Homeक्राईम२५ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेत मोठा घोटाळा? पूर्ण पैसे अदा, काम मात्र अपूर्ण!

२५ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेत मोठा घोटाळा? पूर्ण पैसे अदा, काम मात्र अपूर्ण!

जळगाव (प्रतिनिधी विनोद सुधाकर पवार):
जळगाव जिल्ह्यातील वरणगाव नगरपालिकेच्या हद्दीत राबविण्यात येत असलेल्या तब्बल २५ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेत मोठ्या आर्थिक अनियमिततेचा संशय निर्माण झाला असून, काम पूर्ण होण्यापूर्वीच ठेकेदाराला संपूर्ण रक्कम अदा केल्याचा गंभीर आरोप पुढे आला आहे. या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली असून, नागरिकांमधून संतापाची लाट उसळली आहे.

या योजनेअंतर्गत शहरातील विविध भागांत जलकुंभ उभारणी, पाईपलाईन टाकणे आणि नळजोडणीची कामे हाती घेण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र सुमारे ६० टक्केच काम पूर्ण झाले असून, उर्वरित ४० टक्के काम अद्याप प्रलंबित असल्याचे समोर आले आहे. असे असतानाही संबंधित ठेकेदार कंपनीला कोट्यवधींचे पूर्ण देयक अदा करण्यात आल्याने या व्यवहारावर संशयाचे सावट गडद झाले आहे.

या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे तत्कालीन मुख्याधिकारी रवींद्र सोनवणे यांच्या बदलीनंतरही त्यांच्या स्वाक्षरीनेच देयक मंजूर झाल्याचे उघड झाले आहे. यामुळे प्रशासनातील कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, निर्णय प्रक्रियेतील पारदर्शकतेवरही शंका व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या प्रकरणी शिवसेना पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना निवेदन देण्यात आले असून, संपूर्ण प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी स्वतंत्र चौकशी समिती नेमून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशीही मागणी पुढे आली आहे.

याशिवाय, नगरपरिषदेमध्ये विषय समिती किंवा सर्वसाधारण सभेची मंजुरी न घेता थेट देयक मंजूर करण्यात आल्याचा आरोप होत आहे. यामुळे लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता प्रशासनाने निर्णय घेतल्याचे बोलले जात असून, लोकशाही प्रक्रियेचा अवमान झाल्याची टीका होत आहे.

शहरातील प्रतापनगर, विकास कॉलनी, पवन नगर आणि सिद्धेश्वर नगर या भागांमध्ये अद्याप जलकुंभ व पाईपलाईनची कामे अपूर्ण असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नागरिकांना पाणीपुरवठ्याचा त्रास सहन करावा लागत असून, उर्वरित कामे वेळेत पूर्ण होतील का याबाबत मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
सदर प्रकरणात पारदर्शकतेचा अभाव दिसून येत असून, सार्वजनिक निधीच्या वापराबाबत गंभीर शंका उपस्थित झाल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण व्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. नागरिकांचे पैसे वाया जाऊ नयेत आणि विकासकामे वेळेत पूर्ण व्हावीत, यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.

निवेदनावर शिवसेनेच्या गटनेत्या तृप्ती समाधान महाजन, उपजिल्हाप्रमुख विलास भाऊ मुळे, भुसावळ विधानसभा प्रमुख संतोष माळी, तालुका समन्वयक सुरेश चौधरी तसेच नगरसेवक विनोद झोपे, राजेंद्र चौधरी व इरफान खाटीक यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.विकास कामांमध्ये पारदर्शकता राखली असून आरोप निराधार आहेत,असे नगराध्यक्ष सुनील काळे यांनी ठामपणे सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तुलंगा बुद्रुक दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तात्काळ १ लाखांची मदत जाहीर

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव) : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील तुलंगा बुद्रुक येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत नदीमध्ये बुडून दिलीप मुंडे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे...

कंप्लेशन प्रमाणपत्राशिवाय फ्लॅट नोंदणीचा धंदा : चंद्रपुरात अवैध बांधकामांना प्रशासनाचे मूक संरक्षण?

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर शहरात सध्या बांधकाम व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेला प्रकार हा केवळ नियमभंग नाही, तर सामान्य नागरिकांच्या आयुष्यभराच्या कमाईशी खेळणारा...

गेवराईतील श्री समर्थ पार्क परिसरात विद्युत रोहित्र बसविण्याची मागणी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई शहराचा विस्तार दिवसेंदिवस मोठ्या वेगाने होत असताना ताकडगाव रोड परिसरातील श्री समर्थ पार्क, मातोश्री पार्क तसेच माधव नगर...

राखीव उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून बाहेर ढकलणे म्हणजे सामाजिक न्यायावर घाला!

0
मुंबई (प्रतिनिधी निलेश ठाकरे)  : राज्य सरकारने राखीव प्रवर्गातील उमेदवारांसंदर्भात घेतलेला नवा निर्णय आता मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव किंवा...

वच्छालाबाई रामकिसन गलधर यांचे दुःखद निधन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  तालुक्यातील धुमेगाव येथील रहिवासी वच्छालाबाई रामकिसन गलधर (वय ९६) यांचे मंगळवार दि. १२ मे रोजी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या...

तुलंगा बुद्रुक दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तात्काळ १ लाखांची मदत जाहीर

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव) : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील तुलंगा बुद्रुक येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत नदीमध्ये बुडून दिलीप मुंडे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे...

कंप्लेशन प्रमाणपत्राशिवाय फ्लॅट नोंदणीचा धंदा : चंद्रपुरात अवैध बांधकामांना प्रशासनाचे मूक संरक्षण?

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर शहरात सध्या बांधकाम व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेला प्रकार हा केवळ नियमभंग नाही, तर सामान्य नागरिकांच्या आयुष्यभराच्या कमाईशी खेळणारा...

गेवराईतील श्री समर्थ पार्क परिसरात विद्युत रोहित्र बसविण्याची मागणी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई शहराचा विस्तार दिवसेंदिवस मोठ्या वेगाने होत असताना ताकडगाव रोड परिसरातील श्री समर्थ पार्क, मातोश्री पार्क तसेच माधव नगर...

राखीव उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून बाहेर ढकलणे म्हणजे सामाजिक न्यायावर घाला!

0
मुंबई (प्रतिनिधी निलेश ठाकरे)  : राज्य सरकारने राखीव प्रवर्गातील उमेदवारांसंदर्भात घेतलेला नवा निर्णय आता मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव किंवा...

वच्छालाबाई रामकिसन गलधर यांचे दुःखद निधन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  तालुक्यातील धुमेगाव येथील रहिवासी वच्छालाबाई रामकिसन गलधर (वय ९६) यांचे मंगळवार दि. १२ मे रोजी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या...
error: Content is protected !!