Homeमनोरंजनरामनवमी निमित्ताने धायरी परिसरात भव्य शोभायात्रेचे आयोजन ; भाविक व नागरिकांचा उदंड...

रामनवमी निमित्ताने धायरी परिसरात भव्य शोभायात्रेचे आयोजन ; भाविक व नागरिकांचा उदंड प्रतिसाद.

Times Of Maharashtra :  रामनवमीनिमित्त धायरी परिसरात भगवान श्रीरामांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या यात्रेत स्थानिक नागरिक, युवक व महिला मोठ्या उत्साहाने पारंपारिक वेशभूषा परिधान करून सहभागी झाले. या शोभायात्रेमुळे धायरीत प्रचंड उत्साहाचे, भक्तिपूर्ण आणि चैतन्यमय वातावरण निर्माण झाले.

सरकार प्रतिष्ठान, अखिल नरवीर तानाजी मालुसरे पथ श्रीराम नवमी उत्सव समितीच्या वतीने ही शोभायात्रा आयोजित करण्यात आली. लक्ष्मी मंगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली आशिष बेनकर, अक्षय उंदरे, गणेश साखरे, सचिन सोनवणे, संदीप स्वामी, गणेश पासलकर, गणेश खामकर, अजिंक्य जाधव यांनी ही यात्रा भव्य आणि देखण्या स्वरूपात पार पाडली.

भव्य रथावर फुलांची आरास आणि दिव्यांची रोषणाई, त्यात प्रभू श्रीरामांची धनुर्धारी प्रतिमा स्थापित करण्यात आली. या रथाच्या समोर सध्या समाजातील अत्यंत गंभीर स्वरूप धारण केलेल्या महिलांवरील अत्याचार आणि विशेषतः लव्ह जिहादच्या नावाखाली होणारी महिलांची फसवणूक याबाबत जनजागृती करणारे देखावे, आणि चित्र यांचा समावेश असलेला रथ मार्गक्रमण करत होता. म मल्हारी खंडेराय आणि बानू यांच्या विवाहाचा देखावा आणि पारंपारिक कर्नाटकी देखावाही एका रथावर साकारण्यात आला.

शंखवादन पथक, परशुराम वाद्य पथक, ढोल लेझीम पथक, बँड पथके, वारकरी भजनी मंडळ यांनीही शोभायात्रेत सहभागी होऊन त्यात रंग भरले. शोभायात्रा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने रस्त्याच्या बाजूला गर्दी केली. गणेश नगरी ते धायरी फाटा या मार्गावर काढण्यात आलेल्या या शोभायात्रेमुळे परिसरातील वातावरण पावित्र्यमय बनले.

शोभा यात्रेचे हे दुसरे वर्ष असून अल्पावधीतच या उपक्रमाला धायरीकरांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांमध्ये धर्मभावना, संघटितपणाची वृत्ती निर्माण करण्याबरोबरच विविध सामाजिक प्रश्नाबाबत वाचा फोडणे व जनजागृती करणे, या उद्देशाने मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांच्या रथयात्रेचे आयोजन केले जात असल्याची माहिती गणेश साखरे यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘टाईम्स ऑफ महाराष्ट्र’ विशेष वृत्त: भारती विद्यापीठ ट्रॅफिक पोलिसांची नागरिकांवर उघड दहशत! नियमनाऐवजी ‘गाड्या...

0

पुणे: शहरात वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असताना, भारती विद्यापीठ वाहतूक विभागाचे पोलीस मात्र वाहतूक नियमन करण्याऐवजी नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यात धन्यता मानत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. रस्त्यावर उभे राहून नागरिकांना शिस्त लावण्याऐवजी, हे रक्षकच आता भक्षक बनल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. ठळक मुद्दे: एका चौकात पाच ते सहा पोलिसांचा ताफा:ड्युटी दोन जणांची […]

आत्मा योजनेतून सिन्नरमध्ये विदेशी भाजीपाला शेतीला चालना; नाविन्यपूर्ण पिकांमुळे शेतकऱ्यांना उत्पन्नवाढीची संधी

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड)  कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत सिन्नर तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या विदेशी भाजीपाला शेती शाळा आणि पिक प्रात्यक्षिक उपक्रमामुळे नाविन्यपूर्ण शेतीला...

महाराष्ट्रात बियाणे कायदा अधिक कठोर होणार; कृषिमंत्री भरणे यांच्या बैठकीत आमदार रणधीर सावरकरांच्या महत्त्वपूर्ण...

0
अकोला:महाराष्ट्र राज्यात बियाणे उत्पादन, विक्री , वितरण व साठवणूक याबाबत शेतकऱ्यांचे सर्वांगीण हीत लक्षात घेऊन परीपुर्ण आणि कठोर असा नवीन कायदा कायदा तयार करण्याकरिता...

दौंडमध्ये मोकाट जनावरे व कुत्र्यांच्या प्रश्नावर प्रशासनाविरोधात धरणे आंदोलन; मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड,मयुर साळवे) दौंड शहरातील मोकाट जनावरे व भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, या समस्येकडे नगरपालिकेच्या प्रशासनाचे होत असलेले...

महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार; २० जुलै रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

0
जळगाव:(प्रतिनिधी : विनोद पवार) महिलांच्या विविध समस्या, तक्रारी व अडचणींचे प्रभावी आणि तातडीने निराकरण करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोमवार, २० जुलै २०२६ रोजी...

‘टाईम्स ऑफ महाराष्ट्र’ विशेष वृत्त: भारती विद्यापीठ ट्रॅफिक पोलिसांची नागरिकांवर उघड दहशत! नियमनाऐवजी ‘गाड्या...

0

पुणे: शहरात वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असताना, भारती विद्यापीठ वाहतूक विभागाचे पोलीस मात्र वाहतूक नियमन करण्याऐवजी नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यात धन्यता मानत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. रस्त्यावर उभे राहून नागरिकांना शिस्त लावण्याऐवजी, हे रक्षकच आता भक्षक बनल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. ठळक मुद्दे: एका चौकात पाच ते सहा पोलिसांचा ताफा:ड्युटी दोन जणांची […]

आत्मा योजनेतून सिन्नरमध्ये विदेशी भाजीपाला शेतीला चालना; नाविन्यपूर्ण पिकांमुळे शेतकऱ्यांना उत्पन्नवाढीची संधी

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड)  कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत सिन्नर तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या विदेशी भाजीपाला शेती शाळा आणि पिक प्रात्यक्षिक उपक्रमामुळे नाविन्यपूर्ण शेतीला...

महाराष्ट्रात बियाणे कायदा अधिक कठोर होणार; कृषिमंत्री भरणे यांच्या बैठकीत आमदार रणधीर सावरकरांच्या महत्त्वपूर्ण...

0
अकोला:महाराष्ट्र राज्यात बियाणे उत्पादन, विक्री , वितरण व साठवणूक याबाबत शेतकऱ्यांचे सर्वांगीण हीत लक्षात घेऊन परीपुर्ण आणि कठोर असा नवीन कायदा कायदा तयार करण्याकरिता...

दौंडमध्ये मोकाट जनावरे व कुत्र्यांच्या प्रश्नावर प्रशासनाविरोधात धरणे आंदोलन; मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड,मयुर साळवे) दौंड शहरातील मोकाट जनावरे व भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, या समस्येकडे नगरपालिकेच्या प्रशासनाचे होत असलेले...

महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार; २० जुलै रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

0
जळगाव:(प्रतिनिधी : विनोद पवार) महिलांच्या विविध समस्या, तक्रारी व अडचणींचे प्रभावी आणि तातडीने निराकरण करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोमवार, २० जुलै २०२६ रोजी...
error: Content is protected !!