Homeताज्या बातम्याDelhi Elections :- दिल्ली पोलीस लोकांना मतदान करण्यापासून रोखत आहेत", सौरभ भारद्वाज...

Delhi Elections :- दिल्ली पोलीस लोकांना मतदान करण्यापासून रोखत आहेत”, सौरभ भारद्वाज यांचा आरोप

Delhi Elections 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान सुरू आहे. सकाळपासूनच मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. तसेच, कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. अशातच दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी पोलिसांवर आरोप केला आहे.

दिल्ली पोलीस चिराग दिल्लीतील मतदान केंद्रावर लोकांना मतदान करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत आहेत, असे सौरभ भारद्वाज यांनी म्हटले आहे.

प्रसार माध्यमांशी बोलताना दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज म्हणाले, “निवडणुकीवर परिणाम करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी जागोजागी बॅरिकेड्स लावले आहेत. बॅरिकेड्स का लावले आहेत? दिल्ली पोलिसांच्या कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यांना बॅरिकेड्स लावण्यास सांगितले आहे? हे सर्व गरिबांना त्रास देण्यासाठी केले जात आहे. जिथे जिथे आपचा बालेकिल्ला आहे, तिथे मालवीय नगरचे एसीपी आणि एसएचओ हे सर्व उघडपणे करत आहेत.”

याचबरोबर, “काल रात्री एसएचओने आमच्या खाजगी जागेवरही छापा टाकला. येथे २१,००० लोकांनी मतदान केले. चिराग दिल्लीतील सर्व १७-१८ मतदान केंद्रांवर पोलीस असे करत आहेत. लोक मतदान करण्यासाठी मेट्रोने किंवा रस्त्याने येऊ शकत नाहीत. वीरेंद्र सचदेवा किंवा राष्ट्रपती मुर्मू या मतदान केंद्रापासून २०० मीटर अंतरावर गाडीतून खाली उतरले का? कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे नाहीत”, असेही सौरभ भारद्वाज म्हणाले.

दरम्यान, सौरभ भारद्वाज यांनी केलेल्या आरोपांना डीसीपी अंकित चौहान यांनी उत्तर दिले आहे. डीसीपी म्हणाले, “वृद्ध आणि ज्यांना चालता येत नाही, त्यांना सूट दिली आहे. त्यांना त्यांच्या गाड्या आत आणण्याची परवानगी आहे. हा नियम सर्वत्र अंमलात आणला जात आहे. ते (सौरभ भारद्वाज) ज्या ठिकाणी सांगत आहेत, त्या ठिकाणांची आम्ही चौकशी करू.”

राजधानी दिल्लीत आज विधानसभेच्या ७० जागांसाठी मतदान होत आहे. सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे मतदान होणार आहे. तर या निवडणुकीचे निकाल ८ फेब्रुवारीला शनिवारी जाहीर केला जाणार आहे. मतदान किती होते त्यावर निकालाचे गणित अवलंबून आहे. राजधानीत एकूण एक कोटी ५६ लाख मतदार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चंद्रपूरला नवे नेतृत्व: आयुष नोेपानी यांची जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती

0
चंद्रपूर ( निलेश ठाकरे - महाराष्ट्र हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र) :  जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्था व्यवस्थेला नवे बळ मिळणार असून आयुष नोेपानी यांची जिल्हा...

जिल्ह्यात आजपासून जनगणना सुरू; चुकीची माहिती दिल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :  जळगाव जिल्ह्यात आजपासून जनगणना प्रक्रियेला अधिकृतपणे सुरुवात झाली असून, या महत्त्वाच्या उपक्रमासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. जिल्हाभरात सुमारे ७...

डॉ. दीपक फाटक यांच्या कर्तृत्वाने रुग्ण मृत्यूच्या दाढेतून सुखरूप.

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : तालुक्यातील अंबू नाईक तांड्या (खांडवी) येथील आदिवासी पारधी समाजातील रहिवासी श्री. भद्री भोसले (वय ४०) यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे...

गढी ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिन उत्साहात; ध्वजारोहणासह मान्यवरांची उपस्थिती

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : तालुक्यातील गढी ग्रामपंचायत कार्यालयात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात माजी सरपंच तथा ज्येष्ठ समाजसेवक डॉ....

सुशीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती जल्लोषात; सामाजिक ऐक्याचा संदेश

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : तालुक्यातील सुशी गावात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात...

चंद्रपूरला नवे नेतृत्व: आयुष नोेपानी यांची जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती

0
चंद्रपूर ( निलेश ठाकरे - महाराष्ट्र हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र) :  जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्था व्यवस्थेला नवे बळ मिळणार असून आयुष नोेपानी यांची जिल्हा...

जिल्ह्यात आजपासून जनगणना सुरू; चुकीची माहिती दिल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :  जळगाव जिल्ह्यात आजपासून जनगणना प्रक्रियेला अधिकृतपणे सुरुवात झाली असून, या महत्त्वाच्या उपक्रमासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. जिल्हाभरात सुमारे ७...

डॉ. दीपक फाटक यांच्या कर्तृत्वाने रुग्ण मृत्यूच्या दाढेतून सुखरूप.

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : तालुक्यातील अंबू नाईक तांड्या (खांडवी) येथील आदिवासी पारधी समाजातील रहिवासी श्री. भद्री भोसले (वय ४०) यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे...

गढी ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिन उत्साहात; ध्वजारोहणासह मान्यवरांची उपस्थिती

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : तालुक्यातील गढी ग्रामपंचायत कार्यालयात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात माजी सरपंच तथा ज्येष्ठ समाजसेवक डॉ....

सुशीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती जल्लोषात; सामाजिक ऐक्याचा संदेश

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : तालुक्यातील सुशी गावात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात...
error: Content is protected !!