Homeताज्या बातम्यामराठी नाट्य सृष्टीतील हिरा हरपला जेष्ठ नाटकर गंगाराम गवाणकर यांनी वयाच्या ८६...

मराठी नाट्य सृष्टीतील हिरा हरपला जेष्ठ नाटकर गंगाराम गवाणकर यांनी वयाच्या ८६ वर्षी घेतला अखेरचा श्वास

Times of Maharastra Desk, Gangaram Gawankar Passes Away :  दोघी , वस्त्रहरण , वरपरीक्षा, वर भेटू नका, वन रूम किचन या नाटकातून संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात घर करणारे नाटकर गंगाराम गवाणकर यांनी काल रात्री अखेरचा श्वास घेतला. त्यांनी त्यांच्या नाटकांनी एकेकाळी संपूर्ण महाराष्ट्र गाजवला होता. ते ८६ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसापासून ते आजाराशी झुंज देत होते,आखेर काल रात्री त्यांची आजाराशी झुंज आपयाशी ठरली आणि दहिसर मधील रुग्णालयात त्यांची प्राण जोत मावळली.

गवाणकर यांचे वस्त्रहरण ह्या नाटकाने मराठी नाटक रंगभूमि चांगलीच गाजवली. मालवणी भाषेला ऊंची गाठून देण्यात गवाणकरांचे मोठे योगदान आहे. त्याच बरोबर त्यांनी मालवणी बोलीभाषेच्या अस्सल भावविश्वाला मुख्य प्रवाहात आणले. ग्रामीण माणसाचा विनोद, त्याची व्यथा आणि जगण्याची उमेद त्यांच्या लेखणीतून झाळकायची. त्यांनी ‘जगर’ या मराठी चित्रपटाची पटकथा लिहिली होती, तर ‘वात्रट मेळा’, ‘वन रूम किचन’, ‘दोघी’, ‘वर भेटू नका’ यांसारखी २० हून अधिक नाटके त्यांच्या नावावर आहेत. मात्र ‘वस्त्रहरण’ या एकाच नाटकाने मराठी रंगभूमीवर प्रादेशिक भाषेच्या नाटकांचा नवा अध्याय लिहून ठेवला.गवाणकर यांनी अनेक नाटके व पुस्तके मराठी भाषेत लिहिली आहेत. सुरुवातीच्या काळात एमटीएनएलमध्ये नोकरी करत त्यांनी आपला नाट्य लेखनाचा छंद सुद्धा जोपासला. १९७१ मध्ये त्यांनी रंगभूमीवर आपली वाटचाल सुरु केली.आणि मग एका पेक्षा एक अशी नाटके त्यांनी रंगभूमीला दिली.९६व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना मिळाले होते. असा ज्येष्ठ नाटककार आज काळाच्या पडद्याआड गेला आहे. आज दहिसर येथील आंबावाडी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या जण्याने मराठी नाटक सृष्टीत शोककळा पसरली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून श्रद्धांजलि देण्यात आली तेंव्हा ते ,

“म्हणाले मालवणीचा गोडवा, ठसका जगभर पोहोचविणाऱ्या प्रतिभावंताला मुकलो..”

मालवणी बोलीचा गोडवा आणि ठसका जगभर पोहोचविणारा, कोकणातील बहुमुखी प्रतिभावंत अशा साहित्यिक, नाटककाराला आपण मुकलो आहोत, अशा शब्दांत यांनी ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. ‘वस्त्रहरण या विक्रमी नाटकासह,इतर नाट्यकृतींच्या माध्यमातून मराठी रंगभूमीसाठीचे स्वर्गीय गवाणकर यांचे योगदान सदैव स्मरणात ठेवले जाईल, असेही मुख्यमंत्री यांनी म्हटले आहे.

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

जिल्हा पोलीस दलात ‘नो हेल्मेट, नो एन्ट्री’ नियम लागू; एसपी श्रीकांत धिवरे यांचा सुरक्षा...

0
विनोद पवार | जळगाव प्रतिनिधी जळगाव : रस्ते अपघातांमध्ये दुचाकीस्वारांच्या वाढत्या मृत्यूच्या घटना लक्षात घेऊन जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पोलीस दलात...

विंचूर जवळ भीषण अपघात; छोटा हत्ती चालकाचा जागीच मृत्यू, कांदा मालक शेतकरी गंभीर जखमी

0
एकेरी वाहतुकीमुळे विंचूर परिसरात अपघातांचे प्रमाण वाढले; नागरिकांकडून तातडीने उपाययोजनांची मागणी निफाड तालुक्यातील विंचूर जवळ आज गुरुवार, दि.३० दुपारी सुमारे १ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण...

संततधारेमुळे देऊळगाव राजा तालुक्यातील शेतकरी सुखावला.

0
 देऊळगाव राजा तालुका (प्रतिनिधी बबनराव नागरे) देऊळगाव राजा तालुक्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले होते.दमदार पाऊस न पडल्याने पावसाची चातकाप्रमाणे शेतकरी वाट बघत...

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे – साहित्य , शाहिरी आणि सामाजिक समतेचा अखंड लढा

0
विष्णु गायकवाड गेवराई तालुका प्रतिनिधी: महाराष्ट्राच्या सांस्कृतिक , साहित्यिक आणि सामाजिक इतिहासात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्थान अत्यंत मानाचे आहे . समाजातील उपेक्षित ,...

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक – भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रणेते आणि राष्ट्रचेतनेचे जागृत शिल्पकार

0
विष्णु गायकवाड गेवराई तालुका प्रतिनीधी: " स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच . " या एका घोषणेने लाखो भारतीयांच्या मनामध्ये...

जिल्हा पोलीस दलात ‘नो हेल्मेट, नो एन्ट्री’ नियम लागू; एसपी श्रीकांत धिवरे यांचा सुरक्षा...

0
विनोद पवार | जळगाव प्रतिनिधी जळगाव : रस्ते अपघातांमध्ये दुचाकीस्वारांच्या वाढत्या मृत्यूच्या घटना लक्षात घेऊन जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पोलीस दलात...

विंचूर जवळ भीषण अपघात; छोटा हत्ती चालकाचा जागीच मृत्यू, कांदा मालक शेतकरी गंभीर जखमी

0
एकेरी वाहतुकीमुळे विंचूर परिसरात अपघातांचे प्रमाण वाढले; नागरिकांकडून तातडीने उपाययोजनांची मागणी निफाड तालुक्यातील विंचूर जवळ आज गुरुवार, दि.३० दुपारी सुमारे १ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण...

संततधारेमुळे देऊळगाव राजा तालुक्यातील शेतकरी सुखावला.

0
 देऊळगाव राजा तालुका (प्रतिनिधी बबनराव नागरे) देऊळगाव राजा तालुक्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले होते.दमदार पाऊस न पडल्याने पावसाची चातकाप्रमाणे शेतकरी वाट बघत...

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे – साहित्य , शाहिरी आणि सामाजिक समतेचा अखंड लढा

0
विष्णु गायकवाड गेवराई तालुका प्रतिनिधी: महाराष्ट्राच्या सांस्कृतिक , साहित्यिक आणि सामाजिक इतिहासात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्थान अत्यंत मानाचे आहे . समाजातील उपेक्षित ,...

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक – भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रणेते आणि राष्ट्रचेतनेचे जागृत शिल्पकार

0
विष्णु गायकवाड गेवराई तालुका प्रतिनीधी: " स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच . " या एका घोषणेने लाखो भारतीयांच्या मनामध्ये...
error: Content is protected !!