Times of Maharashtra Desk Pune Accident Update:आळंदी व देहू येथे सध्या कार्तिकी यात्रेसाठी महाराष्ट्रातून अनेक ठिकाणाहून वारकरी येण्याची सुरवात झाली आहे. कार्तिकी यात्रेनिमित्त अनेक छोट्या छोट्या दिंडया आळंदी येथे येत असतात. अशाच एका दिंडीवर काळाने घात केला आहे. उरण वरुन आळंदी येथे दर्शनासाठी आलेल्या दिंडीत भरधाव कंटेनर शिरल्याची घटना आज (मंगळवार)सकाळी ६ वाजतच्या सुमारास घडली. या अपघातात १ महिलेचा मृत्यू झाला असून ८ जण गंभीर जखमी झाले आहेत. प्रियंका तांडेल वय ५५ असे मृत व्यक्तीचे नाव असून ही घटना कामशेत घाटात घडली आहे.
दावजी पाटील दिंडी ही उरण येथिण आळंदी येथे जाण्यास निघाली होती. कामशेत घाटात ही दिंडी असताना सकाळी ६ च्या सुमारास एक कंटेनर जोरात वेगाने येत होता. यावेळी चलकाचे नियंत्रण सुटले आणि क्षणात तो कंटेनर त्या दिंडीत घुसला. या अपघातात ८ जण जखमी झाले असून १ का महिलेचा मृत्यू झाला आहे अशी माहिती तेथील स्थानिक पोलिसानी दिली आहे.
जखमी वारकरींना रुग्णालयात दाखल केले आसून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. ही घटना जुना मुंबई- पुणे महामार्गावर घडली असल्याने सकाळी काही वेळ या मार्गावर वाहतूक कोंडी झाली. थोड्या वेळणी पोलिसांच्या नियोजन पद्धतीमुळे ही वाहतूक कोंडी सुरळीत झाली आहे. वारीत घडलेल्या या घटनेनंतर असा अपघात पुन्हा होऊ नये म्हणून आळंदी व देहू येथील काही रस्त्यावर अवजड वाहनाना बंदी घालण्यात आली असून त्यांच्यासाठी पर्यायी रस्त्यांचे नियोजन केले आहे. तसेच या भगत पोलिस बंदोबस्त देखील करण्यात आला आहे.



















