Homeताज्या बातम्याGharapuri Bet Uncover Ancient History: घारापुरी बेटाचा इतिहास येणार समोर , दोन...

Gharapuri Bet Uncover Ancient History: घारापुरी बेटाचा इतिहास येणार समोर , दोन वर्ष कालावधीची उत्खनन मोहीम हाती

Times of Maharashtra Desk Gharapuri Bet Uncover Ancient History: महाराष्ट्राला इतिहासाच्या दृष्टीने समृद्ध वारसा लाभला आहे. यातील एक म्हणजे उरण येतील घारापुरी बेट. घरापुरी बेट हे जरी सर्वत्र प्रचलित असले तरी या बेटाचा ठोस इतिहास अजून पडद्या आड आहे. हा इतिहास जाणून घेण्याचे वेध आता भारतीय पुरातत्व सौरक्षण विभागाला लागले आहेत. यासाठी या विभागाने उत्खनन मोहीम योजली आहे. भारतीय पुरातत्व सौरक्षण विभागाने या मोहिमेसाठी २ वर्षाचा कालावधी मागितला असून या मोहिमेची सुरवात सोमवारी विधिवत पूजा करून करण्यात आली आहे. या पूजेला भारतीय पुरातत्व विभागाचे अध्यक्ष डॉ. अभिजीत आंबेडकर , उपाध्यक्ष एस. एन नागानुर, सहाय्यक आकोलॉजिस्ट आर. बी. रविराज, पुरातत्व विभागाचे घारापूरी येथील प्रभारी अधिकारी कैलास शिंदे, घारापुरी ग्रामपंचायतिचे उप सरपंच बळीराम ठाकूर आणि भारतीय पुरातत्व विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

उत्खनन नेमके कशासाठी?
गेल्या काही महिन्यांपूर्वी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना घारापुरी बेटावर मोरा बंदर आणि शेत बंदर या भागात काही पुरातन भांडी आढळली होती. या भांड्यांची पहाणी केली असता त्या ठिकाणी पहिले मानवी वस्ती होती अशी शंका विभागाच्या तज्ञानी वर्तवली आहे. तसेच या ठिकाणी उत्खनन केल्यास आणखी काही वस्तु व इतिहासासंबंधित खुलासा करणारे आणखी काही धागेदोरे सापडतील अशी त्यांना खात्री आहे. या उत्खननातून घारापुरी बेटाचा इतिहास समोर येऊन तेथील त्यावेळी असणारी वस्ती कशी होती,तेथील मानवी संस्कृति या सर्वाचा खुलासा होणार आहे. तसेच या परिसरात आणखी काही लेण्या आणि मुर्त्या संपडण्याची डाट शक्यता आहे.
या उत्खनना मुळे तत्कालीन वस्ती , पर्यावरण ,संस्कृति , समाज या सर्व गोष्टींचा अभ्यास करणे सोपे होणार आहे.

उत्खनन योजनेचा आराखडा
या उत्खनन मोहिमेसाठी एकूण २ वर्षांचा कालावधी मागण्यात आला आहे. हे उत्खनन घारापुरी बेटावरील १ किलोमोटर च्या आंतरात होणार असून यासाठी एकूण ६० ते ७० कामगार काम करणार आहेत. या उत्खननासाठी व त्या वरील अभ्यासाठी सुमारे २ वर्षाचा कालावधी लागणार असल्याचे पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यानी सांगितले आहे.

घारापुरी बेटा बद्दल अधिक माहिती 
घारापुरी बेट रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात सुमारे १० किमी परिसरात पसरलेले आहे. या बेटावर ९ व्या व १३ व्या शतकात कोरलेल्या लेण्या आहेत. या लेणीला एलिफंटा लेणी असे म्हणतात. १९८७साली या लेण्यांना युनेस्को जागतिक वारसा स्थानाचा दर्जा दिला गेला. घारापूरी लेण्यांच्या प्रवेशद्वाराजवळ हत्तीचे प्रचंड आकाराचे एक शिल्प होते, त्यावरूनच या लेण्यांना एलिफंटा लेणी असे नाव पडले. हे शिल्प सध्या मुंबईच्या राणीच्या बागेत आहे. आता ह्या ठिकाणी अजून काही भांडी सापडल्यामुळे येथील इतिहासात नवीन माहिती सोमर येणार असल्याची शक्यता आहे. ह्या उत्खननातून घारापुरी बेटाची कोणती नवीन माहिती समोर येते ह्याची उत्सुकता सर्वाना आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष मुशीर खान कोटकर, पत्रकार बबनराव नागरे व नंदकिशोर देशमुख...

0
देऊळगाव राजा:(प्रतिनिधी बबनराव नागरे) शासकीय विश्रामगृह देऊळगाव राजा येथे व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष मुशीर खान कोटकर, ज्येष्ठ पत्रकार भगवान नागरे आणि पत्रकार नंदकिशोर...

सिन्नर एमआयडीसी मारहाण प्रकरणी तिघांना सहा महिन्यांचा सक्त कारावास; प्रत्येकी ₹२,५०० दंड

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड )सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यात २०१६ मध्ये दाखल झालेल्या मारहाण व धमकी प्रकरणात माननीय जेएमएफसी न्यायालय, सिन्नर यांनी तिघा आरोपींना दोषी...

तांड्याला शिक्षणाची दिशा देणारा दूरदर्शी शिक्षणपुरुष हरपला…

0
डॉ. प्रदीप राठोड प्राचार्य राजाराम राठोड : वंचितांच्या आयुष्यात ज्ञानदीप प्रज्वलित करणाऱ्या दूरदर्शी शिक्षणपुरुषाला भावपूर्ण श्रद्धांजली ! छत्रपती संभाजीनगर येथील वसंतराव नाईक महाविद्यालयाचे संस्थापक व...

आरोग्य विकून विकास नको! ब्रह्मपुरीजवळील इथेनॉल प्रकल्पांमुळे ७ गावे संकटात!

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)"विकास हवा, पण आमच्या आरोग्याच्या आणि भविष्याच्या किमतीवर नको!" अशी आर्त हाक आता ग्रामीण भागातून ऐकू येत आहे. परिसरातील नव्याने सुरू झालेल्या इथेनॉल...

दौंडचा समावेश बारामतीच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात करू नका – गटनेते योगेश कटारिया

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे,संघराज गायकवाड)राज्य शासनाने प्रस्तावित केलेल्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्याचा समावेश बारामती कार्यालयाऐवजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाशीच कायम ठेवावा, अशी ठाम...

व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष मुशीर खान कोटकर, पत्रकार बबनराव नागरे व नंदकिशोर देशमुख...

0
देऊळगाव राजा:(प्रतिनिधी बबनराव नागरे) शासकीय विश्रामगृह देऊळगाव राजा येथे व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष मुशीर खान कोटकर, ज्येष्ठ पत्रकार भगवान नागरे आणि पत्रकार नंदकिशोर...

सिन्नर एमआयडीसी मारहाण प्रकरणी तिघांना सहा महिन्यांचा सक्त कारावास; प्रत्येकी ₹२,५०० दंड

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड )सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यात २०१६ मध्ये दाखल झालेल्या मारहाण व धमकी प्रकरणात माननीय जेएमएफसी न्यायालय, सिन्नर यांनी तिघा आरोपींना दोषी...

तांड्याला शिक्षणाची दिशा देणारा दूरदर्शी शिक्षणपुरुष हरपला…

0
डॉ. प्रदीप राठोड प्राचार्य राजाराम राठोड : वंचितांच्या आयुष्यात ज्ञानदीप प्रज्वलित करणाऱ्या दूरदर्शी शिक्षणपुरुषाला भावपूर्ण श्रद्धांजली ! छत्रपती संभाजीनगर येथील वसंतराव नाईक महाविद्यालयाचे संस्थापक व...

आरोग्य विकून विकास नको! ब्रह्मपुरीजवळील इथेनॉल प्रकल्पांमुळे ७ गावे संकटात!

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)"विकास हवा, पण आमच्या आरोग्याच्या आणि भविष्याच्या किमतीवर नको!" अशी आर्त हाक आता ग्रामीण भागातून ऐकू येत आहे. परिसरातील नव्याने सुरू झालेल्या इथेनॉल...

दौंडचा समावेश बारामतीच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात करू नका – गटनेते योगेश कटारिया

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे,संघराज गायकवाड)राज्य शासनाने प्रस्तावित केलेल्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्याचा समावेश बारामती कार्यालयाऐवजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाशीच कायम ठेवावा, अशी ठाम...
error: Content is protected !!