Homeमहाराष्ट्रझाडूचा राजा अन् बाबांचे बाबा म्हणजे संत गाडगेबाबा” : डॉ. धनराज खानोरकर

झाडूचा राजा अन् बाबांचे बाबा म्हणजे संत गाडगेबाबा” : डॉ. धनराज खानोरकर

रुपेश देशमुख (ब्रह्मपुरी प्रतिनिधी ) : संत हे अनंत असतात. जगातील आघात सोसत समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य करणाऱ्यांनाच खरे संत म्हणतात. अशा संतांमध्ये संत गाडगेबाबा हे एकमेव “बाबांचे बाबा” होते. त्यांनी झाडूला शस्त्र मानत स्वच्छतेचा संदेश दिला, भोंदू बाबांचा पर्दाफाश केला आणि कीर्तनाच्या माध्यमातून शिक्षणाचे महत्त्व व माणसाच्या कर्माची जाणीव समाजात रुजवली. त्यामुळे खरा “झाडूचा राजा” आणि “बाबांचे बाबा” म्हणजे संत गाडगेबाबा होत, असे मार्मिक आणि काव्यमय विवेचन प्रसिद्ध कवी व लेखक डॉ. धनराज खानोरकर यांनी केले.

ते ब्रह्मपुरी येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात आयोजित ‘संत गाडगेबाबा : व्यक्ती आणि विचार’ या विषयावरील व्याख्यानात बोलत होते. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष शेकोकर होते, तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. युवराज मेश्राम उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. शेकोकर यांनी संत गाडगेबाबांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, गाडगेबाबांनी समाजाला स्वच्छतेचे, पर्यावरण संवर्धनाचे आणि शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. मानवी स्वच्छता आणि पर्यावरण स्वच्छता यांचा संदेश त्यांनी कृतीतून दिला, हे आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे.

डॉ. खानोरकर यांनी आपल्या व्याख्यानात गाडगेबाबांच्या जीवनातील विविध प्रसंग सांगत त्यांच्या समाजप्रबोधनाच्या कार्याचा वेध घेतला. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी अंधश्रद्धा, भोंदूगिरी आणि सामाजिक कुरीतींवर कठोर प्रहार करत लोकांना जागृत केले, असेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन जगदिश गुरनुले यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महात्मा फुले जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा जागर; शिक्षण, समता आणि सत्यशोधक विचारांना अभिवादन

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्ह्यासह राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले....

जळगाव पोलीस दलात बदलाची नवी सुरुवात; संदीप गावित यांच्यावर अपर पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :  राज्य पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय फेरबदल करण्यात आले असून जळगाव जिल्ह्याच्या अपर पोलीस अधीक्षक पदावर संदीप रघुनाथ गावित...

परभणीत शेती मशागतीला वेग; बैलांची जागा घेत ट्रॅक्टरचा वाढता वापर

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) : खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने जिल्ह्यात शेती मशागतीच्या कामांना मोठा वेग आला आहे. पारंपरिक बैलजोडीवर आधारित शेती...

शिरपूरमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या; मंत्री अशोक ऊईके यांना निवेदन

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) : आदिवासी विद्यार्थी व समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, या मागणीसाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने...

अकोला राजंदा येथून १५ वर्षीय बालिका बेपत्ता; बार्शीटाकळी परिसरात चिंतेचे सावट

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव): अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील राजंदा गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या १५ वर्षांची अल्पवयीन मुलगी आपल्या राहत्या घरातून...

महात्मा फुले जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा जागर; शिक्षण, समता आणि सत्यशोधक विचारांना अभिवादन

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्ह्यासह राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले....

जळगाव पोलीस दलात बदलाची नवी सुरुवात; संदीप गावित यांच्यावर अपर पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :  राज्य पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय फेरबदल करण्यात आले असून जळगाव जिल्ह्याच्या अपर पोलीस अधीक्षक पदावर संदीप रघुनाथ गावित...

परभणीत शेती मशागतीला वेग; बैलांची जागा घेत ट्रॅक्टरचा वाढता वापर

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) : खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने जिल्ह्यात शेती मशागतीच्या कामांना मोठा वेग आला आहे. पारंपरिक बैलजोडीवर आधारित शेती...

शिरपूरमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या; मंत्री अशोक ऊईके यांना निवेदन

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) : आदिवासी विद्यार्थी व समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, या मागणीसाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने...

अकोला राजंदा येथून १५ वर्षीय बालिका बेपत्ता; बार्शीटाकळी परिसरात चिंतेचे सावट

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव): अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील राजंदा गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या १५ वर्षांची अल्पवयीन मुलगी आपल्या राहत्या घरातून...
error: Content is protected !!