Homeताज्या बातम्याVande Mataram Debate "वंदे मातरम वाद पेटला! फडणवीसांची आदित्य ठाकरेंवर राजकीय फटकारणी"

Vande Mataram Debate “वंदे मातरम वाद पेटला! फडणवीसांची आदित्य ठाकरेंवर राजकीय फटकारणी”

Times of Maharashtra Desk: वंदे मातरम हा केवळ एक गीत नसून भारताच्या स्वातंत्र्याचा आणि राष्ट्रभावनेचा महामंत्र आहे. स्वातंत्र्याच्या लढ्यात असंख्य क्रांतिकारकांनी फाशीच्या तोंडावरही “वंदे मातरम” ऐवजी दुसरा शब्द उच्चारला नाही. आज या गीताचे दीडशे वर्ष पूर्ण होत असताना संसदेत या विषयावर चर्चा होणे स्वाभाविक असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.विधानसभेत आज संपूर्ण वंदे मातरम गाऊन आमदारांनी या देशभक्तिगीतास अभिवादन केले. तसेच पुढील अधिवेशनात या गीतावर स्वतंत्र चर्चा होणार असल्याची माहितीही मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली.

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी वंदे मातरम घोषणेवर बंदी असून आता फक्त भाजपाचे घोषणाच द्याव्या लागतील का, असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी तीव्र प्रतिक्रिया देत म्हटले की, “वंदे मातरमवर कधीच बंदी नव्हती. उलट वंदे मातरमला कापण्याचे काम काँग्रेसने केले. त्यांच्याच प्रस्तावानुसार संपूर्ण वंदे मातरम न गाता केवळ अर्धे गीत गायले जाऊ लागले.”फडणवीसांनी टीका करत म्हटले की, आज आदित्य ठाकरे जे प्रश्न भाजपला विचारतात ते काँग्रेसलाही विचारायला हवेत. कारण शिवसेना ठाकरे गट आज ज्या पक्षासोबत फिरते, त्याच काँग्रेसने वंदे मातरमचा अपमान केला होता.मुख्यमंत्री म्हणाले, “भाजपच्या शासनकाळात वंदे मातरमचा कायम सन्मान झाला आहे, आणि पुढेही राहील.”

“शिंदे सेना आमचा मित्र पक्ष, आमदार घेण्याची गरज नाही”

आदित्य ठाकरे यांनी केलेल्या आणखी एका दाव्यावरही फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले. ठाकरे यांनी २२ शिंदे गटाचे आमदार भाजपात येऊ शकतात असे म्हटले होते. त्यावर फडणवीस म्हणाले,”असे काही बोलण्याने काही घडत नाही. उद्या कोणी हेही म्हणेल की आदित्य ठाकरेंचे २० आमदार भाजपात येणार. आम्हाला शिंदे सेनेचे आमदार घेऊन काय करायचे? ती खरी शिवसेना आहे आणि ती आमचा मित्र पक्ष आहे.”भाजप आणि शिंदे शिवसेनेची युती आणखी मजबूत होईल असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला.देवेंद्र फडणवीसांच्या या वक्तव्यांमुळे वंदे मातरम विवाद अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. एकीकडे भाजप वंदे मातरमच्या सन्मानाचा मुद्दा उभा करत आहे, तर महाविकास आघाडीतील पक्ष राजकीय हेतू शोधत आहेत. पुढील अधिवेशनात वंदे मातरम विषयावर होणारी चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात नवी दिशा देईल, असे संकेत सध्या मिळत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणात भाजप नेते संजय गरुड अटकेत; तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता

0
प्रतिनिधी : विनोद पवार | जळगाव  राज्यभर चर्चेत असलेल्या कथित बनावट 'शालार्थ आयडी' प्रकरणात नाशिक एसआयटीच्या विशेष तपास पथकाने शेदूर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व...

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा* – *श्री.विवेक पाटील

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) किसान विद्या प्रसारक संस्था संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सी.बी.एस.ई स्कूल, शिरपूर येथे भारतरत्न, माजी राष्ट्रपती तथा 'मिसाईल मॅन' म्हणून...

सांगली पोलिसांचा विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा व अंमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यक्रम

0
सांगलीछ(प्रतिनिधि वाहिद मुल्ला) सोमवार दि. 27.07.2026 रोजी सांगली पोलीस दलातर्फे बिरनाळे पब्लिक स्कूल, संजयनगर येथे "सायबर गुन्हे, अंमली पदार्थाचे होणारे दुष्परीणाम, महिला सुरक्षा व...

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणात भाजप नेते संजय गरुड अटकेत; तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता

0
प्रतिनिधी : विनोद पवार | जळगाव  राज्यभर चर्चेत असलेल्या कथित बनावट 'शालार्थ आयडी' प्रकरणात नाशिक एसआयटीच्या विशेष तपास पथकाने शेदूर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व...

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा* – *श्री.विवेक पाटील

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) किसान विद्या प्रसारक संस्था संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सी.बी.एस.ई स्कूल, शिरपूर येथे भारतरत्न, माजी राष्ट्रपती तथा 'मिसाईल मॅन' म्हणून...

सांगली पोलिसांचा विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा व अंमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यक्रम

0
सांगलीछ(प्रतिनिधि वाहिद मुल्ला) सोमवार दि. 27.07.2026 रोजी सांगली पोलीस दलातर्फे बिरनाळे पब्लिक स्कूल, संजयनगर येथे "सायबर गुन्हे, अंमली पदार्थाचे होणारे दुष्परीणाम, महिला सुरक्षा व...
error: Content is protected !!