Times of Maharastra Desk, शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळवा आणि शेतकऱ्यांचे कर्ज माफ व्हावे आशा अनेक मागण्यांसाठी सोमवार २७ ऑक्टोबर पासून शतकाऱ्यांचा विराट मोर्चा सुरू आहे. या मोर्चाला ३ दिवस होत आले असून अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली हा विराट ट्रॅक्टर मोर्चा सुरू आहे. हा मोर्चा वर्ध्याच्या बुटीबोरी येथून निघाला असून बुधवारी हा मोर्चा नागपुरात दाखल झाला आहे. या मोर्चामध्ये शेकडो ट्रॅक्टर आणि हजारो बैलगाड्या सह शेतकरी सामील झाले आहेत.यामुळे नागपूर- हैदराबाद महामार्ग सकाळपासून जाम झाला होता. दुपारी १२ वाजेपर्यन्त योग्य तोडगा न मिळयालयास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या “रामगिरी” बंगल्यावर मोर्चा वाळवून संपूर्ण रास्ता जाम कारू असे आवाहन बच्चू कडू यांनी सरकारला दिले होते. आणि आता या वर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेद्वारे उत्तर दिले आहे.
नेमके काय म्हणाले मुख्यमंत्री
दुपारी १ च्या सुमारास घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले यावर चर्चा चालू आहे लवकरच या वर तोडगा काढण्यात येईल. रास्ता आडवून प्रश्न सुटणार नाहीत. शेतकऱ्यांसंदर्भात आम्ही बैठक बोलावली होती.बच्चू कडू यांनी बैठकीसाठी मान्यताही दिली होती. आंदोलन करून प्रश्न सोडवता येत नाहीत. रस्ते अडवल्याने सामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे बच्चू कडू यांना माझे आवाहन आहे की आपण चर्चा करून हा प्रश्न सोडवावा.
मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकियावर बच्चू कडू काय म्हणाले
सरकार इथे यायला तयार नाही , आम्ही ही तिथे जाणार नाही. कर्जमाफीची आंबल बजावणी नंतर केली तरी चालेल पण त्याचा जिआर तरी आता द्या अशी मागणी बच्चू कडू यांनी सरकार कडे केली आहे. सरकार जो पर्यन्त आमच्या मागण्या मान्य करत नाही तो पर्यन्त आम्ही मुंबईला मागे जाणार नाही.
नेमक्या शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत तरी काय?
अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असणाऱ्या आंदोलनात शक्तिपीठ महामार्ग रद्द करणे, दिव्याग व्यक्तिना सहा हजार रुपये मानधन देणे आणि मेंढपाळ व मच्छीमारांना न्याय मिळवून देणे आशा मागण्या आहेत
दुपारी ४ वाजता सरकारचे प्रतिनिधी चर्चासाठी जाणार
दुपारी ४ वाजता गृहमंत्री पंकज भोयर , अर्थराज्यमंत्री जैस्वाल कडू यांच्या भेटीला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे रेल रोको आंदोलन थांबवा मंत्री आपल्या भेटीला येणार आहेत असे बच्चू कडू यांनी आंदोलकना सांगितले आहे.आता दुपारी ४ वाजताच्या बैठकीत नेमक काय बोलण होणार?, सरकार या वर काय तोडगा काढणार? हा परक्षण सर्व शेतकरी आंदोलकाना पडला आहे.






















