Homeताज्या बातम्याDelhi Elections :- दिल्ली पोलीस लोकांना मतदान करण्यापासून रोखत आहेत", सौरभ भारद्वाज...

Delhi Elections :- दिल्ली पोलीस लोकांना मतदान करण्यापासून रोखत आहेत”, सौरभ भारद्वाज यांचा आरोप

Delhi Elections 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान सुरू आहे. सकाळपासूनच मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. तसेच, कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. अशातच दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी पोलिसांवर आरोप केला आहे.

दिल्ली पोलीस चिराग दिल्लीतील मतदान केंद्रावर लोकांना मतदान करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत आहेत, असे सौरभ भारद्वाज यांनी म्हटले आहे.

प्रसार माध्यमांशी बोलताना दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज म्हणाले, “निवडणुकीवर परिणाम करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी जागोजागी बॅरिकेड्स लावले आहेत. बॅरिकेड्स का लावले आहेत? दिल्ली पोलिसांच्या कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यांना बॅरिकेड्स लावण्यास सांगितले आहे? हे सर्व गरिबांना त्रास देण्यासाठी केले जात आहे. जिथे जिथे आपचा बालेकिल्ला आहे, तिथे मालवीय नगरचे एसीपी आणि एसएचओ हे सर्व उघडपणे करत आहेत.”

याचबरोबर, “काल रात्री एसएचओने आमच्या खाजगी जागेवरही छापा टाकला. येथे २१,००० लोकांनी मतदान केले. चिराग दिल्लीतील सर्व १७-१८ मतदान केंद्रांवर पोलीस असे करत आहेत. लोक मतदान करण्यासाठी मेट्रोने किंवा रस्त्याने येऊ शकत नाहीत. वीरेंद्र सचदेवा किंवा राष्ट्रपती मुर्मू या मतदान केंद्रापासून २०० मीटर अंतरावर गाडीतून खाली उतरले का? कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे नाहीत”, असेही सौरभ भारद्वाज म्हणाले.

दरम्यान, सौरभ भारद्वाज यांनी केलेल्या आरोपांना डीसीपी अंकित चौहान यांनी उत्तर दिले आहे. डीसीपी म्हणाले, “वृद्ध आणि ज्यांना चालता येत नाही, त्यांना सूट दिली आहे. त्यांना त्यांच्या गाड्या आत आणण्याची परवानगी आहे. हा नियम सर्वत्र अंमलात आणला जात आहे. ते (सौरभ भारद्वाज) ज्या ठिकाणी सांगत आहेत, त्या ठिकाणांची आम्ही चौकशी करू.”

राजधानी दिल्लीत आज विधानसभेच्या ७० जागांसाठी मतदान होत आहे. सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे मतदान होणार आहे. तर या निवडणुकीचे निकाल ८ फेब्रुवारीला शनिवारी जाहीर केला जाणार आहे. मतदान किती होते त्यावर निकालाचे गणित अवलंबून आहे. राजधानीत एकूण एक कोटी ५६ लाख मतदार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोणार तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध करून निवेदन देण्यात आले

0
बुलढाणा प्रतिनिधी अनिल वायाळ :  पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस सिलेंडरच्या वाढत्या दरावर नियंत्रण ठेवून व पुरेसा साठा उपलब्ध करुन द्या अन्यथा तीव्र आंदोलन...

लासलगावमध्ये शेतीच्या बांधावरून वाद महिलेला मारहाण, चौघांविरोधात गुन्हा

0
निफाड (प्रतिनिधी उत्तम जाधव) : शेतीच्या सामायिक बांधावरील लोखंडी अँगल वाकवल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका 30 वर्षीय महिलेला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची...

दौंडमध्ये तंबाखूजन्य पदार्थांविरोधात कारवाई मोठ्या पुरवठादारांवर कारवाईची मागणी जोरात

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड) : दौंड शहर आणि तालुक्यात अवैध गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची चर्चा पुन्हा एकदा समोर आली...

गेवराईचे पत्रकार विष्णू गायकवाड यांना ‘महाराष्ट्र नायक’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

0
बीड (प्रतिनिधी विशेष) : बीड जिल्ह्यासाठी आणि गेवराई तालुक्यासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. समाजातील विविध प्रश्नांवर आपल्या प्रभावी लेखणीतून आवाज उठवणारे ‘लोकमत’चे धडाडीचे पत्रकार...

चंद्रपूर मनपाच्या २०१४ GIS सर्व्हेवर पुन्हा संशय “साठगाठ घोटाळा”च्या आरोपांनी खळबळ

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर महानगरपालिकेने २०१४ मध्ये राबविलेल्या GIS आधारित मालमत्ता सर्व्हे प्रकल्पावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शहर विकास,...

लोणार तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध करून निवेदन देण्यात आले

0
बुलढाणा प्रतिनिधी अनिल वायाळ :  पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस सिलेंडरच्या वाढत्या दरावर नियंत्रण ठेवून व पुरेसा साठा उपलब्ध करुन द्या अन्यथा तीव्र आंदोलन...

लासलगावमध्ये शेतीच्या बांधावरून वाद महिलेला मारहाण, चौघांविरोधात गुन्हा

0
निफाड (प्रतिनिधी उत्तम जाधव) : शेतीच्या सामायिक बांधावरील लोखंडी अँगल वाकवल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका 30 वर्षीय महिलेला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची...

दौंडमध्ये तंबाखूजन्य पदार्थांविरोधात कारवाई मोठ्या पुरवठादारांवर कारवाईची मागणी जोरात

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड) : दौंड शहर आणि तालुक्यात अवैध गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची चर्चा पुन्हा एकदा समोर आली...

गेवराईचे पत्रकार विष्णू गायकवाड यांना ‘महाराष्ट्र नायक’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

0
बीड (प्रतिनिधी विशेष) : बीड जिल्ह्यासाठी आणि गेवराई तालुक्यासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. समाजातील विविध प्रश्नांवर आपल्या प्रभावी लेखणीतून आवाज उठवणारे ‘लोकमत’चे धडाडीचे पत्रकार...

चंद्रपूर मनपाच्या २०१४ GIS सर्व्हेवर पुन्हा संशय “साठगाठ घोटाळा”च्या आरोपांनी खळबळ

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर महानगरपालिकेने २०१४ मध्ये राबविलेल्या GIS आधारित मालमत्ता सर्व्हे प्रकल्पावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शहर विकास,...
error: Content is protected !!