राम सुरू होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक अहमद शेख यांचे निधन…

0
पुण्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक अहमद शेख यांचे निधन... पुणे (संपादक मुज्जम्मील शेख) : भवानी पेठ कॅम्प परिसरातील विशाल अपार्टमेंटमध्ये राहणारे सामाजिक कार्यकर्ते आणि व...

‘निसर्ग वाचवा, गाव वाचवा’ तोंडोळीत अवैध वृक्षतोडीविरोधात तरुणांचा एल्गार

0
विकास चव्हाण ( पुणे प्रतिनिधी ) : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तोंडोळी ग्रामपंचायत हद्दीत सध्या अवैध वृक्षतोडीमुळे गंभीर पर्यावरणीय संकट निर्माण होत आहे. गेल्या...

यूपीएससीत यश संपादन केलेल्या कु. शिवम वखरे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान

0
जळगाव  (प्रतिनिधी  विनोद पवार) : जळगाव जिल्ह्याचे आदरणीय जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे (IAS) यांच्या हस्ते जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात यूपीएससी २०२५ परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

PMC: पुणे महानगरपालिकेत ‘प्रभारी’ राजचा उच्छाद! पात्रता नसताना योगेश हेंद्रेंना रेड कार्पेट?

0
Times of Maharashtra Desk, Pune: एकीकडे सुशिक्षित तरुण नोकरीसाठी वणवण भटकत असताना, पुणे महानगरपालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागात मात्र नियमांची अक्षरशः पायमल्ली होत असल्याचे...

गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात ‘आधार’ आणि ‘सेतू’ केंद्र वाटपात कोट्यवधींचा महाघोटाळा; नियमांची पायमल्ली करत अपात्रांना...

0
Times Of Maharashtra Desk ,Gondia: महाराष्ट्र शासनाच्या पारदर्शक कारभाराला हरताळ फासत गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत असलेल्या माहिती तंत्रज्ञान (DIT) विभाग आणि महा-IT च्या काही अधिकाऱ्यांनी...

पुण्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक अहमद शेख यांचे निधन…

0
पुण्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक अहमद शेख यांचे निधन... पुणे (संपादक मुज्जम्मील शेख) : भवानी पेठ कॅम्प परिसरातील विशाल अपार्टमेंटमध्ये राहणारे सामाजिक कार्यकर्ते आणि व...

‘निसर्ग वाचवा, गाव वाचवा’ तोंडोळीत अवैध वृक्षतोडीविरोधात तरुणांचा एल्गार

0
विकास चव्हाण ( पुणे प्रतिनिधी ) : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तोंडोळी ग्रामपंचायत हद्दीत सध्या अवैध वृक्षतोडीमुळे गंभीर पर्यावरणीय संकट निर्माण होत आहे. गेल्या...

यूपीएससीत यश संपादन केलेल्या कु. शिवम वखरे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान

0
जळगाव  (प्रतिनिधी  विनोद पवार) : जळगाव जिल्ह्याचे आदरणीय जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे (IAS) यांच्या हस्ते जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात यूपीएससी २०२५ परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

PMC: पुणे महानगरपालिकेत ‘प्रभारी’ राजचा उच्छाद! पात्रता नसताना योगेश हेंद्रेंना रेड कार्पेट?

0
Times of Maharashtra Desk, Pune: एकीकडे सुशिक्षित तरुण नोकरीसाठी वणवण भटकत असताना, पुणे महानगरपालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागात मात्र नियमांची अक्षरशः पायमल्ली होत असल्याचे...

गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात ‘आधार’ आणि ‘सेतू’ केंद्र वाटपात कोट्यवधींचा महाघोटाळा; नियमांची पायमल्ली करत अपात्रांना...

0
Times Of Maharashtra Desk ,Gondia: महाराष्ट्र शासनाच्या पारदर्शक कारभाराला हरताळ फासत गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत असलेल्या माहिती तंत्रज्ञान (DIT) विभाग आणि महा-IT च्या काही अधिकाऱ्यांनी...
error: Content is protected !!