Homeदेश-विदेशअमित शहांची मोठी घोषणा ; कोविड लसीकरण संपताच होणार CAA ची अंबलबजावणी...

अमित शहांची मोठी घोषणा ; कोविड लसीकरण संपताच होणार CAA ची अंबलबजावणी…

अमित शहांची मोठी घोषणा ; कोविड लसीकरण संपताच होणार CAA ची अंबलबजावणी…

 

टाईम्स ऑफ महाराष्ट्र (ब्युरो) :- पश्चिम बंगाल निवडणुकांबाबत राजकारण सध्या तापले आहे. भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते बंगाल दौर्‍यावर आहेत. या पार्श्वभूमीवर गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे माजी अध्यक्ष अमित शहा बंगालमध्ये दाखल झाले, यावेळी त्यांनी आपल्या भाषणामधून ममता बॅनर्जी यांचा किल्ला उद्ध्वस्त करण्याबाबत भाष्य केले. महत्वाचे म्हणजे शाह यांनी यावेळी सीएएचा (CAA) उल्लेख केला. ते म्हणाले कोविड लसीकरणाची (COVID Vaccination) प्रक्रिया संपल्यानंतर पश्चिम बंगालच्या मतुआ समुदायासह सीएए अंतर्गत शरणार्थींना भारतीय नागरिकत्व देण्याची प्रक्रिया सुरू होईल.

यासह, नागरिकत्व (दुरुस्ती) कायद्याबाबत अल्पसंख्याकांची दिशाभूल केल्याचा विरोधी पक्षांवर आरोप करीत ते म्हणाले की, सीएएच्या अंमलबजावणीचा भारतीय अल्पसंख्याकांच्या नागरिकत्वावर परिणाम होणार नाही.

यावेळी त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावरही हल्लाबोल केला. ममता बॅनर्जी एक अपयशी मुख्यमंत्री आहेत असे म्हणत, शाह यांनी बंगालमध्ये विकासासाठी भाजपाला निवडून आणण्याचे आवाहन केले. ते पुढे म्हणाले. ‘आम्ही खोटे वचन दिल्याचे ममता दीदी म्हणाल्या व त्यांनी सीएएला विरोध करण्यास सुरुवात केली. सीएएला आपण आपल्या राज्यात कधीच परवानगी देणार नाही असेही त्या म्हणाल्या. मात्र भाजपा नेहमीच केलेली आश्वासने पूर्ण करतो. आम्ही हा नवीन कायदा आणला आहे आणि त्यामुळे निर्वासितांना नागरिकत्व मिळेल.’

ठाकुरानगर या मतुआबहुल भागातील मोर्चात अमित शहा म्हणाले, ‘आम्ही सीएए लागू करणार होतो मात्र त्याचवेळी कोरोनाचे संकट उभे राहिले. आता लसीकरण करण्याचे काम संपताच, कोरोनातून मुक्त होताच भाजपा सरकार आपणा सर्वांना नागरिकत्व देण्याचे काम करेल.

दरम्यान, मतुआ समाज हा मूळचा पूर्व पाकिस्तानचा असून, विभाजन आणि बांगलादेश निर्मितीनंतर ते हिंदुस्थानात स्थलांतरित झालेल्या दुर्बल घटकातील हिंदू लोक आहेत. त्यापैकी बर्‍याच जणांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहे पण अजूनही काही लोकांना ते मिळाले नाही. यावर्षी एप्रिल-मेमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांनंतर ममता बॅनर्जी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याने, सीएएच्या अंमलबजावणीला विरोध करण्याच्या स्थितीत त्या नसतील असेही शाह म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महात्मा फुले जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा जागर; शिक्षण, समता आणि सत्यशोधक विचारांना अभिवादन

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्ह्यासह राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले....

जळगाव पोलीस दलात बदलाची नवी सुरुवात; संदीप गावित यांच्यावर अपर पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :  राज्य पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय फेरबदल करण्यात आले असून जळगाव जिल्ह्याच्या अपर पोलीस अधीक्षक पदावर संदीप रघुनाथ गावित...

परभणीत शेती मशागतीला वेग; बैलांची जागा घेत ट्रॅक्टरचा वाढता वापर

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) : खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने जिल्ह्यात शेती मशागतीच्या कामांना मोठा वेग आला आहे. पारंपरिक बैलजोडीवर आधारित शेती...

शिरपूरमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या; मंत्री अशोक ऊईके यांना निवेदन

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) : आदिवासी विद्यार्थी व समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, या मागणीसाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने...

अकोला राजंदा येथून १५ वर्षीय बालिका बेपत्ता; बार्शीटाकळी परिसरात चिंतेचे सावट

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव): अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील राजंदा गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या १५ वर्षांची अल्पवयीन मुलगी आपल्या राहत्या घरातून...

महात्मा फुले जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा जागर; शिक्षण, समता आणि सत्यशोधक विचारांना अभिवादन

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्ह्यासह राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले....

जळगाव पोलीस दलात बदलाची नवी सुरुवात; संदीप गावित यांच्यावर अपर पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :  राज्य पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय फेरबदल करण्यात आले असून जळगाव जिल्ह्याच्या अपर पोलीस अधीक्षक पदावर संदीप रघुनाथ गावित...

परभणीत शेती मशागतीला वेग; बैलांची जागा घेत ट्रॅक्टरचा वाढता वापर

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) : खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने जिल्ह्यात शेती मशागतीच्या कामांना मोठा वेग आला आहे. पारंपरिक बैलजोडीवर आधारित शेती...

शिरपूरमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या; मंत्री अशोक ऊईके यांना निवेदन

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) : आदिवासी विद्यार्थी व समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, या मागणीसाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने...

अकोला राजंदा येथून १५ वर्षीय बालिका बेपत्ता; बार्शीटाकळी परिसरात चिंतेचे सावट

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव): अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील राजंदा गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या १५ वर्षांची अल्पवयीन मुलगी आपल्या राहत्या घरातून...
error: Content is protected !!