Times of Maharastra Desk, Kangana Ranaut controversy: अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगणा रणौत हिल वादग्रस्त ट्विट प्रकरणात कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. देशात झालेल्या शेतकरी आंदोलनावर केलेल्या ट्विट मुळे कंगणावर एका वृद्ध महिलेनं चुकीच्या पद्धतीनं तिची ओळख करून दिल्याचा आणि तिच्याबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणातून कंगणाला आता जमीन मंजूर झाला आहे.
नेमके प्रकरण काय?
कंगणा रणौतने शतकारी आंदोलनावर केलेल्या ट्विटमुळे तिला कायदेशीर गोष्टीना सामोरे जावे लागले. या प्रकरणात माहिंदर कौर या वृद्ध महिलेने कंगनावर खोट्या आरोपांचे आणि अपमानास्पद वक्तव्यांचे आरोप केले होते. या प्रकरणी दाखल झालेल्या तक्रारीनंतर, बाथिंडा न्यायालयानं कंगनाला आता जामीन मंजूर केला आहे. काही दिवसांपूर्वी कंगणाने नायलयात तक्रार कर्त्यंची माफी मागण्याची इच्छा व्यक्त केली होती. हा वाद गैरसमजातून झाला आहे असे ही त्या म्हणाल्या.
कंगणाने काय ट्विट केले होते?
कंगनानं एक ट्विट रिट्विट केलं होतं. यात कंगन्ना म्हणते की “ही तीच दादी आहे जिला टाईम मासिकात सर्वात शक्तिशाली भारतीय म्हणून प्रसिद्ध करण्यात आले होते…. आणि ती १०० रुपयांना उपलब्ध आहे. पाकिस्तानी जर्नोंनी भारताचा आंतरराष्ट्रीय जनसंपर्क लाजिरवाण्या पद्धतीने हायजॅक केला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या वतीने बोलण्यासाठी आपल्याला आपल्याच लोकांची गरज आहे. या ट्विटमध्ये ज्या वृद्ध महिलेचा फोटो होता त्या बठिंडा येथील रहिवासी महिंदर कौर होत्या.
या प्रकरणी किसान मजदूर मोर्चाचे नेते मनजीत राय यांनी कंगणाला त्या महिलेची माफी मागण्याची मागणी केली होती. त्यांनी कंगन्नावर असा आरोपही केला की “कंगनानं न्यायालयाकडून बोलावल्यावर माफी मागितली, पण आम्ही जेव्हा तिला माफी मागायला सांगितली तेव्हा तिनं मागितली नाही.” न्यायालय बाहेर पत्रकारांशी बोलताना कंगणा म्हणाल्या मला कधीच वाटलं नव्हतं की असा वाद निर्माण होईल. महेंद्र कौर यांची ओळख पटवण्यात माझा गैरसमज झाला होता. मी त्यांचा आणि प्रत्येक आईचा खूप आदर करते. मी त्यांच्या पतींशी बोलून माझ्या ट्विटबद्दल खेद व्यक्त केला आहे,
या प्रकरणाची पुढील सुनावणी २४ नोव्हेंबर रोजी होणार आहे.






















