Times of Maharashtra desk: कोकणात पाऊस काही थांबायच नाव घेईना. गेल्या काही दिवसांपासून कोकण आणि रायगड भगत जोरात पाऊस सुरू असून 7 नोव्हेंबर पर्यन्त कोकणात मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. आरबी समुद्रात पूर्व आणि ईशान्य भागात कमी दाबचा पट्टा निर्माण झाल्यामुळे समुद्र खवळला आहे. यामुळे कोकण व रायगड मधील मासेमाऱ्याना याचा चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे. तसा हवामान खात्याने मासेमाऱ्याना इशारा ही दिला आहे.
मोंथा चक्री वादळाचा फटका अजून ताजा असतानाच पुन्हा एका नवीन वादळाची चिन्हे कोकणकिनार पट्टीवर दिसून येत आहेत. यामुळे कोकण व रायगड मधील मासेमाऱ्याना सतर्क राहण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
समुद्र खवळल्याने मासेमारी नुकसनात
काही दिवसांपासून कोकण किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा हवामान खात्याने दिल आहे . त्यामुळे बोटी समुद्रात सोडणे धोक्याचे आहे. अनेक समुद्रात सोडलेल्या बोटी मासेमाऱ्यांनी परत बोलावून घेतल्या असून त्यामुळे मासेमाऱ्याना प्रत्येकी 2 ते 3 लाख रुपवयांचे नुकसान सोसावे लागणार आहे. यामुळे मासेमारी व्यवसायावर आर्थिक संकट ओढवणार आसून कोकणात मासे विक्रीचे भाव वाढण्याची शक्यता आहे.जून पासून आत्ता पर्यन्त 5 वेळा मासेमाऱ्याना वादळचा फटका भोगावा लागला आहे. आणि आता पुन्हा वादळाची चाहूल लागल्याने मासेमारी व्यवसायावर संकट आले आहे.






















