Times of Maharashtra Desk, Pune : दरवर्षी कार्तिकी यात्रेसाठी आळंदी आणि देहू परिसरात भाविकांची मोठी गर्दी होते. यावर्षी देखील कार्तिकी यात्रा आणि संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या 750 व्या संजीवनी समाधी निमित्ताने आळंदी आणि देहू येथे भक्त येण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड वाहतूक विभागाने वाहतुकीत काही बदल केले आहेत.
कार्तिकी यात्रे दरम्यान भाविक मोठ्या संख्येने आळंदी हून देहू येथे जगतगुरु तुकाराम महाराज मंदिर , गाथा मंदिर , भंडारा डोंगर येथे दर्शनासाठी जातात. दर वर्षी 10 ते 15 लाखाहून अधिक भाविक आळंदी, देहू परिसरात दर्शनासाठी येत असल्याने वाहतूक कोंडी होण्याचे प्रश्न निर्माण होतात. या अनुषंगाने यावर्षी पिंपरी – चिंचवड पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेत काही बद्दल केले आहेत. हे बद्दल 12 ते 20 नोव्हेंबर पर्यंत लागू राहणार आहेत .
नक्की बदल कोणते?
या 10 दिवसात तळवडे , मोशी , चाकण , दिघी तळेगाव या आळंदी कडून देहू कडे येणाऱ्या मार्गावर जड, अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. या वेळी वाहनचालकांनी जय गणेश साम्राज्य चौक अलंकापुरम चौक-विश्रांतवाडी भोसरी अशा पर्यायी मार्गांचा वापर करावा; तसेच देहू कमान, कॅनबे चौक, देहूफाटा, माजगाव फाटा, भोसे फाटा, मरकळ आदी मार्गावरून जड वाहनाना बंदी असेल. तसेच आळंदी शहरात या वाहानांना पूर्णपणे बंदी घातली जाणार आहे. पुणे आळंदी, मोशी-आळंदी, चिंबळी आळंदी, चाकण-आळंदी, वडगाव घेणंद-आळंदी व मरकळ-आळंदी हे मुख्य रस्ते बंद राहणार आहेत.
आळंदी व देहू येथे भाविकांसाठी पार्किंग व्यवस्था
– तळेकर पाटील चौकाजवळ (दक्षिण व उत्तर बाजू)
-आदित्य इंटरनॅशनल स्कूल, डुडुळगाव
– ज्ञानविलास कॉलेज परिसर
-मुंगसे पार्किंग, बोपदेव चौक
-इंद्रायणी हॉस्पिटलसमोर
-विश्रांतवाडी-वडगाव रोड
-मुक्ताई मंगल कार्यालयाजवळ
-आळंदी नगर परिषद शौचालयाजवळील पार्किंग
हे सर्व बदल वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून करण्यात आले असून नागरिकांनी आणि भाविकांनी सहकार्य करावे असे आवाहन पिंपरी- चिंचवड वाहतूक शाखेचे पोलिस आयुक्त विवेक पाटील यांनी केले आहे.






















