Homeताज्या बातम्यागेवराई-भिवंडी बससेवा अचानक बंद; प्रवाशांचे प्रचंड हाल

गेवराई-भिवंडी बससेवा अचानक बंद; प्रवाशांचे प्रचंड हाल

गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई आगारातून अनेक वर्षांपासून नियमित सुरु असलेली गेवराई-भिवंडी बससेवा मागील काही दिवसांपासून पूर्णपणे बंद करण्यात आल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. विशेष म्हणजे ही बससेवा बंद करण्यामागे आगारप्रमुखांचा मनमानी व गलथान कारभार कारणीभूत असल्याचा आरोप प्रवासी, नागरिकांकडून करण्यात येत आहे.
     गेवराई आगारातून सकाळी सव्वा आठ वाजता सुटणारी ही बस पाडळशिंगी, मादळमोही, कोळगाव, तिंतरवणी, पाथर्डी, अहिल्यानगर (अहमदनगर) मार्गे भिवंडीपर्यंत जात होती. या मार्गावरील शेकडो प्रवाशांसाठी ही बस अत्यंत महत्त्वाची मानली जात होती. विशेषतः अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचारासाठी जाणारे रुग्ण, कामानिमित्त प्रवास करणारे नागरिक तसेच विद्यार्थी यांच्यासाठी ही बससेवा मोठा आधार होती. मात्र मागील काही महिन्यांपासून ही बस अधूनमधूनच सोडली जात असल्याचे दिसून येत होते. त्यानंतर मागील चार-पाच दिवसांपासून ही बससेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. याबाबत आगार प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती किंवा पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. 
   मुळात या मार्गावर आधीच बससेवा कमी असताना वर्षानुवर्षे नियमित सुरु असलेली गेवराई-भिवंडी बस अचानक बंद करण्यामागे आगारप्रमुखांना नेमके साध्य काय करायचे आहे?
असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. ही बससेवा बंद करण्यात आल्याने प्रवाशांचे हाल होत असताना आगारप्रमुख मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची टीका होत आहे. या मनमानी कारभारामुळे रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असून त्यासाठी जादा पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे आगारप्रमुखांच्या गलथान व निष्क्रिय कारभारावर नागरिकांनी संताप व्यक्त केला असून तात्काळ ही बससेवा पूर्ववत सुरु करण्याची मागणी जोर धरत आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क पूर्णत माफ शासनाचे स्पष्ट निर्देश

0
जळगाव  (प्रतिनिधी विनोद पवार):महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी व वारसदारांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर आकारले जाणारे नोंदणी शुल्क पूर्णतः माफ...

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी धुळे आर्म रेसलिंग संघाला क्रीडा साहित्य वाटप

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : ओम साई लॉन्ड्री अ‍ॅण्ड इंटरप्राईजेसचे संचालक श्री. जितेंद्र बोरसे यांचा स्तुत्य उपक्रमनागपूर येथे आयोजित ३७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद आर्म...

टाइम्स ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी महेश कांबळे ‘आदर्श पत्रकार पुरस्काराने’ सन्मानित

0
Times Of Maharashtra Desk Pune : माण तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी महेश कांबळे यांना स्मित प्रोअ‍ॅक्टिव्ह अ‍ॅकॅडमीच्या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या २५ एप्रिल रोजी नियोजित शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी नियोजन...

शाळेची तयारी करताना चौथीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू; ब्रह्मपुरीत शोककळा

0
 ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होत असलेल्या एका १० वर्षीय चिमुरड्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज...

शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क पूर्णत माफ शासनाचे स्पष्ट निर्देश

0
जळगाव  (प्रतिनिधी विनोद पवार):महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी व वारसदारांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर आकारले जाणारे नोंदणी शुल्क पूर्णतः माफ...

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी धुळे आर्म रेसलिंग संघाला क्रीडा साहित्य वाटप

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : ओम साई लॉन्ड्री अ‍ॅण्ड इंटरप्राईजेसचे संचालक श्री. जितेंद्र बोरसे यांचा स्तुत्य उपक्रमनागपूर येथे आयोजित ३७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद आर्म...

टाइम्स ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी महेश कांबळे ‘आदर्श पत्रकार पुरस्काराने’ सन्मानित

0
Times Of Maharashtra Desk Pune : माण तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी महेश कांबळे यांना स्मित प्रोअ‍ॅक्टिव्ह अ‍ॅकॅडमीच्या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या २५ एप्रिल रोजी नियोजित शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी नियोजन...

शाळेची तयारी करताना चौथीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू; ब्रह्मपुरीत शोककळा

0
 ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होत असलेल्या एका १० वर्षीय चिमुरड्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज...
error: Content is protected !!