Homeमहाराष्ट्रभटके विमुक्त समाजाच्या मागण्यांसाठी व नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी आज बैठक

भटके विमुक्त समाजाच्या मागण्यांसाठी व नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी आज बैठक

विनोद पवार ( जळगाव प्रतिनिधी ) : भुसावळ तालुक्यातील भटके विमुक्त समाजातील विविध अडीअडचणी, प्रलंबित प्रश्न आणि समाजाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत भुसावळ तालुका व वरणगाव शहरासाठी नवीन पदाधिकाऱ्यांची निवड देखील करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

भटके विमुक्त समाजाच्या संघटनात्मक बळकटीसाठी तसेच समाजाच्या हक्काच्या प्रश्नांवर प्रभावीपणे लढा देण्यासाठी ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे. समाजकार्यात सक्रिय असलेल्या युवक, महिला तसेच अनुभवी कार्यकर्त्यांना संधी देण्याच्या उद्देशाने नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. यामुळे समाजातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी संघटनेला अधिक बळ मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

ही बैठक शनिवार, दिनांक 7 मार्च 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता वरणगाव येथील रेस्ट हाऊस जवळ आयोजित करण्यात आली आहे. भुसावळ तालुक्यातील भटके विमुक्त समाजातील सर्व बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून समाजाच्या प्रश्नांवर चर्चा करावी व संघटना मजबूत करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या बैठकीत समाजातील विविध प्रश्न, शासकीय योजना, समाजबांधवांचे हक्क तसेच संघटनात्मक मजबुती या विषयांवर सविस्तर चर्चा होणार आहे. तसेच आगामी काळात समाजहितासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे नियोजन देखील करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

भटके विमुक्त बहुजन संघाच्या वतीने ज्येष्ठ समाजसेवक रविंद्र गायकवाड, अरुण धनगर, भास्कर दादा पालिमकर, भगवान वंजारी, रफीक शेठ पठाण, देविदास गोसावी, सदाशिव भराडी, राजेश गुंमळकर, जितेंद्र भोई, नथु पवार, राजाराम वंजारी, कृष्णा धनगर, भुते काका कवी, रोहन भुसाडे, रवी पालिमकर, बंडू कपाटे, दुलचंद भोई, प्रकाश गुंमळकर, शंकर पवार, प्रकाश राजपूत, बैरागी सर तसेच महिला आघाडीच्या प्रमुख भारती कापसे, संध्या पवार आणि सोनिया गायकवाड यांनी हे आवाहन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आवळगाव येथे ‘महाराजस्व समाधान शिबीर’ उत्साहात;५२६ लाभार्थ्यांना शासकीय दाखल्यांचे वाटप,

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) :  ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी आणि विद्यार्थ्यांचे महसूल विभागाशी संबंधित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी राज्य शासनाच्या निर्णयानुसार 'छत्रपती शिवाजी महाराज...

सुशी येथे ३९ वा अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात संपन्न

0
 गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) :  तालुक्यातील सुशी येथे आयोजित ३९ व्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता मोठ्या उत्साहात पार पडली. या प्रसंगी श्रीक्षेत्र नारायणगडाचे उत्तराधिकारी ह.भ.प....

भीम जयंतीनिमित्त दौंडमध्ये ‘भीम पँथर गौरव पुरस्कार’ सोहळा उत्साहात

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड, मयुर साळवे) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त दौंड शहरात न्यू महाराष्ट्र पँथर सेनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांसह भव्य...

सीबीएससी दहावीच्या परीक्षेत पीएमश्री जवाहर नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा डंका

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) शैक्षणिक सत्र 2025–26 चा दहावीचा निकाल जाहीर होताच बीड जिल्ह्यातील गढी (शिवाजीनगर) येथील पीएमश्री जवाहर...

शिक्षण विभागाचा बोगस कारभार खपवून घेतला जाणार नाही- आमदार सत्यजीत तांबे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) :  राज्यातील शालेय शिक्षण विभागामध्ये सुरू असलेल्या अंधाधुंदी, गोंधळ आणि प्रशासकीय कामकाजाविरोधात आमदार सत्यजीत तांबे यांनी राज्याचे शिक्षण आयुक्त यांना...

आवळगाव येथे ‘महाराजस्व समाधान शिबीर’ उत्साहात;५२६ लाभार्थ्यांना शासकीय दाखल्यांचे वाटप,

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) :  ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी आणि विद्यार्थ्यांचे महसूल विभागाशी संबंधित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी राज्य शासनाच्या निर्णयानुसार 'छत्रपती शिवाजी महाराज...

सुशी येथे ३९ वा अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात संपन्न

0
 गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) :  तालुक्यातील सुशी येथे आयोजित ३९ व्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता मोठ्या उत्साहात पार पडली. या प्रसंगी श्रीक्षेत्र नारायणगडाचे उत्तराधिकारी ह.भ.प....

भीम जयंतीनिमित्त दौंडमध्ये ‘भीम पँथर गौरव पुरस्कार’ सोहळा उत्साहात

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड, मयुर साळवे) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त दौंड शहरात न्यू महाराष्ट्र पँथर सेनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांसह भव्य...

सीबीएससी दहावीच्या परीक्षेत पीएमश्री जवाहर नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा डंका

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) शैक्षणिक सत्र 2025–26 चा दहावीचा निकाल जाहीर होताच बीड जिल्ह्यातील गढी (शिवाजीनगर) येथील पीएमश्री जवाहर...

शिक्षण विभागाचा बोगस कारभार खपवून घेतला जाणार नाही- आमदार सत्यजीत तांबे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) :  राज्यातील शालेय शिक्षण विभागामध्ये सुरू असलेल्या अंधाधुंदी, गोंधळ आणि प्रशासकीय कामकाजाविरोधात आमदार सत्यजीत तांबे यांनी राज्याचे शिक्षण आयुक्त यांना...
error: Content is protected !!