Homeताज्या बातम्याArvind Kejriwal : विरोधी पक्षाची भूमिका निभावणार नाही.; निवडणूक निकालावर केजरीवालांचे मोठे...

Arvind Kejriwal : विरोधी पक्षाची भूमिका निभावणार नाही.; निवडणूक निकालावर केजरीवालांचे मोठे वक्तव्य

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीचा अंतिम निकाल समोर येण्यास सुरुवात झाली आहे. या निकालामध्ये भाजपाने 27 वर्षांनंतर दिल्लीत कमळ फुलवले आहे. पण धक्कादायक बाब म्हणजे 2020 प्रमाणेच काँग्रेसला यंदाही भोपळा फोडता आलेला नाही.

 

तर दुसरीकडे आपचे दोन मोठे नेते म्हणजेच माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना पराभवाचा धक्का बसला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाची अंतिम आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही. मात्र भाजपाने या निवडणुकीत बहुमताचा आकडा पार करत एकहाती सत्ता मिळवली आहे. त्यामुळे आता अरविंद केजरीवाल यांनी पराभव मान्य करत या निवडणूक निकालावर भाष्य केले आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य करण्यासाठी अरविंद केजरीवाल यांनी त्यांचा एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. त्यात त्यांनी म्हटले की, आम्ही जनतेचा जनादेश मोठ्या नम्रतेने स्वीकारतो. या विजयाबद्दल मी भाजपाचे अभिनंदन करतो आणि आशा करतो की लोकांनी ज्या आश्वासनांसाठी त्यांना मतदान केले आहे, ते सर्व ते (भाजपा) पूर्ण करतील. परंतु गेल्या 10 वर्षांत आम्ही आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात खूप काम केले आहे. त्यामुळे आता आम्ही फक्त विरोधी पक्षाची भूमिका बजावणार नाही तर लोकांमध्येही राहून आणि त्यांची सेवा करत राहू, असे अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केले.
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील लोकांवर आपला विश्वास असल्याचे म्हणत विजय आपलाच असणार, असे निवडणूक निकालाआधी म्हटले होते. पण आज (8 फेब्रुवारी) हाती आलेल्या निकालानुसार, दिल्लीकरांनी तिसऱ्यांदा आपच्या हाती सत्ता देण्यास नकार दिला आहे. तर दुसरीकडे 27 वर्षांनंतर भाजपाला विजयी केले आहे. भाजपाने 36 हा बहुमताचा आकडा पार करत दिल्लीवर एकहाती सत्ता मिळवली आहे. महत्त्वाचे म्हणजे आपचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नवी दिल्ली विधानसभेतून निवडणूक लढवली होती. तर याच मतदारसंघातून भाजपाने परवेश वर्मा यांना तर काँग्रेसने संदीप दिक्षीत यांना उमेदवारी दिली होती. परंतु, भाजपाचे परवेश वर्मा हे या निवडणुकीत जायंट किलर ठरले असून त्यांनीच केजरीवालांवर झाडू फिरवला आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पारोळ्यात ACB ची धडक कारवाई! सहाय्यक अधीक्षक ३ हजारांच्या लाचेसह रंगेहाथ जेरबंद

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : नोकरीसंदर्भातील काम करून देण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या आरोग्य विभागातील सहाय्यक अधीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडल्याची...

गेवराई येथील बालग्राम अनाथालयातील विकासचा अनुष्कासोबत थाटात विवाह संपन्न

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : ज्या हातांना कधीकाळी केवळ आधाराची गरज होती, त्या हातांनी आज एका नव्या संसाराची स्वप्ने कवेत घेतली आहेत. गेवराई येथील...

संजय बाबुराव विसपुते यांची भाजपा विश्वकर्मा योजना सेल जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

0
जळगाव (प्रतिनिधी  विनोद पवार) : भारतीय जनता पार्टी, जळगाव महानगर जिल्हा यांच्या वतीने श्री. संजय बाबुराव विसपुते यांची विश्वकर्मा योजना सेल जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती...

ट्रकच्या धडकेत २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू मानराज पार्क चौफुली डेथ ट्रॅप

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, सोमवारी सकाळी मानराज पार्क चौफुलीवर झालेल्या भीषण अपघातात २५ वर्षीय तरुणाचा...

पॅरालिसिसग्रस्त बक्षू शेख यांच्या मदतीला हिमायत फाउंडेशन २५ हजारांची आर्थिक मदत

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : अत्यंत हलाखीची आर्थिक परिस्थिती आणि त्यातच पॅरालिसिस (पक्षाघात) या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या बक्षू शेख यांच्या मदतीसाठी ‘हिमायत फाउंडेशन’...

पारोळ्यात ACB ची धडक कारवाई! सहाय्यक अधीक्षक ३ हजारांच्या लाचेसह रंगेहाथ जेरबंद

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : नोकरीसंदर्भातील काम करून देण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या आरोग्य विभागातील सहाय्यक अधीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडल्याची...

गेवराई येथील बालग्राम अनाथालयातील विकासचा अनुष्कासोबत थाटात विवाह संपन्न

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : ज्या हातांना कधीकाळी केवळ आधाराची गरज होती, त्या हातांनी आज एका नव्या संसाराची स्वप्ने कवेत घेतली आहेत. गेवराई येथील...

संजय बाबुराव विसपुते यांची भाजपा विश्वकर्मा योजना सेल जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

0
जळगाव (प्रतिनिधी  विनोद पवार) : भारतीय जनता पार्टी, जळगाव महानगर जिल्हा यांच्या वतीने श्री. संजय बाबुराव विसपुते यांची विश्वकर्मा योजना सेल जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती...

ट्रकच्या धडकेत २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू मानराज पार्क चौफुली डेथ ट्रॅप

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, सोमवारी सकाळी मानराज पार्क चौफुलीवर झालेल्या भीषण अपघातात २५ वर्षीय तरुणाचा...

पॅरालिसिसग्रस्त बक्षू शेख यांच्या मदतीला हिमायत फाउंडेशन २५ हजारांची आर्थिक मदत

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : अत्यंत हलाखीची आर्थिक परिस्थिती आणि त्यातच पॅरालिसिस (पक्षाघात) या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या बक्षू शेख यांच्या मदतीसाठी ‘हिमायत फाउंडेशन’...
error: Content is protected !!