Homeताज्या बातम्याराज्यावर अवकाळी पावसाचे सावट; 'या' जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' जारी

राज्यावर अवकाळी पावसाचे सावट; ‘या’ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी

पुणे : फेंगल चक्रीवादळामुळे राज्यासह देशातील वातावरण बदलाने राज्यावर अवकाळी पावसाचे सावट आहे. पुढील चार ते पाच दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.

सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

फेंगल चक्रीवादळ तामीळनाडू व पुद्दुचेरीच्या उत्तर किनारपट्टीवर स्थिर आहे. त्याची वाटचाल कमी वेगाने पश्चिमेकडे होत असून, पुढील काही तासात यया चक्रीवादळाची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, या चक्रीवादळामुळे अवकाळी पावसाने हजेरी लावली असून, त्याचा परिणाम कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भातील होईल. पुढील दोन दिवस राज्यातील हवामान कोरडे तर दुपारनंतर ढगाळ वातावरण असेल.

दि. २ ते ५ डिसेंबर दरम्यान, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सातारा या जिल्ह्यासह घाटमाथा परिसरात विजांच्या कडकडाटासह पावसाच्या हलक्या ते जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे. यावेळी वारे ३० ते ४० ताशी वेगाने वाहतील. या परिणामाने धाराशिव, रायगड, सांगली, सोलापूर, पुणे, रायगड, नांदेड, लातूर या जिल्ह्यांमध्येही मेघगर्जनेसह पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे.

थडीची लाट काहीशी ओसरली

हवामानातील बदल आणि अवकाळी पावसामुळे गेल्या २४ तासांत राज्यातील कमाल व किमान तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्रात आलेली थंडीची लाट काहीशी ओसरली असून, पुढील तीन ते चार दिवस राज्यातील तापमानात वाढ होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गढी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा

0
विष्णू गायकवाड ( गेवराई प्रतिनिधी ) :  तालुक्यातील गढी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गढी येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला....

घरगुती गॅस सिलेंडरच्या अवैध वापरावर ब्रम्हपुरी तालुका प्रशासनाची धडक कारवाई

0
रुपेश देशमुख  ( ब्रम्हपुरी प्रतिनिधी ) : सध्याच्या जागतिक तणावपूर्ण परिस्थितीमुळे भविष्यात इंधनाच्या तुटवड्याची शक्यता लक्षात घेता ब्रम्हपुरी तालुका प्रशासन सतर्क झाले असून घरगुती...

डॉ. विजय सूर्यवंशी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नवे आयुक्त

0
Times Of Maharashtra Desk : राज्य शासनाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तपदी आयएएस अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांची नियुक्ती केली आहे. सध्या ते कोकण विभागीय आयुक्त...

भाजपचा आरोप धादांत खोटा; ब्रम्हपुरी नगरपरिषदेचा अर्थसंकल्प विकासाभिमुखच

0
रुपेश देशमुख(प्रतिनिधी ब्रम्हपुरी ) : नगरपरिषदेच्या अर्थसंकल्पाबाबत भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी केलेले आरोप तथ्यहीन आणि राजकीय हेतूने प्रेरित असून, त्याद्वारे जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा...

मध्यरात्रीचा ‘सत्याग्रह’ दडपण्याचा प्रयत्न : लोहारडोंगरी खाण प्रकरणात पोलिसांच्या कारवाईने निर्माण केले गंभीर प्रश्न.

0
निलेश ठाकरे (टाईम्स ऑफ महाराष्ट्र स्टेट न्युज हेड) : लोकशाही व्यवस्थेत एखाद्या प्रश्नावर संविधानिक मार्गाने आंदोलन करणे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. परंतु...

गढी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा

0
विष्णू गायकवाड ( गेवराई प्रतिनिधी ) :  तालुक्यातील गढी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गढी येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला....

घरगुती गॅस सिलेंडरच्या अवैध वापरावर ब्रम्हपुरी तालुका प्रशासनाची धडक कारवाई

0
रुपेश देशमुख  ( ब्रम्हपुरी प्रतिनिधी ) : सध्याच्या जागतिक तणावपूर्ण परिस्थितीमुळे भविष्यात इंधनाच्या तुटवड्याची शक्यता लक्षात घेता ब्रम्हपुरी तालुका प्रशासन सतर्क झाले असून घरगुती...

डॉ. विजय सूर्यवंशी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नवे आयुक्त

0
Times Of Maharashtra Desk : राज्य शासनाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तपदी आयएएस अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांची नियुक्ती केली आहे. सध्या ते कोकण विभागीय आयुक्त...

भाजपचा आरोप धादांत खोटा; ब्रम्हपुरी नगरपरिषदेचा अर्थसंकल्प विकासाभिमुखच

0
रुपेश देशमुख(प्रतिनिधी ब्रम्हपुरी ) : नगरपरिषदेच्या अर्थसंकल्पाबाबत भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी केलेले आरोप तथ्यहीन आणि राजकीय हेतूने प्रेरित असून, त्याद्वारे जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा...

मध्यरात्रीचा ‘सत्याग्रह’ दडपण्याचा प्रयत्न : लोहारडोंगरी खाण प्रकरणात पोलिसांच्या कारवाईने निर्माण केले गंभीर प्रश्न.

0
निलेश ठाकरे (टाईम्स ऑफ महाराष्ट्र स्टेट न्युज हेड) : लोकशाही व्यवस्थेत एखाद्या प्रश्नावर संविधानिक मार्गाने आंदोलन करणे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. परंतु...
error: Content is protected !!