Homeताज्या बातम्यासलीम सारंग यांच्या मागणीची अजित पवारांकडून दखल; संग्राम जगताप यांच्या विधानावर स्पष्टीकरणाची...

सलीम सारंग यांच्या मागणीची अजित पवारांकडून दखल; संग्राम जगताप यांच्या विधानावर स्पष्टीकरणाची मागणी…

मुस्लिम समाजाकडून सलीम सारंग यांना भरघोस पाठिंबा!
संग्राम जगतापांना अजित पवारांनी फटकारलं?

मुंबई (संपादक मुज्जम्मील शेख): राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम सारंग यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या मुस्लिम विरोधी विधानाचा तीव्र निषेध करत पक्षाकडे कारवाईची मागणी केली होती. त्यांच्या या ठाम भूमिकेची अखेर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी दखल घेतली असून, त्यांनी संग्राम जगताप यांच्याकडून स्पष्टीकरण मागणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस ही शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारी धर्मनिरपेक्ष पार्टी आहे. कोणत्याही धर्माविरोधात बोलणे पक्षाच्या तत्त्वधारेच्या विरोधात आहे. संग्राम जगताप यांनी नेमकं काय आणि का बोललं, हे मी त्यांच्याकडून विचारणार आहे.”

या वक्तव्यानंतर सलीम सारंग यांच्या मागणीची दखल पक्षश्रेष्ठींनी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या या निर्णायक भूमिकेमुळे मुस्लिम समाजातील अनेक नागरिकांनी सलीम सारंग यांना शुभेच्छा दिल्या असून, त्यांच्या नेतृत्वगुणांची प्रशंसा केली आहे. सामाजिक आणि धार्मिक संघटनांनी सलीम सारंग यांचे कौतुक केले असून, त्यांना समाजाच्या न्यायासाठी उभा राहणारा खरा नेता म्हणून गौरवले आहे. सोशल मीडियावरही त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. त्यांच्या या ठाम आणि निर्भीड भूमिकेमुळे त्यांची राजकीय प्रतिमा अधिक बळकट झाल्याचे पाहायला मिळत आहे.

या संपूर्ण प्रकरणामुळे पक्षामध्ये निर्माण झालेला अंतर्गत मतभेदाचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला असून, आता संग्राम जगताप यांच्यावर पक्ष कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र एक गोष्ट नक्की — सलीम सारंग यांनी आपल्या पक्षाच्या मूलभूत मूल्यांसाठी आवाज उठवून एक सकारात्मक उदाहरण समोर ठेवले आहे.

कोण आहेत सलीम सारंग?
“सलीम सारंग हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष असून, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे संचालक म्हणूनही ते कार्यरत आहेत. मुस्लिम वेल्फेअर असोसिएशन या राष्ट्रीय पातळीवर कार्य करणाऱ्या संस्थेचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. मुस्लिम समाजाच्या हक्कांसाठी त्यांनी सातत्याने काम केले असून त्यांचा समर्थक वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आणि समाजप्रबोधनासाठी त्यांनी देशभर व राज्यभर व्यापक दौरे केले आहेत.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महात्मा फुले जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा जागर; शिक्षण, समता आणि सत्यशोधक विचारांना अभिवादन

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्ह्यासह राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले....

जळगाव पोलीस दलात बदलाची नवी सुरुवात; संदीप गावित यांच्यावर अपर पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :  राज्य पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय फेरबदल करण्यात आले असून जळगाव जिल्ह्याच्या अपर पोलीस अधीक्षक पदावर संदीप रघुनाथ गावित...

परभणीत शेती मशागतीला वेग; बैलांची जागा घेत ट्रॅक्टरचा वाढता वापर

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) : खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने जिल्ह्यात शेती मशागतीच्या कामांना मोठा वेग आला आहे. पारंपरिक बैलजोडीवर आधारित शेती...

शिरपूरमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या; मंत्री अशोक ऊईके यांना निवेदन

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) : आदिवासी विद्यार्थी व समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, या मागणीसाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने...

अकोला राजंदा येथून १५ वर्षीय बालिका बेपत्ता; बार्शीटाकळी परिसरात चिंतेचे सावट

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव): अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील राजंदा गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या १५ वर्षांची अल्पवयीन मुलगी आपल्या राहत्या घरातून...

महात्मा फुले जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा जागर; शिक्षण, समता आणि सत्यशोधक विचारांना अभिवादन

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्ह्यासह राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले....

जळगाव पोलीस दलात बदलाची नवी सुरुवात; संदीप गावित यांच्यावर अपर पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :  राज्य पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय फेरबदल करण्यात आले असून जळगाव जिल्ह्याच्या अपर पोलीस अधीक्षक पदावर संदीप रघुनाथ गावित...

परभणीत शेती मशागतीला वेग; बैलांची जागा घेत ट्रॅक्टरचा वाढता वापर

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) : खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने जिल्ह्यात शेती मशागतीच्या कामांना मोठा वेग आला आहे. पारंपरिक बैलजोडीवर आधारित शेती...

शिरपूरमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या; मंत्री अशोक ऊईके यांना निवेदन

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) : आदिवासी विद्यार्थी व समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, या मागणीसाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने...

अकोला राजंदा येथून १५ वर्षीय बालिका बेपत्ता; बार्शीटाकळी परिसरात चिंतेचे सावट

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव): अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील राजंदा गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या १५ वर्षांची अल्पवयीन मुलगी आपल्या राहत्या घरातून...
error: Content is protected !!