Homeताज्या बातम्यागेवराई-भिवंडी बससेवा अचानक बंद; प्रवाशांचे प्रचंड हाल

गेवराई-भिवंडी बससेवा अचानक बंद; प्रवाशांचे प्रचंड हाल

गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई आगारातून अनेक वर्षांपासून नियमित सुरु असलेली गेवराई-भिवंडी बससेवा मागील काही दिवसांपासून पूर्णपणे बंद करण्यात आल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. विशेष म्हणजे ही बससेवा बंद करण्यामागे आगारप्रमुखांचा मनमानी व गलथान कारभार कारणीभूत असल्याचा आरोप प्रवासी, नागरिकांकडून करण्यात येत आहे.
     गेवराई आगारातून सकाळी सव्वा आठ वाजता सुटणारी ही बस पाडळशिंगी, मादळमोही, कोळगाव, तिंतरवणी, पाथर्डी, अहिल्यानगर (अहमदनगर) मार्गे भिवंडीपर्यंत जात होती. या मार्गावरील शेकडो प्रवाशांसाठी ही बस अत्यंत महत्त्वाची मानली जात होती. विशेषतः अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचारासाठी जाणारे रुग्ण, कामानिमित्त प्रवास करणारे नागरिक तसेच विद्यार्थी यांच्यासाठी ही बससेवा मोठा आधार होती. मात्र मागील काही महिन्यांपासून ही बस अधूनमधूनच सोडली जात असल्याचे दिसून येत होते. त्यानंतर मागील चार-पाच दिवसांपासून ही बससेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. याबाबत आगार प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती किंवा पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. 
   मुळात या मार्गावर आधीच बससेवा कमी असताना वर्षानुवर्षे नियमित सुरु असलेली गेवराई-भिवंडी बस अचानक बंद करण्यामागे आगारप्रमुखांना नेमके साध्य काय करायचे आहे?
असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. ही बससेवा बंद करण्यात आल्याने प्रवाशांचे हाल होत असताना आगारप्रमुख मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची टीका होत आहे. या मनमानी कारभारामुळे रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असून त्यासाठी जादा पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे आगारप्रमुखांच्या गलथान व निष्क्रिय कारभारावर नागरिकांनी संताप व्यक्त केला असून तात्काळ ही बससेवा पूर्ववत सुरु करण्याची मागणी जोर धरत आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भीम जयंतीनिमित्त दौंडमध्ये ‘भीम पँथर गौरव पुरस्कार’ सोहळा उत्साहात

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड, मयुर साळवे) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त दौंड शहरात न्यू महाराष्ट्र पँथर सेनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांसह भव्य...

सीबीएससी दहावीच्या परीक्षेत पीएमश्री जवाहर नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा डंका

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) शैक्षणिक सत्र 2025–26 चा दहावीचा निकाल जाहीर होताच बीड जिल्ह्यातील गढी (शिवाजीनगर) येथील पीएमश्री जवाहर...

शिक्षण विभागाचा बोगस कारभार खपवून घेतला जाणार नाही- आमदार सत्यजीत तांबे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) :  राज्यातील शालेय शिक्षण विभागामध्ये सुरू असलेल्या अंधाधुंदी, गोंधळ आणि प्रशासकीय कामकाजाविरोधात आमदार सत्यजीत तांबे यांनी राज्याचे शिक्षण आयुक्त यांना...

आवळगाव व पिंपळगाव येथे ‘महाराजस्व समाधान शिबीर’ उत्साहात; ५२६ लाभार्थ्यांना शासकीय दाखल्यांचे वाटप

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी आणि विद्यार्थ्यांचे महसूल विभागाशी संबंधित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी राज्य शासनाच्या निर्णयानुसार 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व...

मुंबई राज्य पोलीस बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेसाठी मयूर बोरसे यांची तांत्रिक अधिकारी (STO) म्हणून निवड

0
धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) :   मुंबई शहर येथे दिनांक 20 ते 27 एप्रिल 2026 दरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या 36 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा...

भीम जयंतीनिमित्त दौंडमध्ये ‘भीम पँथर गौरव पुरस्कार’ सोहळा उत्साहात

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड, मयुर साळवे) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त दौंड शहरात न्यू महाराष्ट्र पँथर सेनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांसह भव्य...

सीबीएससी दहावीच्या परीक्षेत पीएमश्री जवाहर नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा डंका

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) शैक्षणिक सत्र 2025–26 चा दहावीचा निकाल जाहीर होताच बीड जिल्ह्यातील गढी (शिवाजीनगर) येथील पीएमश्री जवाहर...

शिक्षण विभागाचा बोगस कारभार खपवून घेतला जाणार नाही- आमदार सत्यजीत तांबे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) :  राज्यातील शालेय शिक्षण विभागामध्ये सुरू असलेल्या अंधाधुंदी, गोंधळ आणि प्रशासकीय कामकाजाविरोधात आमदार सत्यजीत तांबे यांनी राज्याचे शिक्षण आयुक्त यांना...

आवळगाव व पिंपळगाव येथे ‘महाराजस्व समाधान शिबीर’ उत्साहात; ५२६ लाभार्थ्यांना शासकीय दाखल्यांचे वाटप

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी आणि विद्यार्थ्यांचे महसूल विभागाशी संबंधित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी राज्य शासनाच्या निर्णयानुसार 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व...

मुंबई राज्य पोलीस बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेसाठी मयूर बोरसे यांची तांत्रिक अधिकारी (STO) म्हणून निवड

0
धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) :   मुंबई शहर येथे दिनांक 20 ते 27 एप्रिल 2026 दरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या 36 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा...
error: Content is protected !!