Homeताज्या बातम्याProfessor Recruitment : प्राध्यापक भरतीत ७५:२५ सूत्र नको; अभाविप, राज्य सरकार आमने-...

Professor Recruitment : प्राध्यापक भरतीत ७५:२५ सूत्र नको; अभाविप, राज्य सरकार आमने- सामने

Times of Maharashtra Desk, Pune : महाराष्ट्रातील सर्व अकृषी विद्यापीठांमध्ये रखडलेल्या प्राध्यापक भरतीसाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाने नुकताच एक शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. प्राध्यापक भरती पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने व्हावी या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला असला तरी, यातील एका मुद्द्यावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने तीव्र आक्षेप घेतला आहे. अभाविपने सहायक प्राध्यापक भरतीसाठी शासनाने ठेवलेले ७५:२५ चे सूत्र त्वरित रद्द करून विद्यापीठ अनुदान आयोगाने मान्यता दिलेले ५०:५० चे सूत्र अवलंबावे अशी मागणी केली आहे.

अभाविपचा आक्षेप

महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार, सहायक प्राध्यापक पदासाठी निवड होण्यासाठी ७५:२५ हे सूत्र ठेवण्यात आले आहे. या ७५ गुणांमध्ये शैक्षणिक पात्रता, शिकवण्याचा अनुभव आणि संशोधन कार्य यांचा समावेश आहे. यात ७५ पैकी किमान ५० गुण मिळाले तरच ती व्यक्ती मुलाखतीसाठी पात्र ठरणार आहे. या निर्णयानुसार केवळ सेट/नेट उत्तीर्ण झालेल्या व्यक्तीला शिकवण्याचा अनुभव आणि संशोधन कार्याचे गुण मिळणे शक्य नाही. या अटींमुळे सेट/नेट किंवा पीएचडी झालेले आणि विशेषतः ग्रामीण भागातून शिक्षण घेतलेले बहुसंख्य उमेदवार ५० गुणांची अट पूर्ण करू शकणार नाहीत. हा निर्णय नवीन सेट/नेट उत्तीर्ण झालेल्या किंवा पीएचडी झालेल्या उमेदवारांवर अन्याय करणारा असून, सहायक प्राध्यापक पदासाठीचे ५०:५० हेच नैसर्गिक सूत्र वापरावे असे अभाविपचे म्हणणे आहे.

अभाविपच्या प्रमुख मागण्या

सहायक प्राध्यापक भरतीसाठी ७५:२५ चे सूत्र न अवलंबता युजीसीने मान्यता दिलेले ५०:५० चे सूत्र त्वरित लागू करावे. शैक्षणिक पात्रतेतील दुजाभाव करणारी मानांकन पद्धती बदलण्यात यावी. सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक यांच्या भरतीसाठी ७५:२५ सूत्र योग्य असले तरी, सहायक प्राध्यापक पदाच्या संदर्भातील या अटीवर योग्य पुनर्विचार करून निर्णयात बदल करण्यात यावा. या अभाविपच्या प्रमुख मागण्या आहेत.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अथर्व कुलकर्णी यांनी शासनाने यावर योग्य निर्णय घेऊन कोणावरही अन्याय होणार नाही याची खात्री करावी आणि केवळ या मुद्द्यावर भरती प्रक्रिया रखडणार नाही याची दक्षता घ्यावी असे मत व्यक्त केले आहे. अभाविपची मुख्य भूमिका प्राध्यापक भरतीची कार्यवाही आणि अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी हीच असल्याची देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.

 

#MaharashtraNews #HigherEducation #ProfessorRecruitment #AssistantProfessor #UGCGuidelines #ABVP #ABVPMaharashtra #EducationPolicy #AcademicJobs #TransparentRecruitment #PuneUpdates #TimesOfMaharashtra #StudentsVoice #GovernmentDecision #75vs50Formula #ABVPDemands #MaharashtraUniversities

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावराजूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १३५ सूर्यनमस्कारांनी अभिवादन

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) : पालम तालुक्यातील रावराजूर येथे विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त (दि. १४ एप्रिल) विविध कार्यक्रमांचे उत्साहात...

Bopodi: बोपोडीत आंबेडकर जयंतीनिमित्त ४० फूट महाबोधी विहाराची भव्य प्रतिकृती…

0
Times Of Maharashtra Desk, Pune: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त बोपोडी येथील राजर्षी शाहू चौकात भव्य आणि आकर्षक...

NCMC कार्ड नसले तरी सवलती कायम! अफवांवर विश्वास ठेवू नका – वाहतूक निरीक्षक दीपक...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) : येथील बसस्थानकात सध्या NCMC (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) काढण्याची प्रक्रिया सुरू असताना, प्रवाशांमध्ये विविध अफवा पसरत असल्याचे दिसून येत...

जय भवानी सहकारी साखर कारखान्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवात साजरी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  गेवराई तालुक्यातील शेतकऱ्याचा केंद्रबिंदू असलेल्या जय भवानी सहकारी साखर कारखाना लिमिटेड शिवाजीनगर तालुका गेवराई जिल्हा बीड येथील कारखान्याच्या कार्यालयात कार्यस्थळावर ‘डॉ....

ही स्पर्धा ठरली खास! बीडमधील ‘जयभीम महोत्सवा’त विजेत्यांचा जल्लोष

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : बीड भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती, बीड शहर यांच्या वतीने आयोजित ‘जयभीम महोत्सव २०२६’ अंतर्गत जिल्हास्तरीय...

रावराजूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १३५ सूर्यनमस्कारांनी अभिवादन

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) : पालम तालुक्यातील रावराजूर येथे विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त (दि. १४ एप्रिल) विविध कार्यक्रमांचे उत्साहात...

Bopodi: बोपोडीत आंबेडकर जयंतीनिमित्त ४० फूट महाबोधी विहाराची भव्य प्रतिकृती…

0
Times Of Maharashtra Desk, Pune: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त बोपोडी येथील राजर्षी शाहू चौकात भव्य आणि आकर्षक...

NCMC कार्ड नसले तरी सवलती कायम! अफवांवर विश्वास ठेवू नका – वाहतूक निरीक्षक दीपक...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) : येथील बसस्थानकात सध्या NCMC (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) काढण्याची प्रक्रिया सुरू असताना, प्रवाशांमध्ये विविध अफवा पसरत असल्याचे दिसून येत...

जय भवानी सहकारी साखर कारखान्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवात साजरी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  गेवराई तालुक्यातील शेतकऱ्याचा केंद्रबिंदू असलेल्या जय भवानी सहकारी साखर कारखाना लिमिटेड शिवाजीनगर तालुका गेवराई जिल्हा बीड येथील कारखान्याच्या कार्यालयात कार्यस्थळावर ‘डॉ....

ही स्पर्धा ठरली खास! बीडमधील ‘जयभीम महोत्सवा’त विजेत्यांचा जल्लोष

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : बीड भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती, बीड शहर यांच्या वतीने आयोजित ‘जयभीम महोत्सव २०२६’ अंतर्गत जिल्हास्तरीय...
error: Content is protected !!