Homeमहाराष्ट्रभटके विमुक्त समाजाच्या मागण्यांसाठी व नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी आज बैठक

भटके विमुक्त समाजाच्या मागण्यांसाठी व नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी आज बैठक

विनोद पवार ( जळगाव प्रतिनिधी ) : भुसावळ तालुक्यातील भटके विमुक्त समाजातील विविध अडीअडचणी, प्रलंबित प्रश्न आणि समाजाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत भुसावळ तालुका व वरणगाव शहरासाठी नवीन पदाधिकाऱ्यांची निवड देखील करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

भटके विमुक्त समाजाच्या संघटनात्मक बळकटीसाठी तसेच समाजाच्या हक्काच्या प्रश्नांवर प्रभावीपणे लढा देण्यासाठी ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे. समाजकार्यात सक्रिय असलेल्या युवक, महिला तसेच अनुभवी कार्यकर्त्यांना संधी देण्याच्या उद्देशाने नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. यामुळे समाजातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी संघटनेला अधिक बळ मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

ही बैठक शनिवार, दिनांक 7 मार्च 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता वरणगाव येथील रेस्ट हाऊस जवळ आयोजित करण्यात आली आहे. भुसावळ तालुक्यातील भटके विमुक्त समाजातील सर्व बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून समाजाच्या प्रश्नांवर चर्चा करावी व संघटना मजबूत करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या बैठकीत समाजातील विविध प्रश्न, शासकीय योजना, समाजबांधवांचे हक्क तसेच संघटनात्मक मजबुती या विषयांवर सविस्तर चर्चा होणार आहे. तसेच आगामी काळात समाजहितासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे नियोजन देखील करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

भटके विमुक्त बहुजन संघाच्या वतीने ज्येष्ठ समाजसेवक रविंद्र गायकवाड, अरुण धनगर, भास्कर दादा पालिमकर, भगवान वंजारी, रफीक शेठ पठाण, देविदास गोसावी, सदाशिव भराडी, राजेश गुंमळकर, जितेंद्र भोई, नथु पवार, राजाराम वंजारी, कृष्णा धनगर, भुते काका कवी, रोहन भुसाडे, रवी पालिमकर, बंडू कपाटे, दुलचंद भोई, प्रकाश गुंमळकर, शंकर पवार, प्रकाश राजपूत, बैरागी सर तसेच महिला आघाडीच्या प्रमुख भारती कापसे, संध्या पवार आणि सोनिया गायकवाड यांनी हे आवाहन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महात्मा फुले जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा जागर; शिक्षण, समता आणि सत्यशोधक विचारांना अभिवादन

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्ह्यासह राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले....

जळगाव पोलीस दलात बदलाची नवी सुरुवात; संदीप गावित यांच्यावर अपर पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :  राज्य पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय फेरबदल करण्यात आले असून जळगाव जिल्ह्याच्या अपर पोलीस अधीक्षक पदावर संदीप रघुनाथ गावित...

परभणीत शेती मशागतीला वेग; बैलांची जागा घेत ट्रॅक्टरचा वाढता वापर

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) : खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने जिल्ह्यात शेती मशागतीच्या कामांना मोठा वेग आला आहे. पारंपरिक बैलजोडीवर आधारित शेती...

शिरपूरमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या; मंत्री अशोक ऊईके यांना निवेदन

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) : आदिवासी विद्यार्थी व समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, या मागणीसाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने...

अकोला राजंदा येथून १५ वर्षीय बालिका बेपत्ता; बार्शीटाकळी परिसरात चिंतेचे सावट

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव): अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील राजंदा गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या १५ वर्षांची अल्पवयीन मुलगी आपल्या राहत्या घरातून...

महात्मा फुले जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा जागर; शिक्षण, समता आणि सत्यशोधक विचारांना अभिवादन

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्ह्यासह राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले....

जळगाव पोलीस दलात बदलाची नवी सुरुवात; संदीप गावित यांच्यावर अपर पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :  राज्य पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय फेरबदल करण्यात आले असून जळगाव जिल्ह्याच्या अपर पोलीस अधीक्षक पदावर संदीप रघुनाथ गावित...

परभणीत शेती मशागतीला वेग; बैलांची जागा घेत ट्रॅक्टरचा वाढता वापर

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) : खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने जिल्ह्यात शेती मशागतीच्या कामांना मोठा वेग आला आहे. पारंपरिक बैलजोडीवर आधारित शेती...

शिरपूरमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या; मंत्री अशोक ऊईके यांना निवेदन

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) : आदिवासी विद्यार्थी व समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, या मागणीसाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने...

अकोला राजंदा येथून १५ वर्षीय बालिका बेपत्ता; बार्शीटाकळी परिसरात चिंतेचे सावट

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव): अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील राजंदा गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या १५ वर्षांची अल्पवयीन मुलगी आपल्या राहत्या घरातून...
error: Content is protected !!