Homeताज्या बातम्यानवी दिल्ली मतदारसंघात स्वतंत्र निरीक्षक नियुक्त करा'' केजरीवालांचं निवडणूक आयोगाला पत्र

नवी दिल्ली मतदारसंघात स्वतंत्र निरीक्षक नियुक्त करा” केजरीवालांचं निवडणूक आयोगाला पत्र

 

दिल्ली : विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असताना राज्यातील वातावरण कमालीचं तापलं आहे. त्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाचे प्रमुख आमि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर हल्ले केले जात आहेत. त्यांना त्रास दिला जात आहे, असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. तसेच नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघामध्ये स्वतंत्र निवडणूक निरीक्षकाची नियुक्ती करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
अरविंद केजरीवाल यांनी नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर हल्ले होत असल्याचा आरोप करत मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. या पत्रामधून त्यांनी दिल्ली विधानसभा मतदारसंघात स्वतंत्र निवडणूक निरीक्षक नियुक्त करण्यात यावेत आणि निवडणूक आयोगाने आपच्या स्वयंसेवकांच्या सुरक्षेबाबत तरतूद करावी, अशी मागणी अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, आपच्या कार्यकर्त्यांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांसाठी जबाबदार असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना त्वरित निलंबित करण्यात यावे आणि असे हल्ले करणाऱ्या भाजपाच्या कार्यकर्त्यांवर त्वरित अटकेची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अरविंद केजरीवाल यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
शनिवारी आम आदमी पक्षाचे रिठाला विधानसभा मतदारसंघातील आमदार महेंद्र गोयल यांच्यावर प्रचारसभेदरम्यान हल्ला झाल्याचं वृत्त आलं होतं. या हल्ल्यात गोयल हे बेशुद्ध झाले होते. या हल्ल्यानंतर पोलिसांना शनिवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास पीसीआर कॉलवरून माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचलं आणि प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. मात्र त्यांच्यावर हल्ला का करण्यात आला आणि तो कुणी केला, याबाबत अधिक माहिती समोर येऊ शकलेली नाही. सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोणार तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध करून निवेदन देण्यात आले

0
बुलढाणा प्रतिनिधी अनिल वायाळ :  पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस सिलेंडरच्या वाढत्या दरावर नियंत्रण ठेवून व पुरेसा साठा उपलब्ध करुन द्या अन्यथा तीव्र आंदोलन...

लासलगावमध्ये शेतीच्या बांधावरून वाद महिलेला मारहाण, चौघांविरोधात गुन्हा

0
निफाड (प्रतिनिधी उत्तम जाधव) : शेतीच्या सामायिक बांधावरील लोखंडी अँगल वाकवल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका 30 वर्षीय महिलेला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची...

दौंडमध्ये तंबाखूजन्य पदार्थांविरोधात कारवाई मोठ्या पुरवठादारांवर कारवाईची मागणी जोरात

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड) : दौंड शहर आणि तालुक्यात अवैध गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची चर्चा पुन्हा एकदा समोर आली...

गेवराईचे पत्रकार विष्णू गायकवाड यांना ‘महाराष्ट्र नायक’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

0
बीड (प्रतिनिधी विशेष) : बीड जिल्ह्यासाठी आणि गेवराई तालुक्यासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. समाजातील विविध प्रश्नांवर आपल्या प्रभावी लेखणीतून आवाज उठवणारे ‘लोकमत’चे धडाडीचे पत्रकार...

चंद्रपूर मनपाच्या २०१४ GIS सर्व्हेवर पुन्हा संशय “साठगाठ घोटाळा”च्या आरोपांनी खळबळ

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर महानगरपालिकेने २०१४ मध्ये राबविलेल्या GIS आधारित मालमत्ता सर्व्हे प्रकल्पावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शहर विकास,...

लोणार तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध करून निवेदन देण्यात आले

0
बुलढाणा प्रतिनिधी अनिल वायाळ :  पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस सिलेंडरच्या वाढत्या दरावर नियंत्रण ठेवून व पुरेसा साठा उपलब्ध करुन द्या अन्यथा तीव्र आंदोलन...

लासलगावमध्ये शेतीच्या बांधावरून वाद महिलेला मारहाण, चौघांविरोधात गुन्हा

0
निफाड (प्रतिनिधी उत्तम जाधव) : शेतीच्या सामायिक बांधावरील लोखंडी अँगल वाकवल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका 30 वर्षीय महिलेला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची...

दौंडमध्ये तंबाखूजन्य पदार्थांविरोधात कारवाई मोठ्या पुरवठादारांवर कारवाईची मागणी जोरात

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड) : दौंड शहर आणि तालुक्यात अवैध गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची चर्चा पुन्हा एकदा समोर आली...

गेवराईचे पत्रकार विष्णू गायकवाड यांना ‘महाराष्ट्र नायक’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

0
बीड (प्रतिनिधी विशेष) : बीड जिल्ह्यासाठी आणि गेवराई तालुक्यासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. समाजातील विविध प्रश्नांवर आपल्या प्रभावी लेखणीतून आवाज उठवणारे ‘लोकमत’चे धडाडीचे पत्रकार...

चंद्रपूर मनपाच्या २०१४ GIS सर्व्हेवर पुन्हा संशय “साठगाठ घोटाळा”च्या आरोपांनी खळबळ

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर महानगरपालिकेने २०१४ मध्ये राबविलेल्या GIS आधारित मालमत्ता सर्व्हे प्रकल्पावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शहर विकास,...
error: Content is protected !!