Homeआरोग्यब्रह्मपुरी हादरली! शस्त्रक्रियेनंतर तिघांना कायमचे अंधत्व; हॉस्पिटलचा परवानाच गुल.

ब्रह्मपुरी हादरली! शस्त्रक्रियेनंतर तिघांना कायमचे अंधत्व; हॉस्पिटलचा परवानाच गुल.

ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : वैद्यकीय क्षेत्राला देवदूताचा दर्जा दिला जातो आणि ‘रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा’ मानली जाते. मात्र, ब्रह्मपुरीतील ख्रिस्तानंद हॉस्पिटलमध्ये या तत्त्वाला हरताळ फासल्याचा प्रकार समोर आला आहे. मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर तीन रुग्णांनी आपली दृष्टी गमावल्याच्या गंभीर प्रकरणाची दखल घेत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे यांनी सोमवारी या रुग्णालयावर मोठी कारवाई केली. रुग्णालयाची नोंदणी रद्द करण्यासोबतच तिथले शस्त्रक्रियागृह (OT) सील करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, १९ फेब्रुवारी रोजी ख्रिस्तानंद हॉस्पिटलमध्ये तीन रुग्णांवर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रियेनंतर काही दिवसांतच या रुग्णांना डोळ्यांत जंतूसंसर्ग झाला. वेदना असह्य झाल्याने आणि दृष्टी अंधुक झाल्याने या रुग्णांनी पुन्हा डॉक्टरांशी संपर्क साधला, मात्र तोपर्यंत त्यांची दृष्टी कायमची गेली होती. रुग्णांच्या नातेवाईकांनी याप्रकरणी प्रशासनाकडे धाव घेत न्यायाची मागणी केली होती.

प्राथमिक तपासणीत रुग्णालयात मोठ्या प्रमाणात अनियमितता आणि ‘बॉम्बे नर्सिंग होम ॲक्ट 1949’ चे गंभीर उल्लंघन आढळून आले. स्वतंत्र नेत्ररोग खाटा मंजूर नसतानाही अवैधरित्या नेत्र शस्त्रक्रियागृह चालविले जात होते. तसेच राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाच्या नियमांचाही भंग झाल्याचेही दिसून आले. यानंतर
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत सोमवारी या
रुग्णालयाची नोंदणी तत्काळ रद्द करत ऑपरेशन थिएटरसह महत्त्वाचे विभाग सील केले.

एकीकडे सरकार दर्जेदार आरोग्य सेवेचा दावा करत असताना, परवाना नसतानाही खासगी रुग्णालये रुग्णांच्या आयुष्याशी असा जीवघेणा खेळ कसा खेळू शकतात? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. ख्रिस्तानंद हॉस्पिटलच्या या कारभारामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून, अशा ‘खाटिकखान्यांवर’ कायमची बंदी घालावी, अशी मागणी जोर धरत आहे.

दृष्टी गेलेल्या रुग्णांचे आयुष्य अंधारात ढकलणाऱ्या संबंधित डॉक्टरांवर आणि व्यवस्थापनावर केवळ रुग्णालय सील करून चालणार नाही, तर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी संतप्त नागरिकांकडून होत आहे. आता आरोग्य विभाग या प्रकरणात नेमकी काय आणि किती कठोर कारवाई करते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चंद्रपूरला नवे नेतृत्व: आयुष नोेपानी यांची जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती

0
चंद्रपूर ( निलेश ठाकरे - महाराष्ट्र हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र) :  जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्था व्यवस्थेला नवे बळ मिळणार असून आयुष नोेपानी यांची जिल्हा...

जिल्ह्यात आजपासून जनगणना सुरू; चुकीची माहिती दिल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :  जळगाव जिल्ह्यात आजपासून जनगणना प्रक्रियेला अधिकृतपणे सुरुवात झाली असून, या महत्त्वाच्या उपक्रमासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. जिल्हाभरात सुमारे ७...

डॉ. दीपक फाटक यांच्या कर्तृत्वाने रुग्ण मृत्यूच्या दाढेतून सुखरूप.

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : तालुक्यातील अंबू नाईक तांड्या (खांडवी) येथील आदिवासी पारधी समाजातील रहिवासी श्री. भद्री भोसले (वय ४०) यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे...

गढी ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिन उत्साहात; ध्वजारोहणासह मान्यवरांची उपस्थिती

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : तालुक्यातील गढी ग्रामपंचायत कार्यालयात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात माजी सरपंच तथा ज्येष्ठ समाजसेवक डॉ....

सुशीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती जल्लोषात; सामाजिक ऐक्याचा संदेश

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : तालुक्यातील सुशी गावात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात...

चंद्रपूरला नवे नेतृत्व: आयुष नोेपानी यांची जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती

0
चंद्रपूर ( निलेश ठाकरे - महाराष्ट्र हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र) :  जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्था व्यवस्थेला नवे बळ मिळणार असून आयुष नोेपानी यांची जिल्हा...

जिल्ह्यात आजपासून जनगणना सुरू; चुकीची माहिती दिल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :  जळगाव जिल्ह्यात आजपासून जनगणना प्रक्रियेला अधिकृतपणे सुरुवात झाली असून, या महत्त्वाच्या उपक्रमासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. जिल्हाभरात सुमारे ७...

डॉ. दीपक फाटक यांच्या कर्तृत्वाने रुग्ण मृत्यूच्या दाढेतून सुखरूप.

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : तालुक्यातील अंबू नाईक तांड्या (खांडवी) येथील आदिवासी पारधी समाजातील रहिवासी श्री. भद्री भोसले (वय ४०) यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे...

गढी ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिन उत्साहात; ध्वजारोहणासह मान्यवरांची उपस्थिती

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : तालुक्यातील गढी ग्रामपंचायत कार्यालयात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात माजी सरपंच तथा ज्येष्ठ समाजसेवक डॉ....

सुशीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती जल्लोषात; सामाजिक ऐक्याचा संदेश

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : तालुक्यातील सुशी गावात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात...
error: Content is protected !!