Homeमहाराष्ट्रतांदळवाडी हवेली वस्ती जि.प. शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

तांदळवाडी हवेली वस्ती जि.प. शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

विष्णू गायकवाड (गेवराई प्रतिनिधी ) : बीड तालुक्यातील तांदळवाडी हवेली वस्ती येथील जिल्हा परिषद शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समिती बीडचे ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी तुकाराम जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमानंतर शाळेच्या इमारतींचे लोकार्पणही करण्यात आले.

यानंतर विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक महोत्सवाला सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या हिंदी, मराठी व चित्रपट गीतांसह गोंधळी गीत, भीमगीत आणि विविध लोकगीते यांना उपस्थित नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांच्या अप्रतिम कलागुणांचे दर्शन घडल्याने उपस्थित नागरिक मंत्रमुग्ध झाले. प्रत्येक सादरीकरणाला प्रोत्साहन म्हणून नागरिकांनी १००, २०० व ५०० रुपयांची बक्षिसे देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

यावेळी कामखेडा केंद्रातील केंद्रप्रमुख सुनिता ससाने, केंद्रीय मुख्याध्यापक विक्रम गोरे, तांदळवाडीचे सरपंच कैलास निर्मळ, उपसरपंच परमेश्वर कोळेकर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तसेच विषय शिक्षक संतोष ठाकरे, एस. एम. पारधी, समिक्षा खाडे, समाधान अडसुळे, आशाताई परतेती, निशा कंगाली उपस्थित होते. तसेच ज्येष्ठ शिक्षक प्रल्हाद शिंदे, संतोष भाले, रकटे, राजाराम लकडे, आदर्श मुख्याध्यापक अरुण चौधरी, पत्रकार विष्णू गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ, पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शाळेत कार्यरत असलेल्या दोन शिक्षकांच्या कार्याचे तुकाराम जाधव यांनी विशेष कौतुक केले. या शिक्षकांनी वस्ती शाळेला नंदनवन बनवत विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांना बक्षिसे व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या स्नेहसंमेलनाची चर्चा तालुक्यासह जिल्ह्यात होत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भागवत जाधव यांनी केले, तर मुख्याध्यापक अरुण चौधरी यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महात्मा फुले जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा जागर; शिक्षण, समता आणि सत्यशोधक विचारांना अभिवादन

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्ह्यासह राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले....

जळगाव पोलीस दलात बदलाची नवी सुरुवात; संदीप गावित यांच्यावर अपर पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :  राज्य पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय फेरबदल करण्यात आले असून जळगाव जिल्ह्याच्या अपर पोलीस अधीक्षक पदावर संदीप रघुनाथ गावित...

परभणीत शेती मशागतीला वेग; बैलांची जागा घेत ट्रॅक्टरचा वाढता वापर

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) : खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने जिल्ह्यात शेती मशागतीच्या कामांना मोठा वेग आला आहे. पारंपरिक बैलजोडीवर आधारित शेती...

शिरपूरमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या; मंत्री अशोक ऊईके यांना निवेदन

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) : आदिवासी विद्यार्थी व समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, या मागणीसाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने...

अकोला राजंदा येथून १५ वर्षीय बालिका बेपत्ता; बार्शीटाकळी परिसरात चिंतेचे सावट

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव): अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील राजंदा गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या १५ वर्षांची अल्पवयीन मुलगी आपल्या राहत्या घरातून...

महात्मा फुले जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा जागर; शिक्षण, समता आणि सत्यशोधक विचारांना अभिवादन

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्ह्यासह राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले....

जळगाव पोलीस दलात बदलाची नवी सुरुवात; संदीप गावित यांच्यावर अपर पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :  राज्य पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय फेरबदल करण्यात आले असून जळगाव जिल्ह्याच्या अपर पोलीस अधीक्षक पदावर संदीप रघुनाथ गावित...

परभणीत शेती मशागतीला वेग; बैलांची जागा घेत ट्रॅक्टरचा वाढता वापर

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) : खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने जिल्ह्यात शेती मशागतीच्या कामांना मोठा वेग आला आहे. पारंपरिक बैलजोडीवर आधारित शेती...

शिरपूरमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या; मंत्री अशोक ऊईके यांना निवेदन

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) : आदिवासी विद्यार्थी व समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, या मागणीसाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने...

अकोला राजंदा येथून १५ वर्षीय बालिका बेपत्ता; बार्शीटाकळी परिसरात चिंतेचे सावट

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव): अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील राजंदा गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या १५ वर्षांची अल्पवयीन मुलगी आपल्या राहत्या घरातून...
error: Content is protected !!