विनोद पवार ( जळगाव प्रतिनिधी ) : भुसावळ तालुक्यातील भटके विमुक्त समाजातील विविध अडीअडचणी, प्रलंबित प्रश्न आणि समाजाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत भुसावळ तालुका व वरणगाव शहरासाठी नवीन पदाधिकाऱ्यांची निवड देखील करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
भटके विमुक्त समाजाच्या संघटनात्मक बळकटीसाठी तसेच समाजाच्या हक्काच्या प्रश्नांवर प्रभावीपणे लढा देण्यासाठी ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे. समाजकार्यात सक्रिय असलेल्या युवक, महिला तसेच अनुभवी कार्यकर्त्यांना संधी देण्याच्या उद्देशाने नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. यामुळे समाजातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी संघटनेला अधिक बळ मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
ही बैठक शनिवार, दिनांक 7 मार्च 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता वरणगाव येथील रेस्ट हाऊस जवळ आयोजित करण्यात आली आहे. भुसावळ तालुक्यातील भटके विमुक्त समाजातील सर्व बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून समाजाच्या प्रश्नांवर चर्चा करावी व संघटना मजबूत करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या बैठकीत समाजातील विविध प्रश्न, शासकीय योजना, समाजबांधवांचे हक्क तसेच संघटनात्मक मजबुती या विषयांवर सविस्तर चर्चा होणार आहे. तसेच आगामी काळात समाजहितासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे नियोजन देखील करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
भटके विमुक्त बहुजन संघाच्या वतीने ज्येष्ठ समाजसेवक रविंद्र गायकवाड, अरुण धनगर, भास्कर दादा पालिमकर, भगवान वंजारी, रफीक शेठ पठाण, देविदास गोसावी, सदाशिव भराडी, राजेश गुंमळकर, जितेंद्र भोई, नथु पवार, राजाराम वंजारी, कृष्णा धनगर, भुते काका कवी, रोहन भुसाडे, रवी पालिमकर, बंडू कपाटे, दुलचंद भोई, प्रकाश गुंमळकर, शंकर पवार, प्रकाश राजपूत, बैरागी सर तसेच महिला आघाडीच्या प्रमुख भारती कापसे, संध्या पवार आणि सोनिया गायकवाड यांनी हे आवाहन केले आहे.






















