Homeताज्या बातम्याArvind Kejriwal : विरोधी पक्षाची भूमिका निभावणार नाही.; निवडणूक निकालावर केजरीवालांचे मोठे...

Arvind Kejriwal : विरोधी पक्षाची भूमिका निभावणार नाही.; निवडणूक निकालावर केजरीवालांचे मोठे वक्तव्य

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीचा अंतिम निकाल समोर येण्यास सुरुवात झाली आहे. या निकालामध्ये भाजपाने 27 वर्षांनंतर दिल्लीत कमळ फुलवले आहे. पण धक्कादायक बाब म्हणजे 2020 प्रमाणेच काँग्रेसला यंदाही भोपळा फोडता आलेला नाही.

 

तर दुसरीकडे आपचे दोन मोठे नेते म्हणजेच माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना पराभवाचा धक्का बसला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाची अंतिम आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही. मात्र भाजपाने या निवडणुकीत बहुमताचा आकडा पार करत एकहाती सत्ता मिळवली आहे. त्यामुळे आता अरविंद केजरीवाल यांनी पराभव मान्य करत या निवडणूक निकालावर भाष्य केले आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य करण्यासाठी अरविंद केजरीवाल यांनी त्यांचा एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. त्यात त्यांनी म्हटले की, आम्ही जनतेचा जनादेश मोठ्या नम्रतेने स्वीकारतो. या विजयाबद्दल मी भाजपाचे अभिनंदन करतो आणि आशा करतो की लोकांनी ज्या आश्वासनांसाठी त्यांना मतदान केले आहे, ते सर्व ते (भाजपा) पूर्ण करतील. परंतु गेल्या 10 वर्षांत आम्ही आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात खूप काम केले आहे. त्यामुळे आता आम्ही फक्त विरोधी पक्षाची भूमिका बजावणार नाही तर लोकांमध्येही राहून आणि त्यांची सेवा करत राहू, असे अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केले.
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील लोकांवर आपला विश्वास असल्याचे म्हणत विजय आपलाच असणार, असे निवडणूक निकालाआधी म्हटले होते. पण आज (8 फेब्रुवारी) हाती आलेल्या निकालानुसार, दिल्लीकरांनी तिसऱ्यांदा आपच्या हाती सत्ता देण्यास नकार दिला आहे. तर दुसरीकडे 27 वर्षांनंतर भाजपाला विजयी केले आहे. भाजपाने 36 हा बहुमताचा आकडा पार करत दिल्लीवर एकहाती सत्ता मिळवली आहे. महत्त्वाचे म्हणजे आपचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नवी दिल्ली विधानसभेतून निवडणूक लढवली होती. तर याच मतदारसंघातून भाजपाने परवेश वर्मा यांना तर काँग्रेसने संदीप दिक्षीत यांना उमेदवारी दिली होती. परंतु, भाजपाचे परवेश वर्मा हे या निवडणुकीत जायंट किलर ठरले असून त्यांनीच केजरीवालांवर झाडू फिरवला आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दौंडमध्ये तंबाखूजन्य पदार्थांविरोधात कारवाई मोठ्या पुरवठादारांवर कारवाईची मागणी जोरात

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड) : दौंड शहर आणि तालुक्यात अवैध गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची चर्चा पुन्हा एकदा समोर आली...

गेवराईचे पत्रकार विष्णू गायकवाड यांना ‘महाराष्ट्र नायक’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

0
बीड (प्रतिनिधी विशेष) : बीड जिल्ह्यासाठी आणि गेवराई तालुक्यासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. समाजातील विविध प्रश्नांवर आपल्या प्रभावी लेखणीतून आवाज उठवणारे ‘लोकमत’चे धडाडीचे पत्रकार...

चंद्रपूर मनपाच्या २०१४ GIS सर्व्हेवर पुन्हा संशय “साठगाठ घोटाळा”च्या आरोपांनी खळबळ

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर महानगरपालिकेने २०१४ मध्ये राबविलेल्या GIS आधारित मालमत्ता सर्व्हे प्रकल्पावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शहर विकास,...

जळगावात ‘कॉकरोच जनता पार्टी’ची सोशल मीडियावर धूम राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : जळगावातील राजकीय वातावरणात सध्या “कॉकरोच जनता पार्टी” या अनोख्या नावाची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. या नावाने तयार करण्यात...

बकरी ईद निमित्त बोकड वाहतुकीवरील कारवाई थांबवा – शाहरुख मुलाणी

0
मुंबई प्रतिनिधी :- बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर बोकड वाहतूक करणाऱ्या गरीब शेतकरी व ग्राहकांवर पोलीस आणि आरटीओ प्रशासनाकडून होत असलेल्या कारवाईविरोधात महाराष्ट्र राज्य मुल्ला...

दौंडमध्ये तंबाखूजन्य पदार्थांविरोधात कारवाई मोठ्या पुरवठादारांवर कारवाईची मागणी जोरात

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड) : दौंड शहर आणि तालुक्यात अवैध गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची चर्चा पुन्हा एकदा समोर आली...

गेवराईचे पत्रकार विष्णू गायकवाड यांना ‘महाराष्ट्र नायक’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

0
बीड (प्रतिनिधी विशेष) : बीड जिल्ह्यासाठी आणि गेवराई तालुक्यासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. समाजातील विविध प्रश्नांवर आपल्या प्रभावी लेखणीतून आवाज उठवणारे ‘लोकमत’चे धडाडीचे पत्रकार...

चंद्रपूर मनपाच्या २०१४ GIS सर्व्हेवर पुन्हा संशय “साठगाठ घोटाळा”च्या आरोपांनी खळबळ

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर महानगरपालिकेने २०१४ मध्ये राबविलेल्या GIS आधारित मालमत्ता सर्व्हे प्रकल्पावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शहर विकास,...

जळगावात ‘कॉकरोच जनता पार्टी’ची सोशल मीडियावर धूम राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : जळगावातील राजकीय वातावरणात सध्या “कॉकरोच जनता पार्टी” या अनोख्या नावाची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. या नावाने तयार करण्यात...

बकरी ईद निमित्त बोकड वाहतुकीवरील कारवाई थांबवा – शाहरुख मुलाणी

0
मुंबई प्रतिनिधी :- बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर बोकड वाहतूक करणाऱ्या गरीब शेतकरी व ग्राहकांवर पोलीस आणि आरटीओ प्रशासनाकडून होत असलेल्या कारवाईविरोधात महाराष्ट्र राज्य मुल्ला...
error: Content is protected !!