Homeताज्या बातम्यासलीम सारंग यांच्या मागणीची अजित पवारांकडून दखल; संग्राम जगताप यांच्या विधानावर स्पष्टीकरणाची...

सलीम सारंग यांच्या मागणीची अजित पवारांकडून दखल; संग्राम जगताप यांच्या विधानावर स्पष्टीकरणाची मागणी…

मुस्लिम समाजाकडून सलीम सारंग यांना भरघोस पाठिंबा!
संग्राम जगतापांना अजित पवारांनी फटकारलं?

मुंबई (संपादक मुज्जम्मील शेख): राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम सारंग यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या मुस्लिम विरोधी विधानाचा तीव्र निषेध करत पक्षाकडे कारवाईची मागणी केली होती. त्यांच्या या ठाम भूमिकेची अखेर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी दखल घेतली असून, त्यांनी संग्राम जगताप यांच्याकडून स्पष्टीकरण मागणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस ही शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारी धर्मनिरपेक्ष पार्टी आहे. कोणत्याही धर्माविरोधात बोलणे पक्षाच्या तत्त्वधारेच्या विरोधात आहे. संग्राम जगताप यांनी नेमकं काय आणि का बोललं, हे मी त्यांच्याकडून विचारणार आहे.”

या वक्तव्यानंतर सलीम सारंग यांच्या मागणीची दखल पक्षश्रेष्ठींनी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या या निर्णायक भूमिकेमुळे मुस्लिम समाजातील अनेक नागरिकांनी सलीम सारंग यांना शुभेच्छा दिल्या असून, त्यांच्या नेतृत्वगुणांची प्रशंसा केली आहे. सामाजिक आणि धार्मिक संघटनांनी सलीम सारंग यांचे कौतुक केले असून, त्यांना समाजाच्या न्यायासाठी उभा राहणारा खरा नेता म्हणून गौरवले आहे. सोशल मीडियावरही त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. त्यांच्या या ठाम आणि निर्भीड भूमिकेमुळे त्यांची राजकीय प्रतिमा अधिक बळकट झाल्याचे पाहायला मिळत आहे.

या संपूर्ण प्रकरणामुळे पक्षामध्ये निर्माण झालेला अंतर्गत मतभेदाचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला असून, आता संग्राम जगताप यांच्यावर पक्ष कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र एक गोष्ट नक्की — सलीम सारंग यांनी आपल्या पक्षाच्या मूलभूत मूल्यांसाठी आवाज उठवून एक सकारात्मक उदाहरण समोर ठेवले आहे.

कोण आहेत सलीम सारंग?
“सलीम सारंग हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष असून, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे संचालक म्हणूनही ते कार्यरत आहेत. मुस्लिम वेल्फेअर असोसिएशन या राष्ट्रीय पातळीवर कार्य करणाऱ्या संस्थेचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. मुस्लिम समाजाच्या हक्कांसाठी त्यांनी सातत्याने काम केले असून त्यांचा समर्थक वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आणि समाजप्रबोधनासाठी त्यांनी देशभर व राज्यभर व्यापक दौरे केले आहेत.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिवाजी खंडू कांडेकर यांचे अल्पशा आजाराने निधन

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  गेवराई तालुक्यातील गेवराई येथील भूमिपुत्र तथा संभाजीनगर येथे वास्तव्यास असणारे शिवाजी कांडेकर वय वर्ष 58 यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन...

कंत्राटदाराला नोटीस बजावा, टोल बंद करा!’; उड्डाणपुलाच्या दुरवस्थेवर अविनाश राऊतांचा प्रशासनाला इशारा.

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)  ब्रम्हपुरी ते नागभीड या राज्य मार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या संथ कारभारामुळे आणि संबंधित कंत्राटदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना व नागरिकांना नाहक...

मतदार जागा झाला तरच देश बदलेल! — भेसळयुक्त राजकारणाला जनतेनेच थांबवण्याची वेळ आली आहे.

0
nilesh thakre महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज लोकशाहीमध्ये सर्वात मोठी ताकद कोणाची असेल, तर ती कोणत्याही नेत्याची, पक्षाची किंवा सत्तेची नसते; ती असते मतदाराची....

डॉक्टरांना शनिवार-रविवार सुट्टी देऊन रुग्णांना मरणाच्या दारात सोडणारे शासनाचे धोरण कशासाठी? ब्रह्मपुरीत नागरिकांचा संताप

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख) कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सण-उत्सव, शनिवार किंवा रविवार असो कोणताही विचार न करता २४ तास ऑन ड्युटी तैनात असते....

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) वर्धापन दिन व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांचा...

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड, मयुर साळवे) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाचा 36 वा वर्धापन दिन तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन नायक दीपक भाऊ निकाळजे...

शिवाजी खंडू कांडेकर यांचे अल्पशा आजाराने निधन

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  गेवराई तालुक्यातील गेवराई येथील भूमिपुत्र तथा संभाजीनगर येथे वास्तव्यास असणारे शिवाजी कांडेकर वय वर्ष 58 यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन...

कंत्राटदाराला नोटीस बजावा, टोल बंद करा!’; उड्डाणपुलाच्या दुरवस्थेवर अविनाश राऊतांचा प्रशासनाला इशारा.

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)  ब्रम्हपुरी ते नागभीड या राज्य मार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या संथ कारभारामुळे आणि संबंधित कंत्राटदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना व नागरिकांना नाहक...

मतदार जागा झाला तरच देश बदलेल! — भेसळयुक्त राजकारणाला जनतेनेच थांबवण्याची वेळ आली आहे.

0
nilesh thakre महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज लोकशाहीमध्ये सर्वात मोठी ताकद कोणाची असेल, तर ती कोणत्याही नेत्याची, पक्षाची किंवा सत्तेची नसते; ती असते मतदाराची....

डॉक्टरांना शनिवार-रविवार सुट्टी देऊन रुग्णांना मरणाच्या दारात सोडणारे शासनाचे धोरण कशासाठी? ब्रह्मपुरीत नागरिकांचा संताप

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख) कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सण-उत्सव, शनिवार किंवा रविवार असो कोणताही विचार न करता २४ तास ऑन ड्युटी तैनात असते....

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) वर्धापन दिन व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांचा...

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड, मयुर साळवे) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाचा 36 वा वर्धापन दिन तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन नायक दीपक भाऊ निकाळजे...
error: Content is protected !!