Homeताज्या बातम्याअपघातात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब आठवले यांचे निधन

अपघातात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब आठवले यांचे निधन

गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  तालुक्यातील तलवाडा येथील माजी पंचायत समिती सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब आठवले (वय ५०) यांचे गुरुवारी (दि. २ मे) झालेल्या भीषण अपघातात निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बाबासाहेब आठवले हे गेवराईहून तलवाड्याकडे दुचाकीवरून जात असताना दैठण फाटा, सुतगिरणी परिसरात समोरून येणाऱ्या टाटा पिकअपने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

बाबासाहेब आठवले यांचा तलवाडा परिसरासह संपूर्ण जिल्ह्यात दांडगा जनसंपर्क होता. त्यांनी पंचायत समिती सदस्य म्हणून काम करताना विविध विकासकामांमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत होते.

त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार अमरसिंह पंडित तसेच गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयसिंह पंडित यांनी तीव्र दुःख व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली. “बाबासाहेब आठवले यांच्या निधनाने तलवाडा परिसरात पक्षाची मोठी हानी झाली आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

देऊळगाव राजात नागरिकांच्या समस्या निवारणासाठी विशेष सभा; मूलभूत सुविधांवर भर

0
देऊळगाव राजा (प्रतिनिधी बबनराव नागरे) : शहरातील वार्ड क्रमांक ५ व २ मधील नागरिकांच्या विविध समस्यांच्या निवारणासाठी भगवान बाबा नगर मंदिर येथे विशेष सभा...

उत्कृष्ट सेवेला सलाम! जळगावच्या २८ पोलीस कर्मचाऱ्यांचा राज्यस्तरीय गौरव

0
जळगाव  (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्र पोलीस दलात उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिला जाणारा मानाचा ‘पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह’ (DG Insignia)...

बुद्धाचे दैवतीकरण थांबवा; खरा इतिहास समजून घ्या – गोपाल भिसडे

0
वाशिम - (प्रतिनिधी सारनाथ अवचार) : बुद्ध हा इतिहासातील पहिला मानवतावादी विचारवंत. त्यानी स्वतःला कधीही ईश्वर, अवतार किंवा चमत्कार करणारा सिद्ध पुरुष म्हटले नाही....

धुळदेवच्या सोनालीची प्रेरणादायी झेप! गरीबीवर मात करून सोनाली आता देशसेवेसाठी सज्ज!

0
म्हसवड-माण (प्रतिनिधी महेश कांबळे) :   तालुक्यातील धुळदेव गावातील एका सामान्य कुटुंबातील मुलीने आपल्या जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस दलात भरती होऊन इतिहास घडवला...

आपदा मित्रांचे धाडस; उमरोळी अपघातात जखमीचा जीव वाचवला

0
पालघर (प्रतिनिधी निलेश गावंडे) :  पालघर जिल्ह्यातील उमरोळी येथे २९ एप्रिल २०२६ रोजी घडलेल्या भीषण अपघातात आपदा मित्र आणि आपदा सखी यांच्या तत्परतेमुळे एका जखमी...

देऊळगाव राजात नागरिकांच्या समस्या निवारणासाठी विशेष सभा; मूलभूत सुविधांवर भर

0
देऊळगाव राजा (प्रतिनिधी बबनराव नागरे) : शहरातील वार्ड क्रमांक ५ व २ मधील नागरिकांच्या विविध समस्यांच्या निवारणासाठी भगवान बाबा नगर मंदिर येथे विशेष सभा...

उत्कृष्ट सेवेला सलाम! जळगावच्या २८ पोलीस कर्मचाऱ्यांचा राज्यस्तरीय गौरव

0
जळगाव  (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्र पोलीस दलात उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिला जाणारा मानाचा ‘पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह’ (DG Insignia)...

बुद्धाचे दैवतीकरण थांबवा; खरा इतिहास समजून घ्या – गोपाल भिसडे

0
वाशिम - (प्रतिनिधी सारनाथ अवचार) : बुद्ध हा इतिहासातील पहिला मानवतावादी विचारवंत. त्यानी स्वतःला कधीही ईश्वर, अवतार किंवा चमत्कार करणारा सिद्ध पुरुष म्हटले नाही....

धुळदेवच्या सोनालीची प्रेरणादायी झेप! गरीबीवर मात करून सोनाली आता देशसेवेसाठी सज्ज!

0
म्हसवड-माण (प्रतिनिधी महेश कांबळे) :   तालुक्यातील धुळदेव गावातील एका सामान्य कुटुंबातील मुलीने आपल्या जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस दलात भरती होऊन इतिहास घडवला...

आपदा मित्रांचे धाडस; उमरोळी अपघातात जखमीचा जीव वाचवला

0
पालघर (प्रतिनिधी निलेश गावंडे) :  पालघर जिल्ह्यातील उमरोळी येथे २९ एप्रिल २०२६ रोजी घडलेल्या भीषण अपघातात आपदा मित्र आणि आपदा सखी यांच्या तत्परतेमुळे एका जखमी...
error: Content is protected !!