मुंबई (प्रतिनिधी तुषार शेटे) : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या वतीने बिनविरोध विजयी झालेल्या प्रदेश सरचिटणीस श्रीमती माधवीताई नाईक आणि श्री. सुनिलजी कर्जतकर यांचा नंदुरबार भाजपा जिल्हा प्रभारी तथा धुळे भाजपा माजी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी मुंबईतील दादर येथील भाजपा प्रदेश कार्यालयात सत्कार करून मनःपूर्वक अभिनंदन केले.
दि. ६ मे २०२६ रोजी पार पडलेल्या भाजपा प्रदेश बैठकीदरम्यान ही भेट झाली. यावेळी बबनराव चौधरी यांनी दोन्ही विजयी उमेदवारांना पुष्पगुच्छ देत पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा छोटेखानी सत्कार समारंभ उत्साहात पार पडला.

यावेळी बोलताना बबनराव चौधरी म्हणाले की, विधान परिषद सभागृहात श्रीमती माधवीताई नाईक आणि श्री. सुनिलजी कर्जतकर हे आपल्या अभ्यासू वृत्ती, प्रभावी मांडणी आणि जनसामान्यांच्या प्रश्नांप्रती असलेल्या संवेदनशीलतेमुळे निश्चितच राज्यातील विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतील. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दोन्ही नेत्यांच्या बिनविरोध निवडीमुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून राज्यभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.






















