वाळूज महानगरछ(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वाळूज ग्रामपंचायत कार्यालयात शनिवारी अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या सामाजिक, साहित्यिक व संयुक्त महाराष्ट्र चळवळीत दिलेल्या ऐतिहासिक योगदानाला अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामविकास अधिकारी उत्तम भोंडवे उपस्थित होते. यावेळी माजी सरपंच तथा प्रशासक सौ. सईदा भाभी पठाण, काकासाहेब चापे, सचिन काकडे, वरिष्ठ लिपिक ताजू मुल्ला पठाण, तसेच बिडकीन पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी नाडे साहेब यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य, समाजातील वंचित घटकांसाठी केलेले कार्य, सामाजिक समतेचा संदेश आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत दिलेले योगदान यावर प्रकाश टाकला. त्यांच्या विचारांचा वारसा जपणे आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे ही काळाची गरज असल्याचे मतही मान्यवरांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे वातावरण अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी होते. उपस्थितांनी अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचे स्मरण करून सामाजिक ऐक्य, समता आणि बंधुभावाचा संदेश समाजात रुजविण्याचा संकल्प केला






















