Homeआरोग्यब्रह्मपुरी हादरली! शस्त्रक्रियेनंतर तिघांना कायमचे अंधत्व; हॉस्पिटलचा परवानाच गुल.

ब्रह्मपुरी हादरली! शस्त्रक्रियेनंतर तिघांना कायमचे अंधत्व; हॉस्पिटलचा परवानाच गुल.

ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : वैद्यकीय क्षेत्राला देवदूताचा दर्जा दिला जातो आणि ‘रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा’ मानली जाते. मात्र, ब्रह्मपुरीतील ख्रिस्तानंद हॉस्पिटलमध्ये या तत्त्वाला हरताळ फासल्याचा प्रकार समोर आला आहे. मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर तीन रुग्णांनी आपली दृष्टी गमावल्याच्या गंभीर प्रकरणाची दखल घेत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे यांनी सोमवारी या रुग्णालयावर मोठी कारवाई केली. रुग्णालयाची नोंदणी रद्द करण्यासोबतच तिथले शस्त्रक्रियागृह (OT) सील करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, १९ फेब्रुवारी रोजी ख्रिस्तानंद हॉस्पिटलमध्ये तीन रुग्णांवर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रियेनंतर काही दिवसांतच या रुग्णांना डोळ्यांत जंतूसंसर्ग झाला. वेदना असह्य झाल्याने आणि दृष्टी अंधुक झाल्याने या रुग्णांनी पुन्हा डॉक्टरांशी संपर्क साधला, मात्र तोपर्यंत त्यांची दृष्टी कायमची गेली होती. रुग्णांच्या नातेवाईकांनी याप्रकरणी प्रशासनाकडे धाव घेत न्यायाची मागणी केली होती.

प्राथमिक तपासणीत रुग्णालयात मोठ्या प्रमाणात अनियमितता आणि ‘बॉम्बे नर्सिंग होम ॲक्ट 1949’ चे गंभीर उल्लंघन आढळून आले. स्वतंत्र नेत्ररोग खाटा मंजूर नसतानाही अवैधरित्या नेत्र शस्त्रक्रियागृह चालविले जात होते. तसेच राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाच्या नियमांचाही भंग झाल्याचेही दिसून आले. यानंतर
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत सोमवारी या
रुग्णालयाची नोंदणी तत्काळ रद्द करत ऑपरेशन थिएटरसह महत्त्वाचे विभाग सील केले.

एकीकडे सरकार दर्जेदार आरोग्य सेवेचा दावा करत असताना, परवाना नसतानाही खासगी रुग्णालये रुग्णांच्या आयुष्याशी असा जीवघेणा खेळ कसा खेळू शकतात? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. ख्रिस्तानंद हॉस्पिटलच्या या कारभारामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून, अशा ‘खाटिकखान्यांवर’ कायमची बंदी घालावी, अशी मागणी जोर धरत आहे.

दृष्टी गेलेल्या रुग्णांचे आयुष्य अंधारात ढकलणाऱ्या संबंधित डॉक्टरांवर आणि व्यवस्थापनावर केवळ रुग्णालय सील करून चालणार नाही, तर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी संतप्त नागरिकांकडून होत आहे. आता आरोग्य विभाग या प्रकरणात नेमकी काय आणि किती कठोर कारवाई करते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा; हजारो योगप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग

0
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): शिरपूर एज्युकेशन सोसायटी आणि आर. सी. पटेल एज्युकेशन ट्रस्ट, तसेच योग विद्या धाम शिरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग...

आंतरराष्ट्रीय योग दिन : भारताच्या अमर ज्ञानपरंपरेचा जागतिक गौरव आणि आधुनिक जीवनाची संजीवनी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड): मानवाच्या जीवनप्रवासात शरीर, मन आणि आत्मा यांच्यातील समतोल राखण्याचा अखंड प्रयत्न म्हणजे योग. हजारो वर्षांपूर्वी भारतीय ऋषी-मुनींनी शोधलेली ही जीवनपद्धती...

शेतकऱ्यांचे रस्त्याचे प्रश्न तातडीने सोडवा, सौहार्दाने वागा

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन महसूल प्रशासन हे शासन आणि नागरिक यांच्यामधील सर्वात महत्त्वाचा दुवा असून शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत त्यांचे प्रश्न...

दबावाला न झुकणाऱ्या खासदार राजाभाऊ वाजे यांचा लायन्स क्लबतर्फे विशेष सत्कार

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेल्या ‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर कोणत्याही दबावाला अथवा प्रलोभनांना बळी न पडता आपल्या तत्त्वांशी आणि जनतेशी एकनिष्ठ...

विकासाच्या गजरात हरवलेला माणूस : भारताच्या भवितव्यावर गंभीर प्रश्नचिन्ह!

0
महाराष्ट्र स्टेट हेड (निलेश ठाकरे): भारत प्रगतीच्या वाटेवर असल्याचे दावे रोज ऐकायला मिळतात. तंत्रज्ञान, उद्योग, महामार्ग, डिजिटल क्रांती यांची चर्चा मोठ्या प्रमाणावर होते. मात्र...

शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा; हजारो योगप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग

0
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): शिरपूर एज्युकेशन सोसायटी आणि आर. सी. पटेल एज्युकेशन ट्रस्ट, तसेच योग विद्या धाम शिरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग...

आंतरराष्ट्रीय योग दिन : भारताच्या अमर ज्ञानपरंपरेचा जागतिक गौरव आणि आधुनिक जीवनाची संजीवनी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड): मानवाच्या जीवनप्रवासात शरीर, मन आणि आत्मा यांच्यातील समतोल राखण्याचा अखंड प्रयत्न म्हणजे योग. हजारो वर्षांपूर्वी भारतीय ऋषी-मुनींनी शोधलेली ही जीवनपद्धती...

शेतकऱ्यांचे रस्त्याचे प्रश्न तातडीने सोडवा, सौहार्दाने वागा

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन महसूल प्रशासन हे शासन आणि नागरिक यांच्यामधील सर्वात महत्त्वाचा दुवा असून शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत त्यांचे प्रश्न...

दबावाला न झुकणाऱ्या खासदार राजाभाऊ वाजे यांचा लायन्स क्लबतर्फे विशेष सत्कार

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेल्या ‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर कोणत्याही दबावाला अथवा प्रलोभनांना बळी न पडता आपल्या तत्त्वांशी आणि जनतेशी एकनिष्ठ...

विकासाच्या गजरात हरवलेला माणूस : भारताच्या भवितव्यावर गंभीर प्रश्नचिन्ह!

0
महाराष्ट्र स्टेट हेड (निलेश ठाकरे): भारत प्रगतीच्या वाटेवर असल्याचे दावे रोज ऐकायला मिळतात. तंत्रज्ञान, उद्योग, महामार्ग, डिजिटल क्रांती यांची चर्चा मोठ्या प्रमाणावर होते. मात्र...
error: Content is protected !!