Homeआरोग्यवाढत्या उष्णतेचा परिणाम : जळगाव जिल्ह्यातील शाळा ९ मार्चपासून सकाळच्या सत्रात

वाढत्या उष्णतेचा परिणाम : जळगाव जिल्ह्यातील शाळा ९ मार्चपासून सकाळच्या सत्रात

विनोद पवार ( जळगाव प्रतिनिधी ) : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असून उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत जळगाव जिल्हा शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा ९ मार्चपासून सकाळच्या सत्रात घेण्याचे आदेश माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनी जारी केले आहेत.

या निर्णयानुसार जिल्ह्यातील शासकीय, अनुदानित तसेच खाजगी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये वर्ग सकाळच्या सत्रात घेण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना दुपारच्या कडक उन्हाचा त्रास होऊ नये तसेच उष्माघातासारख्या आरोग्याच्या समस्या टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. वाढत्या तापमानामुळे विद्यार्थ्यांना दुपारच्या वेळेत शाळेत ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे शाळांचे वेळापत्रक बदलून सकाळचे सत्र सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

दरम्यान, या आदेशातून सीबीएसई बोर्डाच्या शाळांना वगळण्यात आले आहे. मात्र इतर सर्व इंग्रजी माध्यम शाळांनाही हा निर्णय लागू राहणार असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा सातत्याने वाढत असल्याने पालक आणि शिक्षकांकडूनही शाळांचे वेळापत्रक बदलण्याची मागणी करण्यात येत होती.

हवामान खात्याने देखील १५ मार्चपर्यंत उष्णतेची तीव्रता कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत शिक्षण विभागाने सकाळच्या सत्राचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याबरोबरच त्यांच्या आरोग्याचेही संरक्षण होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चंद्रपूरला नवे नेतृत्व: आयुष नोेपानी यांची जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती

0
चंद्रपूर ( निलेश ठाकरे - महाराष्ट्र हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र) :  जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्था व्यवस्थेला नवे बळ मिळणार असून आयुष नोेपानी यांची जिल्हा...

जिल्ह्यात आजपासून जनगणना सुरू; चुकीची माहिती दिल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :  जळगाव जिल्ह्यात आजपासून जनगणना प्रक्रियेला अधिकृतपणे सुरुवात झाली असून, या महत्त्वाच्या उपक्रमासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. जिल्हाभरात सुमारे ७...

डॉ. दीपक फाटक यांच्या कर्तृत्वाने रुग्ण मृत्यूच्या दाढेतून सुखरूप.

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : तालुक्यातील अंबू नाईक तांड्या (खांडवी) येथील आदिवासी पारधी समाजातील रहिवासी श्री. भद्री भोसले (वय ४०) यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे...

गढी ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिन उत्साहात; ध्वजारोहणासह मान्यवरांची उपस्थिती

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : तालुक्यातील गढी ग्रामपंचायत कार्यालयात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात माजी सरपंच तथा ज्येष्ठ समाजसेवक डॉ....

सुशीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती जल्लोषात; सामाजिक ऐक्याचा संदेश

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : तालुक्यातील सुशी गावात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात...

चंद्रपूरला नवे नेतृत्व: आयुष नोेपानी यांची जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती

0
चंद्रपूर ( निलेश ठाकरे - महाराष्ट्र हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र) :  जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्था व्यवस्थेला नवे बळ मिळणार असून आयुष नोेपानी यांची जिल्हा...

जिल्ह्यात आजपासून जनगणना सुरू; चुकीची माहिती दिल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :  जळगाव जिल्ह्यात आजपासून जनगणना प्रक्रियेला अधिकृतपणे सुरुवात झाली असून, या महत्त्वाच्या उपक्रमासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. जिल्हाभरात सुमारे ७...

डॉ. दीपक फाटक यांच्या कर्तृत्वाने रुग्ण मृत्यूच्या दाढेतून सुखरूप.

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : तालुक्यातील अंबू नाईक तांड्या (खांडवी) येथील आदिवासी पारधी समाजातील रहिवासी श्री. भद्री भोसले (वय ४०) यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे...

गढी ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिन उत्साहात; ध्वजारोहणासह मान्यवरांची उपस्थिती

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : तालुक्यातील गढी ग्रामपंचायत कार्यालयात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात माजी सरपंच तथा ज्येष्ठ समाजसेवक डॉ....

सुशीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती जल्लोषात; सामाजिक ऐक्याचा संदेश

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : तालुक्यातील सुशी गावात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात...
error: Content is protected !!