हल्ल्यानंतर पश्चिम आशियात तणाव वाढला असून भारताने संवाद आणि मुत्सद्देगिरीतून तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे.
नवी दिल्ली : इस्राईलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर पश्चिम
आशियात तणाव वाढण्याची भीती आहे. दोन्ही देशांमध्ये संघर्ष चिघळण्याच्या शक्यतेमुळे भारताने चिंता व्यक्त केली आहे. तसेच संवाद आणि मुत्सद्देगिरीतून या संकटावर तोडगा काढावा, असे आवाहनही भारताने केले आहे
दोन्ही देशांमधील तणाव चिघळण्याची भीती व्यक्त केली जात असून, या हल्ल्यानंतर कच्च्या तेलाचे दर कडाडले आहेत. कच्च्या तेलाच्या किमतीत सहा टक्क्यांनी वाढ झाली असून इराणकडून होर्मूज खाडी बंद केली जाऊ शकते, अशी शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळेही कच्च्या तेलाचे दर भडकण्याची शक्यता आहे.
Advertisement by Unique Computers
👇👇Click the Image below👇👇
👆👆Click the Image below👆👆
या पार्श्वभूमीवर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने इराण आणि इस्राईल दरम्यान वाढत्या तणावावर चिंता केली आहे. तसेच बदलत्या स्थितीवर भारत बारकाईने लक्ष ठेवून असल्याचेही म्हटले आहे. सोबतच, दोन्ही देशांना तणाव टाळण्याचे तसेच संवाद व मुत्सद्देगिरीतून या संकटावर मात काढावा असे आवाहनही केले आहे. भारताचे इराण व इस्राईलशी देखील मैत्रीचे संबंध आहे. या मैत्री संबंधांचा हवाला देताना भारताने सर्वप्रकारचे सहकार्य दोन्ही देशांना देऊ केले आहे.
दरम्यान, इराणवर झालेल्या हल्ल्यानंतर तेहरानमधील भारतीय दूतावासाने इराणमध्ये राहात असलेल्या भारतीय नागरिकांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. भारतीयांनी तातडीचे कारण असल्याशिवाय घराबाहेर पडू नये व सुरक्षिततेबाबत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन दूतावासाने केले आहे.























