Times of Maharastra Desk, Nashik Accident: काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी रास्ते निसरडे झाले असून आपघातांचा धोका निर्माण झाला आहे. बुधवारी नाशिक मधील येवला तालुक्यात असाच एक आपघात घडला आहे. नाशिक ते सांभाजीनगर हा महामार्ग येवला तालुक्यतून जातो, आणि याच महामार्गावर बुधवारी सूरत हून शिर्डीला दर्शनासाठी निघालेल्या गाडीचा भीषण आपघात झाला आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. या अपघातात ३ जण मृत्यू तर ४ जण जखमी झाले आहेत. जखमीना नाशिक येथे उपचारा साथी दाखल करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवस चालू असणाऱ्या पाऊसमुळे येवला तालुक्यातील या महामार्गावर पाणी सचून बऱ्याच ठिकाणी खड्डे देखील पडले आहेत. सध्या सुट्ट्यांमध्ये सूरत हून शिर्डीला दर्शनासाठी जाणाऱ्या फोरचुनर गाडीच्या चलकाचे नियंत्रण सुटले आणि काही कळायच्या आत आदि उलटी झाली. येवला तालुक्यातील पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्यानमुळे तसेच पहाटे पडण्याऱ्या धुक्यामुळे रास्ता दिसेनासा होतो यामुळे पोलिसानी प्रवासींना सावकाश गाडी चलवण्याचे आव्हान केले आहे.






















