Homeताज्या बातम्यासलीम सारंग यांच्या मागणीची अजित पवारांकडून दखल; संग्राम जगताप यांच्या विधानावर स्पष्टीकरणाची...

सलीम सारंग यांच्या मागणीची अजित पवारांकडून दखल; संग्राम जगताप यांच्या विधानावर स्पष्टीकरणाची मागणी…

मुस्लिम समाजाकडून सलीम सारंग यांना भरघोस पाठिंबा!
संग्राम जगतापांना अजित पवारांनी फटकारलं?

मुंबई (संपादक मुज्जम्मील शेख): राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम सारंग यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या मुस्लिम विरोधी विधानाचा तीव्र निषेध करत पक्षाकडे कारवाईची मागणी केली होती. त्यांच्या या ठाम भूमिकेची अखेर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी दखल घेतली असून, त्यांनी संग्राम जगताप यांच्याकडून स्पष्टीकरण मागणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस ही शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारी धर्मनिरपेक्ष पार्टी आहे. कोणत्याही धर्माविरोधात बोलणे पक्षाच्या तत्त्वधारेच्या विरोधात आहे. संग्राम जगताप यांनी नेमकं काय आणि का बोललं, हे मी त्यांच्याकडून विचारणार आहे.”

या वक्तव्यानंतर सलीम सारंग यांच्या मागणीची दखल पक्षश्रेष्ठींनी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या या निर्णायक भूमिकेमुळे मुस्लिम समाजातील अनेक नागरिकांनी सलीम सारंग यांना शुभेच्छा दिल्या असून, त्यांच्या नेतृत्वगुणांची प्रशंसा केली आहे. सामाजिक आणि धार्मिक संघटनांनी सलीम सारंग यांचे कौतुक केले असून, त्यांना समाजाच्या न्यायासाठी उभा राहणारा खरा नेता म्हणून गौरवले आहे. सोशल मीडियावरही त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. त्यांच्या या ठाम आणि निर्भीड भूमिकेमुळे त्यांची राजकीय प्रतिमा अधिक बळकट झाल्याचे पाहायला मिळत आहे.

या संपूर्ण प्रकरणामुळे पक्षामध्ये निर्माण झालेला अंतर्गत मतभेदाचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला असून, आता संग्राम जगताप यांच्यावर पक्ष कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र एक गोष्ट नक्की — सलीम सारंग यांनी आपल्या पक्षाच्या मूलभूत मूल्यांसाठी आवाज उठवून एक सकारात्मक उदाहरण समोर ठेवले आहे.

कोण आहेत सलीम सारंग?
“सलीम सारंग हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष असून, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे संचालक म्हणूनही ते कार्यरत आहेत. मुस्लिम वेल्फेअर असोसिएशन या राष्ट्रीय पातळीवर कार्य करणाऱ्या संस्थेचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. मुस्लिम समाजाच्या हक्कांसाठी त्यांनी सातत्याने काम केले असून त्यांचा समर्थक वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आणि समाजप्रबोधनासाठी त्यांनी देशभर व राज्यभर व्यापक दौरे केले आहेत.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बकरी ईद निमित्त बोकड वाहतुकीवरील कारवाई थांबवा – शाहरुख मुलाणी

0
मुंबई प्रतिनिधी :- बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर बोकड वाहतूक करणाऱ्या गरीब शेतकरी व ग्राहकांवर पोलीस आणि आरटीओ प्रशासनाकडून होत असलेल्या कारवाईविरोधात महाराष्ट्र राज्य मुल्ला...

राज्यातील शिक्षकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ; शासनाकडून ABHA कार्ड बंधनकारक

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाने राज्यातील १०० टक्के अनुदानित खासगी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य...

ज्येष्ठ पत्रकार कबीर शेख यांचे निधन; पत्रकारिता क्षेत्रात शोककळा

0
तालुका( प्रतिनिधि जाबिर खान) : शहरातील वॉर्ड क्रमांक १४ येथील ज्येष्ठ पत्रकार तथा माजी पत्रकार श्री. कबीर शेख यांचे आज सायंकाळी ४ वाजता दुःखद...

वार्तांकनासाठी धावणाऱ्या पत्रकारांना इंधनाची गरज पत्रकारांसाठी राखीव कोट्यातून इंधन द्या; व्हाईस ऑफ मीडियाची तहसीलदारांकडे...

0
देऊळगावराजा (प्रतिनिधी साठी बबनराव नागरे) : तालुक्यात सध्या डिझेल व पेट्रोलची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने सर्वसामान्य नागरिकांसह पत्रकारांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे....

ब्रह्मपुरी पोलिसांची मोठी कारवाई कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २० गोवंशाची सुटका

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : गांगलवाडी-एकारा मार्गावरून सुरू असलेल्या गोवंशाच्या अवैध तस्करीवर ब्रह्मपुरी पोलिसांनी धडक कारवाई करत मोठा सापळा रचला. या कारवाईत दोन पिकअप...

बकरी ईद निमित्त बोकड वाहतुकीवरील कारवाई थांबवा – शाहरुख मुलाणी

0
मुंबई प्रतिनिधी :- बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर बोकड वाहतूक करणाऱ्या गरीब शेतकरी व ग्राहकांवर पोलीस आणि आरटीओ प्रशासनाकडून होत असलेल्या कारवाईविरोधात महाराष्ट्र राज्य मुल्ला...

राज्यातील शिक्षकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ; शासनाकडून ABHA कार्ड बंधनकारक

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाने राज्यातील १०० टक्के अनुदानित खासगी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य...

ज्येष्ठ पत्रकार कबीर शेख यांचे निधन; पत्रकारिता क्षेत्रात शोककळा

0
तालुका( प्रतिनिधि जाबिर खान) : शहरातील वॉर्ड क्रमांक १४ येथील ज्येष्ठ पत्रकार तथा माजी पत्रकार श्री. कबीर शेख यांचे आज सायंकाळी ४ वाजता दुःखद...

वार्तांकनासाठी धावणाऱ्या पत्रकारांना इंधनाची गरज पत्रकारांसाठी राखीव कोट्यातून इंधन द्या; व्हाईस ऑफ मीडियाची तहसीलदारांकडे...

0
देऊळगावराजा (प्रतिनिधी साठी बबनराव नागरे) : तालुक्यात सध्या डिझेल व पेट्रोलची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने सर्वसामान्य नागरिकांसह पत्रकारांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे....

ब्रह्मपुरी पोलिसांची मोठी कारवाई कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २० गोवंशाची सुटका

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : गांगलवाडी-एकारा मार्गावरून सुरू असलेल्या गोवंशाच्या अवैध तस्करीवर ब्रह्मपुरी पोलिसांनी धडक कारवाई करत मोठा सापळा रचला. या कारवाईत दोन पिकअप...
error: Content is protected !!